शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे, विषमतेवर हल्ला करणारी नाटकं लिहावीत; राजा ढाले यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 18:37 IST

समाजातील ‘जाती-पाती, उच्च-नीच’ तेची मनोवृत्ती मोडून काढण्यासाठी विषमतेवर हल्ला करणार्‍या नाटकांची निर्मिती होणे काळाची गरज बनले आहे.  लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे वैचारिक नाटक लिहावे व कलाकारांनीही तेवढाच जिवंत अभिनय करावा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केले. 

औरंगाबाद : समाजातील ‘जाती-पाती, उच्च-नीच’ तेची मनोवृत्ती मोडून काढण्यासाठी विषमतेवर हल्ला करणार्‍या नाटकांची निर्मिती होणे काळाची गरज बनले आहे. लेखकांनी समाजात परिवर्तन घडविणारे वैचारिक नाटक लिहावे व कलाकारांनीही तेवढाच जिवंत अभिनय करावा, असे आवाहन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत राजा ढाले यांनी केले. 

प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे संपादित ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’ या ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.  मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद  लुलेकर होते. ढाले पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याच्या जगाचा ‘डोळा’ आहे. त्यांनी जगाला दिलेल्या ‘समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व’ या विचारांवर आधारित ‘मानवतेची परिभाषा शिकविणारे ‘नाटक’ तयार करायला हवे. प्रा. अविनाश डोळस म्हणाले की, ज्यांनी इतिहास घडविला ते इतिहास लिहीत नाही, यामुळे नंतर खोटा इतिहास समोर येतो. ‘मिलिंद’मधील दलित नाट्य चळवळीचा महान इतिहास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी लिहून दस्तावेज तयार करावा.  

युगयात्रा ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रा. विजयकुमार गवई यांनी ‘मिलिंद’मधील नाट्य चळवळीच्या आठवणी सर्वांना सांगितल्या. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा भक्कम वारसा लाभलेल्या दलित रंगभूमीने मराठी नाट्यसृष्टीला विचारावर आधारित अशी नाटके दिली, असा विचार प्रा. अजित दळवी यांनी मांडला. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सर्वप्रथम ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’ ग्रंथाचे संपादन केल्याबद्दल प्रा. त्र्यंबक महाजन व डॉ. कमलाकर गंगावणे यांचे अभिनंदन केले. या ज्येष्ठ लेखकांच्या मार्गदर्शनाखाली ‘नागसेनवन’चा वैभवशाली सांस्कृतिक इतिहास लिहिला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन करून भारत शिरसाट यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य प्रभाकर बागले, प्रा. प्रकाश त्रिभुवन, डॉ. आर. के. क्षीरसागर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मिलिंदमध्ये दलित नाट्य चळवळीचे मूळ रुजले प्रा. त्र्यंबक महाजन म्हणाले की, मिलिंद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: बसून ‘युगयात्रा’ हे नाटक पाहिले. त्यानंतर खर्‍या अर्थाने येथे दलित नाट्य चळवळीचे बीज रुजल्या गेले. या नाट्य चळवळीचे नाव देशात पोहोचले. त्यावेळी ब्राह्मणाची भूमिका दलित कलाकार करीत असत, तर दलिताची भूमिका ब्राह्मण कलाकार करीत असत, असे एकीचे वातावरण होते. 

सांस्कृतिक, ऐतिहासिक दस्तावेजडॉ. कमलाकर गंगावणे म्हणाले की, २० व्या शतकाच्या ७ व्या दशकात दलित साहित्य नाट्य चळवळ सुरू झाली. तेव्हा नागसेनवन हे चळवळीचे केंद्रंिबंदू होते. ‘युगयात्रा प्रवाहातील रंगसंहिता’हा ग्रंथ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तावेज आहे.