शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चिंताजनक ! औरंगाबाद शहरात ४ हजार श्वानांना त्वचारोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 18:54 IST

भटक्या श्वानांमध्ये झपाट्याने वाढतोय संसर्गजन्य आजार 

ठळक मुद्देपाळीव श्वानांची काळजी घेतली जाते; पण भटक्या श्वानांना कोणीच वाली नसतो.मागील तीन वर्षांत शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली

औरंगाबाद : शहरात भटकणाऱ्या सुमारे ४ हजार श्वानांना संसर्गजन्य त्वचारोग जडला आहे. त्यामुळे त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खरूज झाल्यामुळे त्रासलेले श्वान हल्लाही करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, उघड्यावर टाकले जाणारे अन्नपदार्थ, मांस आणि लांबलेला पावसाळा याचा मोठा फटका भटक्या श्वानांना बसला आहे. त्यातून श्वानांच्या शरीरावर पिसवा, गोचीड आणि खरूजची लागण होत आहे. त्यामुळे त्यांच्या अंगावरील केस गळून पडत आहेत. त्वचा लालसर व कोरडी पडल्यामुळे अंग घासणारे श्वान जागोजागी दिसत आहेत. त्यात मागील तीन वर्षांत शहरात वाढलेली श्वानांची संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. 

मनपाच्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१६ दरम्यान शहरात २३ ते २५ हजार श्वानांची संख्या होती. मात्र, मागील तीन वर्षांत निर्बीजीकरण बंद असल्याने श्वानांची संख्या झपाट्याने वाढून आजघडीला ४० हजारांवर गेली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, त्यातील १० टक्के म्हणजेच ४ हजारांपेक्षा अधिक श्वानांना त्वचारोग जडला आहे. ही बाब, गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण, खाजून खाजून त्रासलेले श्वान पिसाळत असून, हल्लाही करू शकतात. अशा घटना शहरात घडल्या आहेत व घडत आहेत. औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या मते शहरात आजघडीला सुमारे ६० हजार श्वान असून, त्यातील १० ते १५ टक्के श्वान खरूजने त्रस्त आहेत. पाळीव श्वानांची काळजी घेतली जाते; पण भटक्या श्वानांना कोणीच वाली नसतो. मागील तीन वर्षांत शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या व शहरात जागोजागी कचऱ्याचे निर्माण झालेले ढीग, याच ढिगावर कुजलेले अन्न खाऊन भटके श्वान जगतात, तसेच  मांस विक्रे तेही लपूनछपून उघड्यावर अवशेष फेकतात, तसेच यंदा सततचा पाऊस, घाण खाणे व उकीरड्यावर बसणे, यामुळे श्वानांना त्वचेचे आजार झाले आहेत. खाजूनखाजून बेजार झालेले हे श्वान आडोशाला किंवा जागा मिळेल तिथे पडून असतात. या श्वानांवर लवकरच उपचार व्हावेत, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे. 

आॅक्टोबरमध्ये ४७२ श्वानांचे निर्बीजीकरण सर्वप्रथम श्वानांची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे. खाजगी संस्थेतर्फे श्वानांचे निर्बीजीकरण करणे सुरू केले आहे. आॅक्टोबर महिन्यात ४७२ श्वानांचे, तर वर्षभरात २१२६ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. खरजुल्या कुत्र्यांची माहिती नागरिकांनी ०२४०-२३०१३५४ या नंबरवर कळवावी. मनपाचे श्वान पकडणारे पथक येऊन त्या श्वानांना घेऊन जातील व त्यांच्यावर उपचार करतील. ज्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही. त्यांना देखभालीखाली ठेवून नंतर तज्ज्ञांच्या निर्णयानुसार त्या श्वानांना दयामरण दिले जात आहे. मागील वर्षभरात १३ श्वानांना इंजेक्शन देऊन दयामरण दिले आहे. -डॉ. बी. एस. नाईकवाडे, संचालक, प्राणिसंग्रहालय मनपा

उपचारासाठी हौद तयार करावाभटक्या कुत्र्यांमध्ये खरूजचे प्रमाण वाढले आहे. संसर्गजन्य असल्याने त्याची लागण एका श्वानाकडून दुसऱ्या श्वानाला होत आहे. श्वानांची संख्या लक्षात घेता प्रत्येकाला पकडून त्यांच्यावर उपचार करणे कठीण आहे. यासाठी महानगरपालिकेने हौद तयार करून त्यात औषधी टाकावी व त्यात श्वानांना एकसाथ सोडून द्यावे. त्या हौदातून बाहेर निघेपर्यंत पाण्याद्वारे औषधी श्वानांच्या अंगावर लागेल व अनेक श्वान बरे होतील, तसेच श्वानांवर निर्बीजीकरण करणे, उपचार करणे व निगराणीखाली ठेवण्यासाठी महानगरपालिकेने मध्यवर्ती जकातनाका येथील प्राण्यांच्या दवाखान्याला लागून पिंजरे तयार केले आहेत. या केंद्राचा विस्तार लवकरात लवकर करावा व श्वानांवर उपचार करावेत.  -बेरल सांचीज,  अध्यक्षा, औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन  

टॅग्स :dogकुत्राAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्य