शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:17 IST

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय.

ठळक मुद्देपक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत. पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा, फुलपाखरे आणि अनेक कीटकांचे उदरभरणही या झाडांद्वारे होते.

औरंगाबाद : होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या तडाख्यात थंडावा शोधण्यासाठी आपली पावले नकळत रसवंतीगृह किंवा ज्युस सेंटरकडे वळत असतात. आश्चर्य आणि गंमत म्हणजे अशीच परिस्थिती बऱ्याच पक्ष्यांचीही असते आणि म्हणूनच ऊन वाढले की, ते सुद्धा नकळतपणे निसर्गानेच त्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध ज्युस सेंटर्सचा शोध घेऊ लागतात.

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय. याविषयी 'लोकमत'ला माहिती सांगताना पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक म्हणाले की, काटेसावर, पांगारा, पळस, सोनसावर, कौशी या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसांत जी भडक परंतु अत्यंत आकर्षक दिसणारी फुले येतात, तीच फुले ऐन उन्हाच्या तडाख्यात पक्षांचे संरक्षण करणारी ठरतात. या झाडांच्या फुलांमध्ये असणाऱ्या मधात ग्लुकोज आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या मधाचे सेवन केल्यानंतर पक्ष्यांना सनस्ट्रोकचा त्रास होत नाही.

आपल्याकडे पानझडीची झाडे असल्याने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पानगळ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये किडे आणि कीटकांचे प्रमाणही खूप कमी झालेले असते. तसेच पाण्यासाठीही पक्ष्यांना बरीच शोधाशोध करावी लागते. अन्नाचे दुर्भिक्ष्य आणि बऱ्याचदा उष्णतेमुळे केवळ पाणी पिऊन न मिळू शकणारी ऊर्जा यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना या झाडांच्या फुलांमधून मिळते. चष्मेवाला, शिंजीर, सूर्यपक्षी, वटवट्या, शिंपी, पितकंठी चिमणी, कोतवाल, हळद्या, बुलबुल, टोपीवाला, सगळ्या प्रकारच्या मैना, शिक्रा या लहान पक्ष्यांसोबतच पांढऱ्या डोळ्याचा गरुडही पक्ष्यांच्या या ज्युस सेंटरमध्ये बसून मध पित असल्याचे दिसून येते, असेही डॉ. पाठक यांनी सांगितले.

झाडे औषधी गुणधर्माची पक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत. इतर झाडांचा बहर जेव्हा ओसरलेला असतो, तेव्हा ही झाडे फुलून येतात. फेब्रुवारी ते मे हा या झाडांचा हंगाम असून मार्च - एप्रिलमध्ये ही झाडे विशेष बहरून येतात. पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा, फुलपाखरे आणि अनेक कीटकांचे उदरभरणही या झाडांद्वारे होते. या झाडांचा उपयोग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी होत असून, ही सगळीच झाडे औषधी गुणधर्माची आहेत. त्यामुळे शहरी भागातसुद्धा या झाडांची लागवड होणे आता गरजेचे बनले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद