शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक ! औरंगाबाद जिल्ह्यात १७ हजार बालके कुपोषित; वर्षभरापासून प्रमाण कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:00 IST

जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाड्यांमध्ये येणारी बालके सुदृढ राहावी, यासाठी त्यांना पोषक आहार दिला जातो. मात्र, वर्षानुवर्षे दिला जाणारा ‘पोषण आहार’ हा खराच पौष्टिक आहे का? मुलांना त्यातून जीवनसत्वे मिळतात का? हा प्रश्न कुपोषित बालकांच्या आकडेवारीवरून उपस्थित झाला आहे. 

जिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख २८ हजार १०७ बालकांना पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यापैकी एप्रिलमध्ये २ लाख १९ हजार ५०६ बालकांचे वजन घेण्यात आले. तेव्हा २ लाख २ हजार २८२ बालके  सर्वसाधारण श्रेणीमध्ये असल्याचे दिसून आले. ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी दुसरी बाजू मात्र तेवढीच धक्कादायक आहे. मध्यम कमी वजनाची १३ हजार ९५० व तीव्र कमी वजनाची ३ हजार १४४ बालके आढळली आहेत. मध्यम व तीव्र कमी वजन या दोन्ही प्रकारातील बालके ही कुपोषित समजली जातात. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोेषणमुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योजना राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होत नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हाळ्यात बालकांचा आहार कमी होतो. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक ठिकाणचे हातपंप कोरडे पडले आहेत. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते की नाही, हे पडताळून पाहणारी यंत्रणा नाही. 

अनेक ठिकाणी मिळेल त्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. दूषित पाण्यामुळे बालकांना कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसारसारख्या रोगांचा सामना करावा लागतो. अंगणवाड्यांमार्फत संदर्भसेवा दिल्या जातात; पण अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी कुटुंबांकडे वेळ नसतो. परिणामी, या दिवसांत वजन कमी होण्याचे प्रमाण जास्त असते, असे उत्तर पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांकडून दिले जाते.

अन्नाअभावी कुपोषण नाहीयासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले, जिल्ह्यात अन्नाअभावी कुपोषण होणारी एकही घटना नाही. अन्न आहे; पण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आजारामुळे कुपोषणाची समस्या सर्वाधिक भेडसावते.जिल्हाभरात दर शनिवारी माता बैठका आयोजित करून पोषण, आहाराबाबत जागृती केली जाते. अलीकडे नव्याने महिला व बालविकास विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमार्फत कुपोषित बालकांवर विशेष लक्ष दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ४ ते १२ आठवड्यांपर्यंत बालकांवर उपचार केले जातात.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदStudentविद्यार्थी