शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

चिंताजनक ! औरंगाबाद जिल्ह्यात १७ हजार बालके कुपोषित; वर्षभरापासून प्रमाण कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:00 IST

जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल १७ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाड्यांमध्ये येणारी बालके सुदृढ राहावी, यासाठी त्यांना पोषक आहार दिला जातो. मात्र, वर्षानुवर्षे दिला जाणारा ‘पोषण आहार’ हा खराच पौष्टिक आहे का? मुलांना त्यातून जीवनसत्वे मिळतात का? हा प्रश्न कुपोषित बालकांच्या आकडेवारीवरून उपस्थित झाला आहे. 

जिल्ह्यात १४ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२५ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख २८ हजार १०७ बालकांना पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यापैकी एप्रिलमध्ये २ लाख १९ हजार ५०६ बालकांचे वजन घेण्यात आले. तेव्हा २ लाख २ हजार २८२ बालके  सर्वसाधारण श्रेणीमध्ये असल्याचे दिसून आले. ही आकडेवारी समाधानकारक असली, तरी दुसरी बाजू मात्र तेवढीच धक्कादायक आहे. मध्यम कमी वजनाची १३ हजार ९५० व तीव्र कमी वजनाची ३ हजार १४४ बालके आढळली आहेत. मध्यम व तीव्र कमी वजन या दोन्ही प्रकारातील बालके ही कुपोषित समजली जातात. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे १७ हजारांच्या जवळपास स्थिर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोेषणमुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योजना राबविल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होत नाही. यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हाळ्यात बालकांचा आहार कमी होतो. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक ठिकाणचे हातपंप कोरडे पडले आहेत. सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जाते की नाही, हे पडताळून पाहणारी यंत्रणा नाही. 

अनेक ठिकाणी मिळेल त्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. दूषित पाण्यामुळे बालकांना कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसारसारख्या रोगांचा सामना करावा लागतो. अंगणवाड्यांमार्फत संदर्भसेवा दिल्या जातात; पण अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यासाठी कुटुंबांकडे वेळ नसतो. परिणामी, या दिवसांत वजन कमी होण्याचे प्रमाण जास्त असते, असे उत्तर पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांकडून दिले जाते.

अन्नाअभावी कुपोषण नाहीयासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम म्हणाले, जिल्ह्यात अन्नाअभावी कुपोषण होणारी एकही घटना नाही. अन्न आहे; पण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आजारामुळे कुपोषणाची समस्या सर्वाधिक भेडसावते.जिल्हाभरात दर शनिवारी माता बैठका आयोजित करून पोषण, आहाराबाबत जागृती केली जाते. अलीकडे नव्याने महिला व बालविकास विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमार्फत कुपोषित बालकांवर विशेष लक्ष दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ४ ते १२ आठवड्यांपर्यंत बालकांवर उपचार केले जातात.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदStudentविद्यार्थी