शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील स्पेअर पार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:38 IST

जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबाद शहर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट असतोच.

ठळक मुद्देसुटे भाग ८० देशांत निर्यात होत असून यातून १७ हजार कोटींची उलाढाल होते  वाहनांबरोबर सुटे भाग आणि इतर उत्पादनांना मागणी

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांतऔरंगाबाद शहर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट असतोच. आश्चर्य वाटले ना, हो ही सत्य परिस्थिती आहे.

औरंगाबाद शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींत आॅटोमोबाईल्स, कृषी, फार्मासह विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आहेत. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर आता अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश झाला आहे. यामध्ये वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून वर्षभरात उत्पादनांतून सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. येथील औद्योगिक वसाहतींमध्ये निर्मित होणाऱ्या उत्पादनांना जगभरातून मागणी आहे. 

औद्योगिक वसाहतींमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याबरोबर परदेशांत होणाऱ्या निर्यातीमुळे औरंगाबादचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी औरंगाबादेत उत्पादन सुरूकेले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात परदेशांत माल निर्यात होतो. चिकलठाणा एमआयडीसीत फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंंग, मद्यनिर्मिती, कंपोस्टर, चटई आदींचे उत्पादन होते. त्यामुळे निर्यातीमध्ये या वसाहतीचाही वाटा मोठा आहे.

औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांत तयार झालेले उत्पादन दररोज किमान १ हजार ५०० ट्रकमधून देशभरातील विविध शहरांत पाठविले जाते. दिवसाला २५ ते ३० हजार टन माल शहरातून पाठविला जातो. आजघडीला मुंबई, दिल्लीसह विविध शहरांतून देश- विदेशांमध्ये मालाची निर्यात केली जाते. एक-दोन नव्हे तर जगभरातील तब्बल ८० देशांमध्ये औद्योगिक उत्पादनांची निर्यात होते. आशियाई, आफ्रिकन देशांबरोबर, अमेरिका, युरोपमध्येही निर्यात होते. यामध्ये वाहन आणि वाहनांचे सुटे भाग, औषधी, सॉफ्टवेअरसह अनेक उत्पादनांचा समावेश आहे. यातून वर्षाकाठी १७ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. 

वाहनांचे सुटे भाग बनविण्यात औरंगाबाद आघाडीवर आहे. शॉकअप, गीअर, क्लचप्लेटसह दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांच्या विविध सुट्या भागांची निर्मिती औरंगाबाद परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये होते. देशभरातील विविध औद्योगिक वसाहतींबरोबर परदेशांत वाहन निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्यांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे जगभरातील अनेक वाहनांमध्ये औरंगाबादचा निश्चित वाटा असल्याचा विश्वास उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. औरंगाबादेत सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यादेखील आहेत. बंगळुरू आणि पुण्याच्या तुलनेत औरंगाबादेत आयटी क्षेत्र फार मोठे नाही; परंतु शहरात कार्यरत कंपन्यांतून परदेशांमध्ये सॉफ्टवेअरदेखील निर्यात केले जात आहे.

सुट्या भागांचा पुरवठाऔरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींतील विविध उत्पादने ७० पेक्षा अधिक देशांत निर्यात होतात. जगभरात मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ब्रँडला औरंगाबादेतून सुट्या भागांचा पुरवठा होतो. परदेशांत सॉफ्टवेअरदेखील पुरविले जात आहे. जवळपास वर्षभरात १७ हजार कोटींची ही निर्यात असते.- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

८० देशांत निर्यात औरंगाबाद वसाहतींतून साधारण ८० देशांत निर्यात होते. मशीन, फार्मा कंपन्यांचे उत्पादन, स्टील, फिल्म, पॉलिस्टर आदींची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. दुचाकी, तीनचार, चारचाकी वाहनांचे पार्टस् जगभर पाठविले जातात. जगभरात औरंगाबादचा मोठा वाटा आहे. - आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए

चिकलठाण्याचा वाटापरदेशातील निर्यातीमध्ये २० टक्के वाटा हा एकट्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा आहे. वर्षभरात सुमारे २५० ते ३०० कोटींची निर्यात होते. चिकलठाणा विमानतळामुळे यात आणखी वाढ होण्यास वाव आहे.- किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगMIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसीShendra MIDCशेंद्रा एमआयडीसी