शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ३ वर्षांपासून तहानलेली; पर्यटनमंत्र्यांच्या भेटीनंतरही पाणी दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:11 IST

जेमतेम पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात पुरातत्त्व विभागाला यश येत असले तरी लेणी परिसर आणि तेथील साैंदर्यीकरण, हिरवळ बघायला मिळणेही दुरापास्त झाले आहे.

- योगेश पायघनऔरंगाबाद : देशातील पहिले जागतिक वारसास्थळ जगप्रसिद्ध अजिंठा लेणी. जवळच वाघूर नदी आणि येथील धबधबा देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालताे. तरीही अजिंठा लेणी गेल्या ३ वर्षांपासून तहानलेली आहे. कारण येथील पाणीपुरवठा गेल्या ३ वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कापला आहे. याठिकाणी पर्यटनमंत्र्यांनीही भेट दिली. मात्र, अजूनही या लेणीत पाणी पोहोचले नाही. पाणी कधी मिळणार, असा सवाल पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाणीपट्टीची ३.२ कोटींची थकबाकी न भरल्याने २०१९ मध्ये अजिंठा लेणीत जाणारे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांना जेमतेम पिण्यापुरते पाणी शुद्धीकरण करून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण उपलब्ध करून देत आहे. मात्र, डोंगररांगातील लेणीतील बाग नामशेष झाली असून पर्यटकांना न्याहरी करून उसंत घ्यायला छोटीशी जागाही इथे नसल्याने पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जेमतेम पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात पुरातत्त्व विभागाला यश येत असले तरी लेणी परिसर आणि तेथील साैंदर्यीकरण, हिरवळ बघायला मिळणेही दुरापास्त झाले आहे.

पाणी उपलब्धेनंतर बायोटाॅयलेटपाणी नसल्याने अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. पिण्यासाठी आरओचे थंड पाणी एएसआयने उपलब्ध करून दिले आहे. पाणी उपलब्ध झाल्यास दिल्ली मेट्रोच्या धर्तीवरील बायोटाॅयलेट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-डाॅ. मिलन कुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद विभाग

वीज बिल भरले, पाणीपट्टीही भरू...लेणीत पाणीपुरवठ्याची एमजेपीची योजना असून गेल्या कोरोनाकाळात निधीची अडचण आल्याने पाणीपट्टी भरता आली नाही. मात्र, पर्यटनमंत्र्यांनी अजिंठा आणि वेरूळ येथील व्हिजिटर सेंटर सुरू करण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून लवकरच पाणीपट्टीचे पैसे भरून पाणी सुरळीतपणे मिळेल.-विनय वावधानी, कार्यकारी अभियंता, एमटीडीसी

लवकरच तोडगा निघेल...अजिंठ्यात २००२ पासून ही योजना सुरू असून २०१९ पासून येथील देखभाल दुरुस्तीचे पैसे भरले गेले नाहीत. या विषयावर लवकरच तोडगा निघेल. बोअरवेलचा वापर करीत असून पर्यटकाच्या पाण्याच्या गरजा भागवत आहोत.-चंद्रशेखर जयस्वाल, उपमहाव्यवस्थापक, एमडीटीसी

हा विषय आमचा नाही...अजिंठा लेणीतील पाण्याचा विषय हा नगरविकास विभागाचा विषय आहे. यात पाणीपुरवठा विभागाचा संबंध नाही.-गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री

विदेशी पर्यटकांचा आलेख घसरतोय...वर्ष -भारतीय पर्यटक -विदेशी पर्यटक२०१६-१७ -३,९३,९८५ -२१,०६२२०१७-१८ -३,९५,४५६ -२२,७८३२०१८-१९ -३,५९,१५४ -२६,६८७२०१९-२० -२,७३,३४४ -२०,०५७२०२०-२१ -४०,१८७ -५५२०२१ -२२ -९२,९६१ -२८९

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद