शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वसुंधरा दिन : मराठवाडा बोडखा तो बोडखाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 18:32 IST

 वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे

- गजानन दिवाण  

औरंगाबाद : राज्यात २०१८ या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना जवळपास १६ कोटी झाडे लावण्यात आली. यात सर्वाधिक जवळपास साडेपाच कोटी झाडे एकट्या मराठवाड्याने लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे. मराठवाड्यात सध्याच्या स्थितीत केवळ चार टक्केच वनक्षेत्र आहे. त्यामुळे दुष्काळवाड्याचे हे बोडखे चित्र बदलण्यासाठी मोठी कामगिरी करण्याची गरज वनप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. 

मराठवाड्याला २ कोटी ९९ लाख ९३ हजार ११९ झाडे लावण्याचे टार्गेट असताना ५ कोटी ५६ लाख ९९ हजार २८७ झाडे लावून मोठी कामगिरी करण्यात आली. यात सर्वाधिक १ कोटी झाडे औरंगाबाद जिल्ह्यात लावण्यात आली. सर्वात कमी ३५ लाख झाडे परभणी जिल्ह्यात लावण्यात आली. लावलेली ही झाडे जगविणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. झाडे लावण्यापूर्वीची मशागत आणि नंतरच्या पाच वर्षांचे नियोजन करावे लागते. याची अंमलबजावणी करतानाच दरवर्षी ३१ आॅक्टोबर आणि ३१ मे रोजी या झाडांची गणना करावी लागते. ३१ आॅक्टोबर रोजी अशी गणना करण्यात आली असून, जवळपास ७० टक्के झाडे जगली असल्याचा दावा मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी केला. मात्र, मराठवाड्यात असलेली दुष्काळ स्थिती आणि पाण्याची टंचाई पाहता हा दावा खोटा असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केला. मराठवाड्यात पाच कोटी झाडे लावली जात असल्याचा दावाच खोटा असून, पाच लाख खड्डे दाखविले तरी मिळविले, असा आरोप पाठक यांनी केला. 

मंत्र्यांच्या आग्रहामुळे झाडे लावली जातात खरी. मात्र ती जगविण्यासाठी आवश्यक असलेले पाच वर्षांचे नियोजन अजिबात केले जात नसल्याची माहिती एका निवृत्त वन अधिकाºयाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. निधी, मनुष्यबळ, वेळ आणि कामांचा लोड, अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अधिकाºयांना हे उघडपणे बोलताही येत नसल्याचे या अधिकाºयाने स्पष्ट केले. त्यामुळे कोटीच्या कोटी झाडे लावली जात असली तरी लाखभरच झाडे लावावीत आणि ती जगवावीत, अशी अपेक्षा वनप्रेमींमधून व्यक्त होत आहे. 

वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागासह सर्वच विभागांनी वृक्ष लागवडीत चांगली कामगिरी केली. सर्वांनीच टार्गेटपेक्षा अधिक झाडे लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगविण्यात यश आले.       - प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक 

धुळे-सोलापूर महामार्गासाठी ३७ हजार झाडे तोडली. त्या बदल्यात एकही झाड लावले गेले नाही. १३ कोटी झाडे लावल्याची घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. जंगल वाचविण्याचे काम राहिले दूरच. वनखात्यातील सर्वच कर्मचारी या वृक्ष लागवडीच्या मागे लावण्यात आली आहेत. १३ लाख झाडे लावायला हवी आणि ती जगवायला हवी. शिवाय विकासाच्या नावाखाली झाडे तोडणे थांबायला हवे.  - डॉ. किशोर पाठक 

२०१८ : कोणत्या जिल्ह्याने किती झाडे लावली? (आकडेवारी लाखांत)जिल्हा     टार्गेट    प्रत्यक्ष लावलीऔरंगाबाद    ४४.४५    ९७.९७बीड    ३०.४८    ५९.५६हिंगोली    ३०.४८    ५९.६६जालना    ३६.२२    ७७.१७लातूर    ३३.०२    ६०.२३नांदेड    ६०.२१    ८७.८४उस्मानाबाद    २८.१९    ५८.२९परभणी    ३४.१६    ३५.४एकूण    २९९.९४    ५५६.९९

वनक्षेत्र कुठे किती (चौ. कि.मी.मध्ये)जिल्हा    एकुण क्षेत्र    वनक्षेत्रऔरंगाबाद    १०,१०७    ९००बीड    १०,६९३    २४०हिंगोली    ४६८६    २७५जालना    ७७१८    ९९लातूर    ७१५७    ४०नांदेड    १०५२८    १२८१उस्मानाबाद    ७५६९    ६१परभणी    ६३५५    ९९

टॅग्स :MarathwadaमराठवाडाEarthपृथ्वीNatureनिसर्ग