शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वसुंधरा दिन : मराठवाडा बोडखा तो बोडखाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 18:32 IST

 वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे

- गजानन दिवाण  

औरंगाबाद : राज्यात २०१८ या वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना जवळपास १६ कोटी झाडे लावण्यात आली. यात सर्वाधिक जवळपास साडेपाच कोटी झाडे एकट्या मराठवाड्याने लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाकडून केला जात आहे. मराठवाड्यात सध्याच्या स्थितीत केवळ चार टक्केच वनक्षेत्र आहे. त्यामुळे दुष्काळवाड्याचे हे बोडखे चित्र बदलण्यासाठी मोठी कामगिरी करण्याची गरज वनप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. 

मराठवाड्याला २ कोटी ९९ लाख ९३ हजार ११९ झाडे लावण्याचे टार्गेट असताना ५ कोटी ५६ लाख ९९ हजार २८७ झाडे लावून मोठी कामगिरी करण्यात आली. यात सर्वाधिक १ कोटी झाडे औरंगाबाद जिल्ह्यात लावण्यात आली. सर्वात कमी ३५ लाख झाडे परभणी जिल्ह्यात लावण्यात आली. लावलेली ही झाडे जगविणार कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. झाडे लावण्यापूर्वीची मशागत आणि नंतरच्या पाच वर्षांचे नियोजन करावे लागते. याची अंमलबजावणी करतानाच दरवर्षी ३१ आॅक्टोबर आणि ३१ मे रोजी या झाडांची गणना करावी लागते. ३१ आॅक्टोबर रोजी अशी गणना करण्यात आली असून, जवळपास ७० टक्के झाडे जगली असल्याचा दावा मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी केला. मात्र, मराठवाड्यात असलेली दुष्काळ स्थिती आणि पाण्याची टंचाई पाहता हा दावा खोटा असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी केला. मराठवाड्यात पाच कोटी झाडे लावली जात असल्याचा दावाच खोटा असून, पाच लाख खड्डे दाखविले तरी मिळविले, असा आरोप पाठक यांनी केला. 

मंत्र्यांच्या आग्रहामुळे झाडे लावली जातात खरी. मात्र ती जगविण्यासाठी आवश्यक असलेले पाच वर्षांचे नियोजन अजिबात केले जात नसल्याची माहिती एका निवृत्त वन अधिकाºयाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. निधी, मनुष्यबळ, वेळ आणि कामांचा लोड, अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. अधिकाºयांना हे उघडपणे बोलताही येत नसल्याचे या अधिकाºयाने स्पष्ट केले. त्यामुळे कोटीच्या कोटी झाडे लावली जात असली तरी लाखभरच झाडे लावावीत आणि ती जगवावीत, अशी अपेक्षा वनप्रेमींमधून व्यक्त होत आहे. 

वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागासह सर्वच विभागांनी वृक्ष लागवडीत चांगली कामगिरी केली. सर्वांनीच टार्गेटपेक्षा अधिक झाडे लावली. यातील जवळपास ७० टक्के झाडे जगविण्यात यश आले.       - प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक 

धुळे-सोलापूर महामार्गासाठी ३७ हजार झाडे तोडली. त्या बदल्यात एकही झाड लावले गेले नाही. १३ कोटी झाडे लावल्याची घोषणा म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. जंगल वाचविण्याचे काम राहिले दूरच. वनखात्यातील सर्वच कर्मचारी या वृक्ष लागवडीच्या मागे लावण्यात आली आहेत. १३ लाख झाडे लावायला हवी आणि ती जगवायला हवी. शिवाय विकासाच्या नावाखाली झाडे तोडणे थांबायला हवे.  - डॉ. किशोर पाठक 

२०१८ : कोणत्या जिल्ह्याने किती झाडे लावली? (आकडेवारी लाखांत)जिल्हा     टार्गेट    प्रत्यक्ष लावलीऔरंगाबाद    ४४.४५    ९७.९७बीड    ३०.४८    ५९.५६हिंगोली    ३०.४८    ५९.६६जालना    ३६.२२    ७७.१७लातूर    ३३.०२    ६०.२३नांदेड    ६०.२१    ८७.८४उस्मानाबाद    २८.१९    ५८.२९परभणी    ३४.१६    ३५.४एकूण    २९९.९४    ५५६.९९

वनक्षेत्र कुठे किती (चौ. कि.मी.मध्ये)जिल्हा    एकुण क्षेत्र    वनक्षेत्रऔरंगाबाद    १०,१०७    ९००बीड    १०,६९३    २४०हिंगोली    ४६८६    २७५जालना    ७७१८    ९९लातूर    ७१५७    ४०नांदेड    १०५२८    १२८१उस्मानाबाद    ७५६९    ६१परभणी    ६३५५    ९९

टॅग्स :MarathwadaमराठवाडाEarthपृथ्वीNatureनिसर्ग