शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

कामे यंत्रांनी; दाखवितात ‘रोहयो’ची; दुष्काळात सरकारकडून अशीही थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:52 IST

कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा केली.

औरंगाबाद : राज्य सरकारनेदुष्काळाची घोषणा केली. प्रत्यक्षात दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामे आणि मदत होत नसल्याचे २५ जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. रोजगार हमी योजनेत ५ लाख लोक कामावर असल्याचे सरकार सांगते. प्रत्यक्षात यंत्रांनी कामे केली जातात. कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रा. देसरडा म्हणाले, मी स्वत: राज्यातील २५ जिल्ह्यांत पाहणी केली. ग्रामीण भागातील दुष्काळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. निदर्शनास आलेली परिस्थिती गंभीर आहे. बहुतांश ठिकाणी पाणीबाणीसह भयावह स्थिती आहे; परंतु मुख्यमंत्री व मंत्री दररोज केवळ त्याच त्या घोषणा करीत आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष मदत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही, शेतात कामे नाही. शेतकरी आणि शेतीसाठी अनेक योजना आहेत. योजनांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु जनतेला काहीही फायदा होत नाही. 

प्रा. देसरडा म्हणाले,  ‘रोहयो’च्या कामांवर तुरळक लोक कामे करताना दिसली. त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणारी आकडेवारी बनावट आहे. दुष्काळामुळे २ कोटी शेतकरी, शेतमजुरांना ‘रोहयो’ची कामे मिळाली पाहिजे. कामे देऊ शकत नसतील, तर दररोज ५०० रुपये निर्वाह भत्ता द्यावा.  

तेलंगणाप्रमाणे मदत द्यावीतेलंगणा सरकारने हंगामी हेक्टरी १० हजार याप्रमाणे २० हजार रुपयांची मदत दिली. त्याच धर्तीवर राज्यातही मदत करावी. विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करावी. 

कृती कार्यक्रम ठरविणारमहाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ, सर्व्हंटस् आॅफ इंडिया सोसायटी यांच्या वतीने पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत २३ नोव्हेंबरला दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीअरिष्ट समस्यांवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीवर विचारविनिमय करून कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. देसरडा यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार