शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कामे यंत्रांनी; दाखवितात ‘रोहयो’ची; दुष्काळात सरकारकडून अशीही थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:52 IST

कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा केली.

औरंगाबाद : राज्य सरकारनेदुष्काळाची घोषणा केली. प्रत्यक्षात दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामे आणि मदत होत नसल्याचे २५ जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. रोजगार हमी योजनेत ५ लाख लोक कामावर असल्याचे सरकार सांगते. प्रत्यक्षात यंत्रांनी कामे केली जातात. कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रा. देसरडा म्हणाले, मी स्वत: राज्यातील २५ जिल्ह्यांत पाहणी केली. ग्रामीण भागातील दुष्काळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. निदर्शनास आलेली परिस्थिती गंभीर आहे. बहुतांश ठिकाणी पाणीबाणीसह भयावह स्थिती आहे; परंतु मुख्यमंत्री व मंत्री दररोज केवळ त्याच त्या घोषणा करीत आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष मदत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही, शेतात कामे नाही. शेतकरी आणि शेतीसाठी अनेक योजना आहेत. योजनांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु जनतेला काहीही फायदा होत नाही. 

प्रा. देसरडा म्हणाले,  ‘रोहयो’च्या कामांवर तुरळक लोक कामे करताना दिसली. त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणारी आकडेवारी बनावट आहे. दुष्काळामुळे २ कोटी शेतकरी, शेतमजुरांना ‘रोहयो’ची कामे मिळाली पाहिजे. कामे देऊ शकत नसतील, तर दररोज ५०० रुपये निर्वाह भत्ता द्यावा.  

तेलंगणाप्रमाणे मदत द्यावीतेलंगणा सरकारने हंगामी हेक्टरी १० हजार याप्रमाणे २० हजार रुपयांची मदत दिली. त्याच धर्तीवर राज्यातही मदत करावी. विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करावी. 

कृती कार्यक्रम ठरविणारमहाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ, सर्व्हंटस् आॅफ इंडिया सोसायटी यांच्या वतीने पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत २३ नोव्हेंबरला दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीअरिष्ट समस्यांवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीवर विचारविनिमय करून कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. देसरडा यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार