शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

कामे यंत्रांनी; दाखवितात ‘रोहयो’ची; दुष्काळात सरकारकडून अशीही थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:52 IST

कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा केली.

औरंगाबाद : राज्य सरकारनेदुष्काळाची घोषणा केली. प्रत्यक्षात दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामे आणि मदत होत नसल्याचे २५ जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केला. रोजगार हमी योजनेत ५ लाख लोक कामावर असल्याचे सरकार सांगते. प्रत्यक्षात यंत्रांनी कामे केली जातात. कामे करताना लोक दिसलेच नसल्याने ‘रोहयो’ची आकडेवारी बनावट असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रा. देसरडा म्हणाले, मी स्वत: राज्यातील २५ जिल्ह्यांत पाहणी केली. ग्रामीण भागातील दुष्काळ समजून घेण्याचा प्रयत्न केला. निदर्शनास आलेली परिस्थिती गंभीर आहे. बहुतांश ठिकाणी पाणीबाणीसह भयावह स्थिती आहे; परंतु मुख्यमंत्री व मंत्री दररोज केवळ त्याच त्या घोषणा करीत आहेत. दुष्काळ निवारणासाठी प्रत्यक्ष मदत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नाही, चारा नाही, शेतात कामे नाही. शेतकरी आणि शेतीसाठी अनेक योजना आहेत. योजनांवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु जनतेला काहीही फायदा होत नाही. 

प्रा. देसरडा म्हणाले,  ‘रोहयो’च्या कामांवर तुरळक लोक कामे करताना दिसली. त्यामुळे सरकारकडून सांगण्यात येणारी आकडेवारी बनावट आहे. दुष्काळामुळे २ कोटी शेतकरी, शेतमजुरांना ‘रोहयो’ची कामे मिळाली पाहिजे. कामे देऊ शकत नसतील, तर दररोज ५०० रुपये निर्वाह भत्ता द्यावा.  

तेलंगणाप्रमाणे मदत द्यावीतेलंगणा सरकारने हंगामी हेक्टरी १० हजार याप्रमाणे २० हजार रुपयांची मदत दिली. त्याच धर्तीवर राज्यातही मदत करावी. विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करावी. 

कृती कार्यक्रम ठरविणारमहाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ, सर्व्हंटस् आॅफ इंडिया सोसायटी यांच्या वतीने पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेत २३ नोव्हेंबरला दुष्काळ, पाणीटंचाई, शेतीअरिष्ट समस्यांवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीवर विचारविनिमय करून कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. देसरडा यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकार