शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

कामगार रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 20:23 IST

मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

विभागीय पथक : मुंबईतील आगीच्या घटनेनंतर ईएसआयसीला जागवाळूज महानगर : मुंबईच्या अंधेरी येथील ईएसआयसी (कामगार रुग्णालय) रुग्णालयाला आग लागून ६ जण मृत्युमुखी, तर तब्बल १५४ जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर ईएसआयसी प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर ईएसआयसीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने सोमवारी पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआयसी प्रशासनाने पंढरपूर येथे ईएसआयसीची मॉडेल डिस्पेन्सरी उभारली आहे. या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून २०१२-१३ मध्ये इमारत बांधली. २०१५ मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरू झाल्यानंतर काही वर्षांत इमारतीच्या भिंतीला तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले, तरीही इमारतीची पडझड थांबलेली नाही. नोव्हेंबरमध्ये दिवाळीदरम्यान या रुग्णालयातील इंजेक्शन रूम व ड्रेसिंग रूमच्या मधल्या भिंतीला तडे जाऊन छत कोसळल्याची घटना घडली. प्रशासनाने हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कमालीची गुप्तता पाळली होती; पण ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. येथील डॉ. व्यंकट जांभळे यांनी माहिती देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

त्यानंतर पुन्हा आठवडाभरापूर्वी सदरील भिंतीचे काही भागाचे छत पडल्याची घटना घडली. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देऊन उपचार केले जातात, तसेच या रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणाही कार्यान्वित नाही. जनरेटर व लिफ्ट अनेक दिवसांपासून बंदावस्थेत आहे. बजाजनगरातील दवाखान्याची तर फारच वाईट अवस्था आहे. भिंतीला व छताला तडे गेल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. पंढरपूर व बजाजनगरातील दवाखान्यात कामगार रुग्णांसह नातेवाईकांची गर्दी असते. रुग्णालयाच्या भिंतीचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने कामगारांसह डॉक्टरांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे. अग्निशमन यंत्रणा धूळ खात पडल्याने रुग्णालयाला आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील घटनेनंतर जागमुंबई अंधेरी येथील घटनेमुळे ईएसआयसी प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने राज्यातील ईएसआयीसी रुग्णालयाच्या सुरक्षेची पाहणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाचे उपसंचालक संजीव यादव, शाखा प्रमुख पद्मनाभन दातार यांच्या पथकाने पंढरपूर येथील ईएसआयसी रुग्णालय व बजाजनगरातील दवाखान्याची पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. व्यंकट, संतोष दळवी यांची उपस्थिती होती. या विषयी उपसंचालक यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद