शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जि.प.चे कार्य दुबळे आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:43 AM

जिल्हा परिषदांकडून बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने देण्याचा अधिकार काढून घेण्याच्या कृषी आयुक्तांच्या हालचालींवर औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदांकडून बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीचे परवाने देण्याचा अधिकार काढून घेण्याच्या कृषी आयुक्तांच्या हालचालींवर औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केवळ परवाने देण्याचे अधिकार बदलण्यामुळे चुका होणे थांबणार आहे का. चुकांवर उपाय शोधण्याचे सोडून अधिकार काढण्याचा निर्णय चुकीचा आहे. ज्यांना कोणाला अधिकार देणार असतील, तिकडेही माणसेच काम करणार आहेत व येथेही माणसेच काम करीत आहेत. अधिकार कमी करून कृषी आयुक्तालय काय साध्य करणार आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.यवतमाळसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन जवळपास ३६ शेतकºयांना जीव गमवावा लागला. या घटनांमुळे कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणाचा विषय ऐरणीवर आला. कृषी आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाºयांवर राजकारण्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करत यापुढे बियाणे, खते व कीटकनाशकांचे परवाने देण्याचे अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यासंबंधीचा प्रस्ताव कृषी सचिवांकडे सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर परवाने देण्याचे अधिकार काढून घेतल्यास कामकाजात काय बदल होईल, याबाबत जिल्हा परिषद कृषी विभाग आणि पदाधिकाºयांमध्ये चाचपणी केली. तेव्हा जिल्हा परिषदेच्या कामकाजावर शंका घेणे योग्य नाही. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फतच हे परवाने दिले जात होते. औरंगाबाद जिल्ह्यात बियाणे, खते आणि कीटकनाशकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारचे १३ आणि जिल्हा परिषदेचे ११ कृषी निरीक्षक कार्यरत आहेत. शासन परवाने देण्याचा अधिकार काढून घेणार असेल, तर मग जिल्ह्यातील कार्यरत कृषी निरीक्षकही काढून घेणार आहेत का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.परवाने देण्याचे अधिकार काढून घेण्याने कृषी विभागाचे काहीही नुकसान होणार नाही किंवा फायदाही होणार नाही. परवान्यासाठी लागणारे विहित शुल्क हे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत नव्हे तर शासनाच्याच तिजोरीत जाते. दुसरीकडे, गुणवत्ता नियंत्रणासाठी शासनाचे व जिल्हा परिषदेच्या निरीक्षकांनी सतर्क राहून अनियमितता आढळून आलेल्या विक्रेत्यांचे अनेक परवाने रद्दही केले आहेत.अधिकार बदलण्याने सुधारणा होत नसते, मानसिकता बदलण्याने परिणाम दिसून येत असतो, असे मत कृषी विभागाच्या अधिकारी- कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे. कृषी परवाने व गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर वर्ग-१ दर्र्जाचा अधिकारी उपसंचालक म्हणून देण्याच्या शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत.