शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; ७.५ मीटर लांब, ८.५ मीटर व्यासाचे अवाढव्य पाईप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 19:45 IST

योजनेच्या डिझाईननुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २४०० मिमी. व्यासाचे पाईप टाकले जात आहेत.

औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गंत सोमवारी जायकवाडीपासून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून यंत्राचे पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.

शासनाने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत योजनेचे काम सुरू आहे. योजनेच्या डिझाईननुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २४०० मिमी. व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. हे विशाल पाईप नक्षत्रवाडी येथील डोंगरावरच तयार करण्यात आले. लांबलचक ट्रेलवर एकाचवेळी एक पाईप नेण्यात येत आहेत. योजनेला गती देण्याचे आदेश मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने युद्धपातळीवर पाईप टाकण्याचे काम सुरू केले.

७.५ मीटर लांब आणि ८.५ मीटर व्यासाच्या अवाढव्य पाईपची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोटिंगचे काम हाती घेण्यात आले. कोटिंगची त्रयस्थ संस्थेने तपासणी केली. त्याचा अहवाल अहवाल प्राप्त होताच मुख्य जलवाहिनीचे पाईप पैठणकडे रवाना केले जात आहेत. दोन दिवसांत सहा पाईप पाठविण्यात आले आहेत. पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी मनपाचे अधिकारी, पीएमसीचे अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून पाईप टाकले जात असल्याचे कंपनीचे मुख्य अधिकारी निर्णय अग्रवाल यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका