शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे काम सुरू होण्यास लागणार सहा महिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 19:32 IST

भूसंपादनानंतर होणार निविदा प्रक्रिया : आक्षेप, हरकतींची सुरू आहे सुनावणी

- विकास राऊतऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठणसह २२५३ कोटी रुपयांच्या चार महामार्गांचे भूमिपूजन २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले असले तरी प्रत्यक्षात त्या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू होण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत. औरंगाबाद ते पैठण सुमारे १६०० कोटींचा हा महामार्ग चौपदरी करण्यात येणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेबाबत आलेले आक्षेप, हरकतींच्या सुनावण्यानंतर निविदा प्रक्रिया होणार आहे. निविदा मागविल्यानंतर पुढे आणखी किती दिवस जातील, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भूमिपूजन झाल्याबरोबर महामार्गाचे काम सुरू होईल, असे नागरिकांना वाटत होते,परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यास सहा महिने लागणार आहेत. २४ एप्रिल २०२२ रोजी सोलापूर-धुळे हायवेअंतर्गत औरंगाबाद ते तेलवाडी व इतर तीन मिळून ३३१७ कोटींच्या चार महामार्ग प्रकल्पांच्या लोकार्पणासह औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.

औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक ७५२-ईचे रुंदीकरण १२ वर्षांपासून रखडले असून आता भूसंपादनासह चौपदरी डांबरीकरणाचे भूमिपूजन झाले आहे. भारतमाला प्रकल्पाचा भाग असलेला या महामार्गासाठी अंदाजित १६०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. १२ वर्षांपासून ‘लोकमत’ने वारंवार या रस्त्याच्या रुंदीकरणाचा पाठपुरावा शब्दबद्ध केला. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआय या तीन यंत्रणांच्या टोलवा-टोलवीत १२ वर्षे गेले. २०१० ते २०१३ या काळामध्ये पीडब्ल्यूडीकडून ३०० कोटींतून रस्ता करण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. नंतर एमएसआरडीसीचा डीपीआर मग, एनएचएआयकडे कामाची जबाबदारी दिली गेली. अखेर केंद्रीय दळणवळण खात्यांच्या योजनेत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश झाला. तरीही सहा महिने प्रत्यक्ष कामासाठी लागणार आहेत.

५० हून अधिक आले आहेत आक्षेपया महामार्गासाठी १०० हेक्टरच्या आसपास भूसंपादन करण्यात येणार असून, त्याविरोधात ५० हून अधिक आक्षेप आले आहेत. काही आक्षेप निकाली काढले असून अलायमेंट चेंज करण्यासह इतर आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आक्षेपांचा निपटारा झाल्यानंतर भूसंपादन सुरू होईल. त्यानंतर निविदेसाठी एनएचएआय मुख्यालय दिल्लीतून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात होईल.

९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर काम सुरू होईलभूमिपूजनाला आता एक महिना झाला आहे. भूसंपादन प्रक्रिया आता सुरू होण्यात आहे. मोजमाप झाल्यानंतर तीन ते चार महिने लागतील. ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू होत नाही. निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भूसंपादनाची रक्कम अदा करण्यात येईल. निविदा प्रक्रिया एनएचएआय मुख्यालयातून होणार आहे. त्यानंतर कंत्राटदार ठरेल,मग काम सुरू होईल. भूमिपूजन झाले की,लगेच काम सुरू होत नाही, बाकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काम सुरू होते.- अरविंद काळे, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका