शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नवीन योजनेचे काम सुरू होणार

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

कळमनुरी : शहरासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली.

कळमनुरी : शहरासाठी शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम एक ते दीड महिन्यात सुरू होणार आहे. या योजनेला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. इसापूर धरणापासून संपूर्ण शहरात व सर्व नवीन वस्त्यांत पाईपलाईन केली जाणार आहे. धरणाजवळ नवीन विहीर, पाणी स्टोरेज मशिन, शहराजवळ जलशुद्धीकरण केंद्र, नवीन वस्त्यांसह शहरातील पाईपलाईन या रकमेतून केल्या जाणार आहे. जुन्या पाईपलाईनचे पाणी काही वस्त्यांत येण्यासाठी अडचण निर्माण होत होती. शिवाय लिकेजेसही जास्त होते व नवीन वस्त्यात पाईपलाईन नव्हती. सध्या शहराला एक दिवसाआड प्रति माणसी ७० लिटर पाणी नळाद्वारे सोडल्या जात आहे. सध्या शहरात १ हजार ९९८ नळ कनेक्शन आहेत. नवीन पाणी पुरवठा योजनेनुसार नळ कनेक्शन वाढून न.प.च्या करातही भर पडणार आहे. सध्या इसापूर धरणातील १.३३ दलघमी पाणी न.प.ने आरक्षित केले आहे. ही पाणी पुरवठा योजना एक ते दीड वर्षात पूर्ण होवून सर्वच शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेसाठी खा. राजीव सातव, नगराध्यक्षा सादीया तबस्सूम म. रफीक आदींनी प्रयत्न केले. (वार्ताहर)