शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

जळगाव रस्त्याचे काम निधीअभावी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:52 IST

नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

ठळक मुद्दे दीडशे कि.मी.मध्ये पन्नास ठिकाणी धोकादायक खोदकाम

औरंगाबाद : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणजे औरंगाबाद- जळगाव होय. तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. १५० कि. मी. अंतरावरील या रस्त्यात पन्नास ठिकाणी कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. रात्री वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. मागील दीड महिन्यापासून रस्त्याचे काम निधी नसल्याचे कारण समोर करून बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक औरंगाबादहून जातात. औरंगाबाद ते जळगाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असताना तो सिमेंट पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीपेक्षा रस्ता रुंद करण्याचे निश्चित झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे रस्ता हस्तांतरित करण्यात आला. तब्बल १२०० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. 

औरंगाबाद ते फुलंब्रीपर्यंत रस्ता चौपदरी तर पुढे जळगावपर्यंत तीनपदरी ठेवण्यात येईल. डिसेंबर २०१७ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कंत्राटदाराने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रात्री रस्त्याच्या बाजूला असलेले खोल खड्डे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदार सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना करायला तयार नाही. दिवसभर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. औरंगाबाद-जळगाव रस्ता पूर्वी जेवढा खराब होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त आता कंत्राटदाराने खराब करून ठेवला आहे.

निधीअभावी काम बंद१२०० कोटी रुपयांच्या या कामासाठी नॅशनल हायवेने निधी उपलब्ध करून दिला होता. मागील दीड महिन्यापासून कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला सर्व यंत्रसामुग्री बांधून ठेवली आहे. निधी संपल्याने काम बंद झाल्याचे कंत्राटदाराचे कर्मचारी सांगत आहेत. निधी आल्याशिवाय काम सुरू होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. 

औरंगाबाद -जळगाव रस्त्यावरील प्रमुख गावेहर्सूल, सावंगी, चौका, बिल्डा फाटा, फुलंब्री, पाल फाटा, महाल किन्होळा फाटा, आळंद, केºहाळा फाटा, माणिकनगर, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा गाव, फर्दापूर, वाकोद, पहूर, नेरी, जळगाव.

संथगतीने कामहर्सूल गावापासून पुढे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कुठेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. विस्तारीकरणासाठी दोन्ही बाजूने मोठमोठे खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. हे काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की या रस्त्यावरील विविध गावांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बससेवा पूर्वीप्रमाणेचऔरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील एकही बस किंवा फेरी कमी करण्यात आलेली नाही. सर्वाधिक बसेस फुलंब्रीपर्यंत आहेत. बसची संख्या कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. जळगाव डेपोकडूनही बस कमी करण्यात आलेल्या नाहीत. - प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक

१० मार्चपर्यंत निधी येईलआंध्र प्रदेश येथील एका कंपनीने रस्ता विकसित करण्याचे काम घेतले आहे. कंपनीने आतापर्यंत केलेल्या कामाचे बिल नॅशनल हायवेकडे सादर केले आहे. तब्बल ४० कोटींची ही बिले आहेत. कंत्राटदाराला बिलाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. १० मार्चपर्यंत निधी येणार आहे. निधी येताच कंत्राटदार परत काम सुरू करणार आहे. -एल. एस. जोशी, अधीक्षक अभियंता, नॅशनल हायवे

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादfundsनिधी