शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव रस्त्याचे काम निधीअभावी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:52 IST

नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

ठळक मुद्दे दीडशे कि.मी.मध्ये पन्नास ठिकाणी धोकादायक खोदकाम

औरंगाबाद : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख रस्ता म्हणजे औरंगाबाद- जळगाव होय. तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करून या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. १५० कि. मी. अंतरावरील या रस्त्यात पन्नास ठिकाणी कंत्राटदाराने खोदकाम करून ठेवले आहे. रात्री वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. मागील दीड महिन्यापासून रस्त्याचे काम निधी नसल्याचे कारण समोर करून बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नॅशनल हायवेच्या या भोंगळ कारभाराचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे. 

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक औरंगाबादहून जातात. औरंगाबाद ते जळगाव रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असताना तो सिमेंट पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वीपेक्षा रस्ता रुंद करण्याचे निश्चित झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनएचएआयकडे रस्ता हस्तांतरित करण्यात आला. तब्बल १२०० कोटी रुपयांची निविदा काढून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. 

औरंगाबाद ते फुलंब्रीपर्यंत रस्ता चौपदरी तर पुढे जळगावपर्यंत तीनपदरी ठेवण्यात येईल. डिसेंबर २०१७ मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कंत्राटदाराने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रात्री रस्त्याच्या बाजूला असलेले खोल खड्डे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ पेक्षा अधिक निष्पाप दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदार सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना करायला तयार नाही. दिवसभर रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. औरंगाबाद-जळगाव रस्ता पूर्वी जेवढा खराब होता, त्यापेक्षा कितीतरी जास्त आता कंत्राटदाराने खराब करून ठेवला आहे.

निधीअभावी काम बंद१२०० कोटी रुपयांच्या या कामासाठी नॅशनल हायवेने निधी उपलब्ध करून दिला होता. मागील दीड महिन्यापासून कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला सर्व यंत्रसामुग्री बांधून ठेवली आहे. निधी संपल्याने काम बंद झाल्याचे कंत्राटदाराचे कर्मचारी सांगत आहेत. निधी आल्याशिवाय काम सुरू होणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. 

औरंगाबाद -जळगाव रस्त्यावरील प्रमुख गावेहर्सूल, सावंगी, चौका, बिल्डा फाटा, फुलंब्री, पाल फाटा, महाल किन्होळा फाटा, आळंद, केºहाळा फाटा, माणिकनगर, सिल्लोड, गोळेगाव, अजिंठा गाव, फर्दापूर, वाकोद, पहूर, नेरी, जळगाव.

संथगतीने कामहर्सूल गावापासून पुढे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कुठेच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. विस्तारीकरणासाठी दोन्ही बाजूने मोठमोठे खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. हे काम एवढ्या संथ गतीने सुरू आहे की या रस्त्यावरील विविध गावांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.

बससेवा पूर्वीप्रमाणेचऔरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील एकही बस किंवा फेरी कमी करण्यात आलेली नाही. सर्वाधिक बसेस फुलंब्रीपर्यंत आहेत. बसची संख्या कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. जळगाव डेपोकडूनही बस कमी करण्यात आलेल्या नाहीत. - प्रशांत भुसारी, विभागीय नियंत्रक

१० मार्चपर्यंत निधी येईलआंध्र प्रदेश येथील एका कंपनीने रस्ता विकसित करण्याचे काम घेतले आहे. कंपनीने आतापर्यंत केलेल्या कामाचे बिल नॅशनल हायवेकडे सादर केले आहे. तब्बल ४० कोटींची ही बिले आहेत. कंत्राटदाराला बिलाचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे निधी नाही. १० मार्चपर्यंत निधी येणार आहे. निधी येताच कंत्राटदार परत काम सुरू करणार आहे. -एल. एस. जोशी, अधीक्षक अभियंता, नॅशनल हायवे

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादfundsनिधी