शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:53 IST

काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली. 

औरंगाबाद : काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली. 

सागर लॉन्सवर दिवसभर हे शिबीर चालले. प्रारंभी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आजच्या राजकारणाचे वास्तव मांडले व सरकारवर टीकेची झोड उठवली. तत्पूर्वी मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांनी दीप प्रज्वलित केले.  ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ. रत्नाकर महाजन यांनी मांडणी केली व नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गॉड फादर करीत तो कसा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे, याकडे लक्ष वेधले.२०१९ च्या निवडणुकीत या हुकूमशाही प्रवृत्तीचा, झुंडशाहीचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले. 

माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी ‘उपेक्षित मागासवर्गीयांबद्दल काँग्रेसची भूमिका’ या विषयावर विवेचन केले. उपहासगर्भ आणि विनोदी शैलीतील भाषणात त्यांनी मोदींच्या भाषणशैलीची नक्कल केली. शांताबाई या गाण्याच्या चालीवर ओळी सादर केल्या. उपेक्षित मागासांसोबत काँग्रेस सतत राहत आली आहे, हे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे किती फायदे होत आहेत, हे सांगितले. काँग्रेसचे सोशल इंजिनिअरिंगचे धोरण स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी केले. 

महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांचे हिंदीतून जोशपूर्ण भाषण झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची कशी अधोगती होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पतंजलीचाच एक दिवस मोठा घोटाळा उघडकीस येईल, अशी शक्यता अभिजित सपकाळ यांनी सोशल मीडियाच्या सादरीकरणातून व्यक्त केली.  देवेंद्र फडणवीस सरकार सहकार चळवळीच्या कसे मुळावर उठले आहे, याचे सुंदर विवेचन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. देशाची आर्थिक परिस्थिती या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश पाडला व अच्छे दिन म्हणण्याने नव्हे तर विकास दर किती वाढला हे महत्त्वाचे असते, हे त्यांनी पटवून दिले. आज लोकांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. तो जागवण्याची गरज आहे. कारण कोणताही वर्ग आज खुश नाही. यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा केली; पण  ५६ भाजप आल्या तरी देश काँग्रेसमुक्त होऊ शकणार नाही, असे उद्गार विखे पाटील यांनी काढले. विधान परिषदेतील उपसभापती माणिक ठाकरे यांचेही यावेळी भाषण झाले. श्याम उमाळकर, आ. अब्दुल सत्तार आणि डॉ. पवन डोंगरे यांनी शिबिराच्या कामकाजाचे सूत्रसंचालन केले. मंचावर वरिष्ठ पदाधिका-यांची उपस्थिती होती. 

क्षणचित्रे : - या शिबिराच्या निमित्ताने अलीकडच्या काळातील कार्यकर्त्यांचे अशा पद्धतीचे एकत्रीकरण पहिल्यांदाच पाहावयास मिळाले. त्यातही एक गणवेश व डोक्यावर गांधीटोपी हे चित्र शिस्तीचे दर्शन घडवत होते. - सकाळी १०.०५ ही ध्वजारोहणाची वेळ होती; पण प्रत्यक्षात १०.५० वा. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व नंतर सेवादलाने त्यांना सलामी दिली.- एका भल्या मोठ्या हारात सामावून घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंचावरील पदाधिकारी, वक्ते व नेत्यांच्या गळ्यात काँग्रेसचे तिरंगी उपरणे झळकत होते. - अभिजित सपकाळ यांचे सोशल मीडियावरील सादरीकरण प्रशिक्षणार्थींना खूपच भावले. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी काय काय आश्वासने दिली होती व नंतर ते त्यापासून कसे दूर गेले, हे सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना टाळ्यांची दाद मिळत गेली.- आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांना व धुळे जिल्ह्यातील शहीद शेतकरी धर्मा पाटील यांना यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.- शिबिराच्या शेवटी, अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या ५३ व बहुजन क्रांती दलाच्या १०४ कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाबा तायडे व त्यांच्या सहका-यांनी हा प्रवेश घडवून आणला.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMohan Prakashमोहन प्रकाश