शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

ऊन अन् ढगाळ वातावरण, पाऊस मात्र गायब

By admin | Published: August 04, 2014 12:00 AM

विठ्ठल भिसे, पाथरी पावसाळ्याचे दिवस असूनही ढगाळ वातावरणामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे़

विठ्ठल भिसे, पाथरीपावसाळ्याचे दिवस असूनही ढगाळ वातावरणामध्ये उन्हाची तीव्रता वाढत आहे़ गेल्या आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणतही पाऊस पडला नाही़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस चिंता वाढू लागली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे़ विहिरींच्या पाणीपातळी कमी झाल्याने पाण्यावर लागवड केलेल्या कापूस पिकालाही धोका निर्माण झाला आहे़ २००५ नंतर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ निर्माण झाला नाही़ तीन-चार वर्षांपासून तर सतत या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे़ पावसाच्या पाण्यावरच या भागातील शेती अवलंबून आहे़ गोदावरीचे पात्रातील बंधारे आणि जायकवाडीचा डावा कालवा हे दोन पाण्याचे स्त्रोत समाधान देणारे असले तरी मुबलक पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता लागून राहिली आहे़ यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस पडतो की नाही याची साशंकता निर्माण झाली होती़ गतवर्षी उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना झोडपून काढले तर पावसाळ्यामध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागले आहे़ आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आहे़ परंतु, पावसाच्या पाण्याचा थेंबही पडत नाही़ जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडा पाऊस झाला़ याच पावसावर या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली़ पाऊस न पडल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली़ दुबार पेरणी करूनही बियाणे मात्र उगवलेच नाही़ तालुक्यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या ४० टक्के एवढा भाग सोयाबीनचा पेरा आहे़ बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कोरड्या जमिनीत केला़ अर्धे सोयाबीन उगवले अन् अर्ध्याची नासाडी झाली ही परिस्थिती तालुक्यात सर्वच भागात आहे़ एक एकर शेतात कापसाच्या दोन बॅग लागायच्या़ परंतु, पावसाअभावी तूट झाल्याने शेतकऱ्यांनी प्रती एकरी तीन बॅग कापूस लावूनही त्याची उगवण झाली नाही़ पर्यायाने आज शेती शिवाराचे माळरान झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे़ शेती पिकाची अशी अवस्था असतानाही शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी पूर्णत: खालावली आहे़ वरखेड शिवारामध्ये रामदास ढगे यांच्या शेतातील विहिरीचे पाणी आटलेच नाही़ परंतु, यावर्षी पावसाळ्याच्या दिवसात या विहिरीच्या पाण्यातून जनावरांसाठी असणारा पाण्याचा हौदही भरत नाही़ नदी, नाले, कोरडे आहेत़ शेतात पाऊस नसल्याने जनावरांना चारा उपलब्ध नाही़ यामुळे तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ शेतकरी पावसाच्या आशेवर दररोज पाऊस येईल, या आशेवर शेतकरी दिवस काढत आहेत़ पाऊस पडत नसल्याने आणि शेतातील पिकांची परिस्थिती पाहून शेतकरी आता शेताकडे फिरकताना दिसत नाहीत़ आज पाऊस पडेल म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ बाजारपेठेवरही परिणामपावसाळ्याच्या दिवसात बाजारपेठेमध्ये गर्दी असते़ कृषी दुकानावर तर उभे रहायलाही जागा नसते़ परंतु, पाऊस गायब झाल्याने सध्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे़ किरणा दुकानांपासून सर्वच व्यापारी दिवसभर ग्राहकांसाठी तरसत असल्याचे दिसून येत आह़े पाऊस पडला नाही तर सर्व आर्थिक नाडीच बिघडणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गातूनही व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत़