शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

जुन्या नाण्यांच्या माध्यमातून अनुभवला समृद्ध इतिहास, आशुतोष पाटील या विद्यार्थ्यांचा थक्क करणारा संग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 20:09 IST

नाणे संग्राहक व अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या संग्रहातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ अशा ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन गुरुवारी (दि. ३०) देवगिरी महाविद्यालयात पार पडले.

मयूर देवकर

औरंगाबाद : नाणे संग्राहक व अभ्यासक आशुतोष पाटील यांच्या संग्रहातील अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ अशा ऐतिहासिक नाण्यांचे प्रदर्शन गुरुवारी (दि. ३०) देवगिरी महाविद्यालयात पार पडले. इ.स. पूर्व ६०० ते स्वातंत्र्योत्तर काळातील विविध नाणी व नोटा पाहण्याची संधी याद्वारे विद्यार्थ्यांना मिळाली.

प्रदर्शनामध्ये प्राचीन नाण्यांमध्ये पंचमार्क नाणी, शाक्य, विदर्भ, विदिषा, उज्जैनसारख्या अनेक गणजनपदांची नाणी, सातवाहन काळातील विविध राज्यकर्ते, हुन, कुशान, गुप्त, पश्चिम क्षत्रिप नाणी, इ.स. पूर्व दोनमधील गजलक्ष्मी नाणे ठेवण्यात आली होती. ‘साधारणपणे इ.स. पूर्व सहाव्या शतकात भारतात सर्वप्रथम पंचमार्क नाण्यांची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने चांदीची नाणी तयार करण्यात आली. ही नाणी ‘आहत’ पद्धतीने म्हणजे नाण्याच्या एका बाजूस वेली, सूर्य, पर्वत, प्राणी, पक्षी अशा विविध चिन्हांचे ठसे उमटवून तयार केली जात असत, अशी माहिती पाटील यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुवर्ण होन, अर्धी शिवराई, तसेच सूर्य, चंद्र, बेलाचे पान, शिवपिंड, त्रिशूळ अशी चिन्हे असलेली त्या काळातील विविध नाणी यामध्ये ठेवण्यात आली होती. शिवराईच्या जवळपास दीडशेच्यावर आवृत्त्या आढळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

मुघलकालीन नाण्यांमध्ये अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुघलक, औरंगजेब, अकबर, शहाजहाँ, शहा आलम, मोहम्मद शहा, मुर्तुजा निजाम, बुºहाण निजाम राजवटीतील चांदी व तांब्यांची नाणी, ब्रिटिशकालीन भारताच्या नाण्यांमध्ये ईस्ट इंडिया कंपनी, सातवा एडवर्ड, पाचवा जॉर्ज, राणी व्हिक्टोरिया, सहावा जॉर्ज यांच्या नाणी आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील अर्ध्या आण्यापासून ते पाचशेच्या नव्या नोटेचा प्रदर्शनात समावेश होता.

 त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या प्रदर्शनामध्ये माल्टा, रवांडा, साऊथ कोरिया, मोझाम्बिक्वे, लक्झबर्ग अशा तीस ते चाळीस देशांतील नोटा पाहायला मिळाल्या. त्यामध्ये व्हिएतनामची दोन लाखांची नोट आणि भारताचा दीडशे रुपयांचा क्वॉईन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

‘पुरातत्वाच्या दृष्टीने नाणी अमूल्य पुरावा असतात. इतिहासातील अनेक राजांची नावे, त्यांचे प्रदेश आणि कालखंड याचा उलगडा नाण्यांमुळेच झाला आहे. कालौघात विस्मृतीत गेलेल्या अनेक साम्राज्यांचा इतिहास, जीवनपद्धती नाण्यांमुळेच ज्ञात होतो’, असे पाटील यांनी नाण्यांचे महत्त्व विशद करताना सांगितले.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद