शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा

By विजय पाटील | Updated: November 9, 2023 19:25 IST

धरणात पाणी पण वसमतमध्ये टंचाई; वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.

हिंगोली: वसमत शहरात मागच्या सहा-सात महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. कधी बारा दिवसाला तर कधी आठ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यात  कमीदाबाचा वीजपुरवठा निर्माण होत आहे. त्यामुळे विजेची अधिक भर त्यात पडली आहे. १० ते १५ दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांत रोष निर्माण होत आहे. गुरुवारी  दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान संतप्त महिलांनी पाण्यासह विविध मागण्यांसाठी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यधिकारी अशुतोष चिंचाळकर यांनी महावितरण कार्यालयाला पत्र देऊन सिध्देश्वर येथील पंपहाऊला उच्चदाब विजपुरवठा देण्यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे मागणी केली आहे. त्या मागणीची अद्याप दखल घेतल्या गेली नाही. शहरातील ब्राह्मण गल्ली, भोसले गल्ली या भागात नळांना पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यासह अतिवृष्टीत गाव प्राचिन तलाव फुटला होता. अद्याप त्या तलावाची दुरुस्ती केली नसून तलावाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, गावात डासांचा प्रभाव वाढला असल्याने तापीच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी चिंचाळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, सुनील काळे, काशिनाथ भोसले यांच्यासह घागर मोर्चा घेऊन आलेल्या महिलांची उपस्थिती होती.

शहरातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न...शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिध्देश्वर येथिल पंपहाऊला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. चार दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयाला पत्र देऊन उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.- अशुतोष चिंचाळकर, मुख्यधिकारी, वसमत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी