शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महिलांचा ऐन दिवाळीतच वसमत नगरपालिकेवर घागर मोर्चा

By विजय पाटील | Updated: November 9, 2023 19:25 IST

धरणात पाणी पण वसमतमध्ये टंचाई; वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.

हिंगोली: वसमत शहरात मागच्या सहा-सात महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. कधी बारा दिवसाला तर कधी आठ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यात  कमीदाबाचा वीजपुरवठा निर्माण होत आहे. त्यामुळे विजेची अधिक भर त्यात पडली आहे. १० ते १५ दिवसांआड शहरात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांत रोष निर्माण होत आहे. गुरुवारी  दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान संतप्त महिलांनी पाण्यासह विविध मागण्यांसाठी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वसमत शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यधिकारी अशुतोष चिंचाळकर यांनी महावितरण कार्यालयाला पत्र देऊन सिध्देश्वर येथील पंपहाऊला उच्चदाब विजपुरवठा देण्यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे मागणी केली आहे. त्या मागणीची अद्याप दखल घेतल्या गेली नाही. शहरातील ब्राह्मण गल्ली, भोसले गल्ली या भागात नळांना पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. यासह अतिवृष्टीत गाव प्राचिन तलाव फुटला होता. अद्याप त्या तलावाची दुरुस्ती केली नसून तलावाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, गावात डासांचा प्रभाव वाढला असल्याने तापीच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी चिंचाळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, सुनील काळे, काशिनाथ भोसले यांच्यासह घागर मोर्चा घेऊन आलेल्या महिलांची उपस्थिती होती.

शहरातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न...शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिध्देश्वर येथिल पंपहाऊला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. चार दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयाला पत्र देऊन उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे.- अशुतोष चिंचाळकर, मुख्यधिकारी, वसमत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी