शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा जन्मदर कमी, पण जास्त कोण जगतो; पुरुष की स्त्री?

By मुजीब देवणीकर | Updated: December 9, 2022 15:42 IST

औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : पुरुषांच्या तुलनेत अलीकडे महिलांचा जन्मदर कमी झाला आहे. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. त्यात ४ हजार ५६५ पुरुष, तर २ हजार ६२१ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास पन्नास टक्केच आहे. या मागची नेमकी कारणे तरी काय आहेत?

साडेचार हजार पुरुष, अडीच हजार महिलांचा मृत्यूमागील दहा महिन्यांच्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येते की, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते याची वेगवेगळी कारणे असू शकतात. बदलत असलेली जीवनशैली, ताणतणाव, पुरुषांचे कष्ट आदी गोष्टींमुळे पुरुषांचे आयुष्य कमी झाले, असे म्हणता येईल.

पुरुष मृत्यूची अनेक कारणेपुरुषांच्या मृत्यूची अनेक कारणे असतात. विविध आजार, ताणतणाव, व्यसन आदी कारणांमुळे मृत्यू जास्त असू शकतात. पुरुष आपल्या शरीराची कमी काळजी घेतात.- डॉ. वर्षा सातपुते, निसर्गोपचार तज्ज्ञ

महिलांची सहनशक्ती जास्तनिसर्गाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना ताणतणाव, काम आदी बाबींची सहनशक्ती जास्त दिली आहे. पुरुषांमध्ये ‘स्ट्रेस’ सहन करण्याची क्षमता कमी असते. खाण्या-पिण्याच्या बाबतीतही अनेकदा पुरुष दुर्लक्ष करतात. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेह, रक्तदाब आदी आजार असले तरी योग्य उपचार घेतले पाहिजेत.- डॉ. स्नेहा गडप्पा, स्त्री रोग तज्ज्ञ

मृत्यूची आकडेवारी काय सांगते?महिना- पुरुष- महिलाजानेवारी- ४८९ -२७९फेब्रुवारी- ५३९-२७२मार्च- ४९५-२७७एप्रिल- ३९८-२२४मे- ४२३-२३१जून- ३८९- २१४जुलै- ३६७-२४१ऑगस्ट-५०५-२८८सप्टेंबर- ५३७- ३०७ऑक्टोबर- ४२३-२८८एकूण-४,५६५-२,६२१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य