शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले!

By मुजीब देवणीकर | Updated: July 25, 2023 12:25 IST

विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा? शासकीय कार्यालयांमधील अधिकारी त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कायद्याखाली दररोज शेकडोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होतात. प्रत्येक कार्यालयात ठरावीक आठ ते दहा कार्यकर्तेच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करतात. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरश: मेटाकुटीला आणले आहे. विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अत्यंत उपयुक्त शासकीय माहिती सर्वसामान्यांना एका साध्या अर्जावर उपलब्ध होऊ लागली. मागील काही वर्षांपासून या माहिती अधिकाराचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. महापालिकेत नगररचना, अतिक्रमण हटाव विभाग, अस्थापणा, लेखा, कामगार, आदी विभागात, तर दररोज किमान आठ ते दहा अर्ज हमखास येतात. विशेष बाब म्हणजे ठरावीक मंडळींच वेगवेगळी माहिती विचारत असतात. माहिती दिल्यानंतरही उपप्रश्न टाकून वेगळी माहितीचे अर्ज टाकतात. या प्रकाराला अधिकारी व कर्मचारी प्रचंड कंटाळले आहेत. वारंवार माहिती कोणत्या उद्देशाने विचारण्यात आली हेसुद्धा आता अधिकाऱ्यांच्या लक्षात येत आहे. काही अर्जदारांची तर नावेसुद्धा पाठ झाली.

हा प्रकार इतर शासकीय कार्यालयांमध्ये आहे का? याचा कानोसा काही अधिकाऱ्यांनी घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. महापालिकेत त्रास देणारेच जिल्हा परिषद, नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसील, पुरवठा, भूमी अभिलेख, तसेच सार्वजनिक बांधकाम, घाटी, समाजकल्याण, आदी ठिकाणी विशिष्ट मंडळीच अर्ज करीत असल्याचे समोर आले. या गंभीर प्रश्नावर अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक शासकीय कार्यालयातील विविध विभागात वारंवार अर्ज देणारे कोण? याची यादीच तयार करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. ही यादी पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

मनपात झाला होता एकदा प्रयोगसात वर्षांपूर्वी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत वारंवार त्रास देणाऱ्यांची यादी तयार करून थेट पोलिस आयुक्तांना दिली होती. त्यामुळे अनेक दिवस माहिती अधिकारचा अर्ज घेऊन येणारे गायब झाले होते.

माहिती द्यावीच लागतेमहापालिकेच्या विविध विभागांत अनेक जण माहिती अधिकारात अर्ज करतात. कायद्यानुसार आम्हाला माहिती द्यावीच लागते. अनेक जण वारंवार अर्ज करतात, त्यानंतरही माहिती द्यावी लागते. अन्यथा अपिलात कर्मचाऱ्यांना दंड लागतो. माहिती काढण्यासाठी अनेकदा विलंब होतो.-ए.बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा.

यंत्रणेवर ताण वाढतोयसार्वजनिक कामाची माहिती कोणी मागत असेल तर ठीक आहे, ज्यांचा जिल्ह्यातील सार्वजनिक कामाशी कुठलाही संबंध नाही, त्यांचेही अर्ज येत आहेत. त्यामागे त्यांचा हेतू काय, हे सुद्धा स्पष्ट नसते. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढतोय. हे त्रासदायक ठरत आहे.- डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी