शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काही देणे - घेणे नसताना उचापती; उदंड झाले माहिती ‘अधिकार’ वाले!

By मुजीब देवणीकर | Updated: July 25, 2023 12:25 IST

विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा? शासकीय कार्यालयांमधील अधिकारी त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कायद्याखाली दररोज शेकडोंच्या संख्येने अर्ज प्राप्त होतात. प्रत्येक कार्यालयात ठरावीक आठ ते दहा कार्यकर्तेच माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करतात. त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरश: मेटाकुटीला आणले आहे. विशिष्ट हेतूसाठी अर्ज करणाऱ्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अत्यंत उपयुक्त शासकीय माहिती सर्वसामान्यांना एका साध्या अर्जावर उपलब्ध होऊ लागली. मागील काही वर्षांपासून या माहिती अधिकाराचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. महापालिकेत नगररचना, अतिक्रमण हटाव विभाग, अस्थापणा, लेखा, कामगार, आदी विभागात, तर दररोज किमान आठ ते दहा अर्ज हमखास येतात. विशेष बाब म्हणजे ठरावीक मंडळींच वेगवेगळी माहिती विचारत असतात. माहिती दिल्यानंतरही उपप्रश्न टाकून वेगळी माहितीचे अर्ज टाकतात. या प्रकाराला अधिकारी व कर्मचारी प्रचंड कंटाळले आहेत. वारंवार माहिती कोणत्या उद्देशाने विचारण्यात आली हेसुद्धा आता अधिकाऱ्यांच्या लक्षात येत आहे. काही अर्जदारांची तर नावेसुद्धा पाठ झाली.

हा प्रकार इतर शासकीय कार्यालयांमध्ये आहे का? याचा कानोसा काही अधिकाऱ्यांनी घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. महापालिकेत त्रास देणारेच जिल्हा परिषद, नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी कार्यालयात, तहसील, पुरवठा, भूमी अभिलेख, तसेच सार्वजनिक बांधकाम, घाटी, समाजकल्याण, आदी ठिकाणी विशिष्ट मंडळीच अर्ज करीत असल्याचे समोर आले. या गंभीर प्रश्नावर अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक शासकीय कार्यालयातील विविध विभागात वारंवार अर्ज देणारे कोण? याची यादीच तयार करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. ही यादी पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

मनपात झाला होता एकदा प्रयोगसात वर्षांपूर्वी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत वारंवार त्रास देणाऱ्यांची यादी तयार करून थेट पोलिस आयुक्तांना दिली होती. त्यामुळे अनेक दिवस माहिती अधिकारचा अर्ज घेऊन येणारे गायब झाले होते.

माहिती द्यावीच लागतेमहापालिकेच्या विविध विभागांत अनेक जण माहिती अधिकारात अर्ज करतात. कायद्यानुसार आम्हाला माहिती द्यावीच लागते. अनेक जण वारंवार अर्ज करतात, त्यानंतरही माहिती द्यावी लागते. अन्यथा अपिलात कर्मचाऱ्यांना दंड लागतो. माहिती काढण्यासाठी अनेकदा विलंब होतो.-ए.बी. देशमुख, शहर अभियंता, मनपा.

यंत्रणेवर ताण वाढतोयसार्वजनिक कामाची माहिती कोणी मागत असेल तर ठीक आहे, ज्यांचा जिल्ह्यातील सार्वजनिक कामाशी कुठलाही संबंध नाही, त्यांचेही अर्ज येत आहेत. त्यामागे त्यांचा हेतू काय, हे सुद्धा स्पष्ट नसते. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढतोय. हे त्रासदायक ठरत आहे.- डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी