शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ‘लम्पी’ने दगावली २७६ जनावरे; २०० पशुपालकांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा

By विजय सरवदे | Updated: October 23, 2023 18:22 IST

‘लम्पी’ साथ आता नियंत्रणात; या रोगावर नियंत्रण मिळविण्यात पशुसंवर्धन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लम्पी हा विषाणूजन्य त्वचारोग आता नियंत्रणात आला आहे. जिल्हाभरात सध्या २९८ जनावरे बाधित असून, गेल्या सहा महिन्यांत बाधित २७६ गोवंशीय जनावरे दगावली आहेत. यापैकी ७१ पशुपालकांना १६ लाख ३९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.असे असले तरी आणखी सुमारे २०० पशुपालक अर्थसहाय्यासाठी रांगेतच आहेत.

‘लम्पी’मुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासनाने ३१ मार्चनंतर अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया थांबविली होती. मात्र, राज्यभरात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर अर्थसहाय्य सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून ‘लम्पी’ने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला होता. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गोठ्यांची स्वच्छता, फवारणी तसेच युद्धपातळीववर लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आता पाऊस कमी झाल्यामुळे गोमाशा आणि गोचिडाचे प्रमाणही कमी झाले असून, पशुपालकांमध्ये जागृती आली आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यात पशुसंवर्धन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. दरम्यान, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी जनावरांना पौष्टिक चारा द्यावा, बाधित जनावरांना क्वारंटाइन (विलगीकरण) करावे. गोठे स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रदीप झोड यांनी केले आहे.

समितीसमोर १२० प्रस्ताव सादर ‘लम्पी’मुळे मयत गाईसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. गेल्या सहा महिन्यांत दगावलेल्या गोवंश पशुधनाचे अर्थसहाय्याचे ७१ प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात १६ लाख ३९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले. उर्वरित १२० प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीसमोर सादर करण्यात आले आहेत, तर ८० ते ८५ प्रस्तावांची छाननी सुरू आहे. तालुकास्तरावरून जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील, त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी समितीसमोर सादर करण्यात येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी