शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सहा महिन्यांत ‘लम्पी’ने दगावली २७६ जनावरे; २०० पशुपालकांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा

By विजय सरवदे | Updated: October 23, 2023 18:22 IST

‘लम्पी’ साथ आता नियंत्रणात; या रोगावर नियंत्रण मिळविण्यात पशुसंवर्धन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लम्पी हा विषाणूजन्य त्वचारोग आता नियंत्रणात आला आहे. जिल्हाभरात सध्या २९८ जनावरे बाधित असून, गेल्या सहा महिन्यांत बाधित २७६ गोवंशीय जनावरे दगावली आहेत. यापैकी ७१ पशुपालकांना १६ लाख ३९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.असे असले तरी आणखी सुमारे २०० पशुपालक अर्थसहाय्यासाठी रांगेतच आहेत.

‘लम्पी’मुळे दगावलेल्या गोवंशीय पशुधनाच्या पालकांना शासनाने ३१ मार्चनंतर अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया थांबविली होती. मात्र, राज्यभरात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर अर्थसहाय्य सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. साधारणपणे सप्टेंबर २०२२ पासून ‘लम्पी’ने संपूर्ण जिल्हा कवेत घेतला होता. यामुळे १२ हजारांहून अधिक जनावरे बाधित झाली. त्यापैकी १ हजार ३१९ जनावरे दगावली. उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गोठ्यांची स्वच्छता, फवारणी तसेच युद्धपातळीववर लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आता पाऊस कमी झाल्यामुळे गोमाशा आणि गोचिडाचे प्रमाणही कमी झाले असून, पशुपालकांमध्ये जागृती आली आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यात पशुसंवर्धन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. दरम्यान, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी जनावरांना पौष्टिक चारा द्यावा, बाधित जनावरांना क्वारंटाइन (विलगीकरण) करावे. गोठे स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रदीप झोड यांनी केले आहे.

समितीसमोर १२० प्रस्ताव सादर ‘लम्पी’मुळे मयत गाईसाठी ३० हजार रुपये, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार, तर वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य संबंधित पशुपालकांना देण्यात येते. गेल्या सहा महिन्यांत दगावलेल्या गोवंश पशुधनाचे अर्थसहाय्याचे ७१ प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात १६ लाख ३९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले. उर्वरित १२० प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीसमोर सादर करण्यात आले आहेत, तर ८० ते ८५ प्रस्तावांची छाननी सुरू आहे. तालुकास्तरावरून जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील, त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी समितीसमोर सादर करण्यात येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी