शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऐन हिवाळ्यात शहराची तहान १८ एमएलडीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:34 IST

उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांकडून दबावतंत्राचा अवलंब;मनपा कर्मचाऱ्यांना धमक्या पाणीपुरवठा विभागात नोकरी नको म्हणण्याची कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वेळ 

औरंगाबाद : उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे. एकीकडे विविध शासकीय कार्यालयांनी मनपाकडे पाण्यासाठी केलेली मागणी थक्क करणारी आहे. दुसरीकडे वॉर्डात नवीन जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून लोकप्रतिनिधींचे दबावतंत्र सुरू झाले असून, महापालिका पाणीपुरवठा विभाग संकटात सापडला आहे. या विभागात नोकरीच नको, अशी अधिकारी व कर्मचारी मागणी करीत आहेत.

घाटीला हवे १५ लाख लिटर पाणीघाटी रुग्णालयात अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. स्वतंत्र विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि पाण्यासाठी उद्घाटन रखडले आहे. घाटी रुग्णालयाने महापालिकेकडे तब्बल १५ लाख लिटर दररोज पाण्याची मागणी केली आहे. दीड एमएलडी पाणी दररोज घाटीला कोठून द्यावे हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. पाणी न दिल्यास १०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर पाणी फेरण्याची वेळ येईल. डेंटल आणि कॅन्सर हॉस्पिटलला दररोज पाणी  देण्यात येत आहे. त्यांनाही अतिरिक्त पाणी हवे आहे.

पोलीस आयुक्तालयाला ५ लाख लिटरपोलीस आयुक्तालयाची नवीन अद्ययावत इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. या इमारतीसह कर्मचारी निवासस्थानांसाठी दररोज ५ लाख लिटर पाण्याची मागणी मनपाकडे आली आहे. सध्या मनपाकडून देण्यात येणारे पाणी कमी पडत आहे. ०.५ एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी मनपाकडे करण्यात आली आहे. हे पाणी द्यायचे म्हटले तर ज्युबिली पार्क पाण्याच्या टाकीवर ताण वाढणार आहे.

चिकलठाणा रुग्णालयाला हवे पाणीचिकलठाण्यात २०० खाटांचे अद्ययावत सिव्हिल हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला दररोज १ एमएलडी पाणी हवे. महापालिकेने फक्त २ इंचाचे नळ दिले आहेत. या पाण्यावर रुग्णालयाचे कामकाज अत्यंत अवघड आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागल्याने पाण्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाढली तहानचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज किमान ५ विमाने ये-जा करतात. शेकडो प्रवासी त्यात असतात. विमानतळाला मागील काही वर्षांपासून पाणी कमी पडत आहे. मनपाने विमानतळाला फक्त ४ इंचाचे एक नळ कनेक्शन दिले आहे. दररोज २५ हजार लिटर पाण्याची किमान गरज पडते. मनपाने किमान ८ इंचाचे कनेक्शन तरी द्यावे, असे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

वॉर्डांमधील ५० लाईनसमांतर जलवाहिनीच्या कंपनीने शहरातील ३० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकून ठेवल्या आहेत. या जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून नगरसेवक मनपा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकत आहेत. मनपा निवडणुका आता १४ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून धमकीसत्रही सुरू झाले आहे.

१८ एमएलडीची मागणी वाढली जायकवाडीहून दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणी शहरात येते.या पाण्यावर शहरातील ११५ वॉर्डांमधील नागरिकांची तहान भागत आहे. मनपाकडे आता १८ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाने पाणी न दिल्यास मोठे शासकीय प्रकल्प रखडण्याच्या मार्गावर आहेत. मनपाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यातून १८ एमएलडी पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा होईल.जायकवाडीहून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे सध्या तरी मनपाकडे कोणतेच नियोजन नाही.दोन ते तीन वर्षे शहरात वाढीव पाणी येण्याची शक्यताही नाही. उपलब्ध पाण्यातून मनपाला वाट काढावी लागणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ