शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन हिवाळ्यात शहराची तहान १८ एमएलडीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:34 IST

उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांकडून दबावतंत्राचा अवलंब;मनपा कर्मचाऱ्यांना धमक्या पाणीपुरवठा विभागात नोकरी नको म्हणण्याची कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वेळ 

औरंगाबाद : उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे. एकीकडे विविध शासकीय कार्यालयांनी मनपाकडे पाण्यासाठी केलेली मागणी थक्क करणारी आहे. दुसरीकडे वॉर्डात नवीन जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून लोकप्रतिनिधींचे दबावतंत्र सुरू झाले असून, महापालिका पाणीपुरवठा विभाग संकटात सापडला आहे. या विभागात नोकरीच नको, अशी अधिकारी व कर्मचारी मागणी करीत आहेत.

घाटीला हवे १५ लाख लिटर पाणीघाटी रुग्णालयात अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. स्वतंत्र विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि पाण्यासाठी उद्घाटन रखडले आहे. घाटी रुग्णालयाने महापालिकेकडे तब्बल १५ लाख लिटर दररोज पाण्याची मागणी केली आहे. दीड एमएलडी पाणी दररोज घाटीला कोठून द्यावे हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. पाणी न दिल्यास १०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर पाणी फेरण्याची वेळ येईल. डेंटल आणि कॅन्सर हॉस्पिटलला दररोज पाणी  देण्यात येत आहे. त्यांनाही अतिरिक्त पाणी हवे आहे.

पोलीस आयुक्तालयाला ५ लाख लिटरपोलीस आयुक्तालयाची नवीन अद्ययावत इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. या इमारतीसह कर्मचारी निवासस्थानांसाठी दररोज ५ लाख लिटर पाण्याची मागणी मनपाकडे आली आहे. सध्या मनपाकडून देण्यात येणारे पाणी कमी पडत आहे. ०.५ एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी मनपाकडे करण्यात आली आहे. हे पाणी द्यायचे म्हटले तर ज्युबिली पार्क पाण्याच्या टाकीवर ताण वाढणार आहे.

चिकलठाणा रुग्णालयाला हवे पाणीचिकलठाण्यात २०० खाटांचे अद्ययावत सिव्हिल हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला दररोज १ एमएलडी पाणी हवे. महापालिकेने फक्त २ इंचाचे नळ दिले आहेत. या पाण्यावर रुग्णालयाचे कामकाज अत्यंत अवघड आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागल्याने पाण्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाढली तहानचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज किमान ५ विमाने ये-जा करतात. शेकडो प्रवासी त्यात असतात. विमानतळाला मागील काही वर्षांपासून पाणी कमी पडत आहे. मनपाने विमानतळाला फक्त ४ इंचाचे एक नळ कनेक्शन दिले आहे. दररोज २५ हजार लिटर पाण्याची किमान गरज पडते. मनपाने किमान ८ इंचाचे कनेक्शन तरी द्यावे, असे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

वॉर्डांमधील ५० लाईनसमांतर जलवाहिनीच्या कंपनीने शहरातील ३० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकून ठेवल्या आहेत. या जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून नगरसेवक मनपा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकत आहेत. मनपा निवडणुका आता १४ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून धमकीसत्रही सुरू झाले आहे.

१८ एमएलडीची मागणी वाढली जायकवाडीहून दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणी शहरात येते.या पाण्यावर शहरातील ११५ वॉर्डांमधील नागरिकांची तहान भागत आहे. मनपाकडे आता १८ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाने पाणी न दिल्यास मोठे शासकीय प्रकल्प रखडण्याच्या मार्गावर आहेत. मनपाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यातून १८ एमएलडी पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा होईल.जायकवाडीहून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे सध्या तरी मनपाकडे कोणतेच नियोजन नाही.दोन ते तीन वर्षे शहरात वाढीव पाणी येण्याची शक्यताही नाही. उपलब्ध पाण्यातून मनपाला वाट काढावी लागणार आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ