शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’चे अपूर्ण मिशन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल?

By विजय सरवदे | Updated: May 16, 2024 14:56 IST

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड पडली आहे. टंचाईग्रस्त गावांसाठी सध्या ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली. परंतु, दोन वर्षांमध्ये अवघे ५३२ योजनांचीच कामे पूर्ण होऊ शकली. या मिशनसाठी आता सप्टेंबरपर्यंतची मुदत मिळाली असून, या चार महिन्यांत ६२९ योजनांची कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. यातील काही कामे जीवन प्राधिकरण, तर काही कामे जि.प.च्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. मागील दोन वर्षांपासून जि. प. पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनची कामे गतीने व्हावीत, यासाठी सातत्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केला. मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थ, सरपंच व कंत्राटदार यांच्यातील बेबनावामुळे अनेक कामे रखडली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे शस्त्रदेखील उगारले. ४५ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तरीही या मिशनसाठी असलेली मार्च २०२४ ची ‘डेड लाइन’ हुकली. अजूनही ६२९ योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत.

योजनांची कामे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक कुटुंबात दरमाणसी ५५ लीटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ८८२ घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत ३ लाख ९७ हजार ९०१ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नळाला कधी आठ दिवसांतून, तर अनेक ठिकाणी नळांना अद्याप पाणीच आलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मुदतीच्या आत कामे होतीलमार्च अखेरपर्यंत जलजीवन मिशन यशस्वी होऊ शकले नाही, हे खरे आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११६१ पैकी ५३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने या मिशनसाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत कामे करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प.

योजनांच्या कामांची सद्य:स्थिती- ० ते २५ टक्के - ३७ कामे- २५ ते ५० टक्के - १८६ कामे- ५० ते ७५ टक्के - २१६ कामे- ७५ ते १०० टक्के - १९० कामेपूर्ण झालेली कामे - ५३२

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद