शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’चे अपूर्ण मिशन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल?

By विजय सरवदे | Updated: May 16, 2024 14:56 IST

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड पडली आहे. टंचाईग्रस्त गावांसाठी सध्या ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली. परंतु, दोन वर्षांमध्ये अवघे ५३२ योजनांचीच कामे पूर्ण होऊ शकली. या मिशनसाठी आता सप्टेंबरपर्यंतची मुदत मिळाली असून, या चार महिन्यांत ६२९ योजनांची कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. यातील काही कामे जीवन प्राधिकरण, तर काही कामे जि.प.च्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. मागील दोन वर्षांपासून जि. प. पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनची कामे गतीने व्हावीत, यासाठी सातत्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केला. मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थ, सरपंच व कंत्राटदार यांच्यातील बेबनावामुळे अनेक कामे रखडली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे शस्त्रदेखील उगारले. ४५ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तरीही या मिशनसाठी असलेली मार्च २०२४ ची ‘डेड लाइन’ हुकली. अजूनही ६२९ योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत.

योजनांची कामे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक कुटुंबात दरमाणसी ५५ लीटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ८८२ घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत ३ लाख ९७ हजार ९०१ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नळाला कधी आठ दिवसांतून, तर अनेक ठिकाणी नळांना अद्याप पाणीच आलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मुदतीच्या आत कामे होतीलमार्च अखेरपर्यंत जलजीवन मिशन यशस्वी होऊ शकले नाही, हे खरे आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११६१ पैकी ५३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने या मिशनसाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत कामे करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प.

योजनांच्या कामांची सद्य:स्थिती- ० ते २५ टक्के - ३७ कामे- २५ ते ५० टक्के - १८६ कामे- ५० ते ७५ टक्के - २१६ कामे- ७५ ते १०० टक्के - १९० कामेपूर्ण झालेली कामे - ५३२

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद