शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’चे अपूर्ण मिशन सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल?

By विजय सरवदे | Updated: May 16, 2024 14:56 IST

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदा तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड पडली आहे. टंचाईग्रस्त गावांसाठी सध्या ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली. परंतु, दोन वर्षांमध्ये अवघे ५३२ योजनांचीच कामे पूर्ण होऊ शकली. या मिशनसाठी आता सप्टेंबरपर्यंतची मुदत मिळाली असून, या चार महिन्यांत ६२९ योजनांची कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १,१६१ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. यातील काही कामे जीवन प्राधिकरण, तर काही कामे जि.प.च्या नियंत्रणाखाली सुरू आहेत. मागील दोन वर्षांपासून जि. प. पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशनची कामे गतीने व्हावीत, यासाठी सातत्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केला. मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थ, सरपंच व कंत्राटदार यांच्यातील बेबनावामुळे अनेक कामे रखडली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे शस्त्रदेखील उगारले. ४५ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तरीही या मिशनसाठी असलेली मार्च २०२४ ची ‘डेड लाइन’ हुकली. अजूनही ६२९ योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत.

योजनांची कामे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक कुटुंबात दरमाणसी ५५ लीटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ८८२ घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत ३ लाख ९७ हजार ९०१ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नळाला कधी आठ दिवसांतून, तर अनेक ठिकाणी नळांना अद्याप पाणीच आलेले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मुदतीच्या आत कामे होतीलमार्च अखेरपर्यंत जलजीवन मिशन यशस्वी होऊ शकले नाही, हे खरे आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११६१ पैकी ५३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने या मिशनसाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत कामे करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, जि. प.

योजनांच्या कामांची सद्य:स्थिती- ० ते २५ टक्के - ३७ कामे- २५ ते ५० टक्के - १८६ कामे- ५० ते ७५ टक्के - २१६ कामे- ७५ ते १०० टक्के - १९० कामेपूर्ण झालेली कामे - ५३२

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद