शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

'जलाक्रोश' शमविण्यासाठी मंत्रिमंडळ आता देणार का ८५० कोटी रुपयांचा निधी?

By मुजीब देवणीकर | Updated: September 11, 2023 19:53 IST

मनपाने शासनाला केला तीनवेळा पत्रव्यवहार

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ८५० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम महापालिकेकडे नाही. ही रक्कमही राज्य शासनाने भरावी, अशी मागणी आतापर्यंत तीनवेळा करण्यात आली. त्यावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. १६ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर पुन्हा ८५० कोटींचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

नवीन पाणी पुरवठा योजनेचा केंद्र शासनाच्या ‘अमृत-२’मध्ये समावेश केला आहे. केंद्र शासन योजनेसाठी ११५० कोटी रुपये देणार आहे. राज्य शासन ७४० कोटी आणि महापालिकेला ८५० कोटी रुपये भरावे लागतील. आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाने ७४० कोटी रुपये दिले आहेत. जुन्या समांतर जलवाहिनी योजनेचे मनपाकडे पडून असलेले २५४ कोटी रुपयेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. ही रक्कमही केंद्राच्या वाट्यात धरली जाणार आहे. कंत्राटदार कंपनीला ९९५ कोटी रुपये देण्यात आले. मनपा आपला वाटा भरू शकत नाही. त्यामुळे मनपाचा वाटाही राज्य शासनाने द्यावा, असा आग्रह सुरू आहे.

अगोदरच कर्जाचा डोंगरस्मार्ट सिटीच्या विविध योजनांसाठी मनपाला २५० कोटींचा वाटा टाकावा लागला. मनपाच्या मालमत्ता गहाण ठेवून २५० कोटींचे कर्ज घेऊन स्मार्ट सिटीला निधी देण्यात आला. स्मार्ट सिटीने ३१७ कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू केली. त्यातील किमान १५० कोटी रुपये मनपाला द्यावे लागणार आहेत.

जीएसटी अनुदानावर पगारदर महिन्याला जीएसटी अनुदान आल्यावरच मनपा कर्मचाऱ्यांचा पगार, विद्युत बिल भरले जाते. एखाद्या महिन्यात अनुदान येण्यास विलंब झाला तर ४० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत नसतात. अत्यावश्यक कामांचा खर्च दरमहा मोठ्या प्रमाणात आहे.

८५० कोटी देणार का?महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना २३ मे २०२२ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर ‘जलआक्रोश’ मोर्चा काढला होता. त्यानंतर एकाच महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजप-शिंदे गट सत्तेत आले. भाजपने यापूर्वी अनेकदा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा केली. २ जुलै २०२३ मध्ये अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा योजनेत महापालिकेचा वाटा सरकारने टाकावा अशी तीन वेळेस विनंती केली. त्याचे आजपर्यंत उत्तर आले नाही. १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी सरकार ८५० कोटी रुपये मनपाला देईल का, यावर योजनेचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी