शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'जलाक्रोश' शमविण्यासाठी मंत्रिमंडळ आता देणार का ८५० कोटी रुपयांचा निधी?

By मुजीब देवणीकर | Updated: September 11, 2023 19:53 IST

मनपाने शासनाला केला तीनवेळा पत्रव्यवहार

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ८५० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम महापालिकेकडे नाही. ही रक्कमही राज्य शासनाने भरावी, अशी मागणी आतापर्यंत तीनवेळा करण्यात आली. त्यावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. १६ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर पुन्हा ८५० कोटींचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

नवीन पाणी पुरवठा योजनेचा केंद्र शासनाच्या ‘अमृत-२’मध्ये समावेश केला आहे. केंद्र शासन योजनेसाठी ११५० कोटी रुपये देणार आहे. राज्य शासन ७४० कोटी आणि महापालिकेला ८५० कोटी रुपये भरावे लागतील. आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाने ७४० कोटी रुपये दिले आहेत. जुन्या समांतर जलवाहिनी योजनेचे मनपाकडे पडून असलेले २५४ कोटी रुपयेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. ही रक्कमही केंद्राच्या वाट्यात धरली जाणार आहे. कंत्राटदार कंपनीला ९९५ कोटी रुपये देण्यात आले. मनपा आपला वाटा भरू शकत नाही. त्यामुळे मनपाचा वाटाही राज्य शासनाने द्यावा, असा आग्रह सुरू आहे.

अगोदरच कर्जाचा डोंगरस्मार्ट सिटीच्या विविध योजनांसाठी मनपाला २५० कोटींचा वाटा टाकावा लागला. मनपाच्या मालमत्ता गहाण ठेवून २५० कोटींचे कर्ज घेऊन स्मार्ट सिटीला निधी देण्यात आला. स्मार्ट सिटीने ३१७ कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू केली. त्यातील किमान १५० कोटी रुपये मनपाला द्यावे लागणार आहेत.

जीएसटी अनुदानावर पगारदर महिन्याला जीएसटी अनुदान आल्यावरच मनपा कर्मचाऱ्यांचा पगार, विद्युत बिल भरले जाते. एखाद्या महिन्यात अनुदान येण्यास विलंब झाला तर ४० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत नसतात. अत्यावश्यक कामांचा खर्च दरमहा मोठ्या प्रमाणात आहे.

८५० कोटी देणार का?महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना २३ मे २०२२ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर ‘जलआक्रोश’ मोर्चा काढला होता. त्यानंतर एकाच महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केले. भाजप-शिंदे गट सत्तेत आले. भाजपने यापूर्वी अनेकदा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा केली. २ जुलै २०२३ मध्ये अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा योजनेत महापालिकेचा वाटा सरकारने टाकावा अशी तीन वेळेस विनंती केली. त्याचे आजपर्यंत उत्तर आले नाही. १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी सरकार ८५० कोटी रुपये मनपाला देईल का, यावर योजनेचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी