शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता शेवटची तारीख! ईदनंतर लेबर कॉलनीचा ताबा घेणार; नागरिकांना घरे सोडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 19:59 IST

सर्व कार्यालये प्रशासकीय संकुलात हलविण्यात येतील. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यालयांसाठी देण्यात येणारे सव्वादोन कोटी रुपये वाचतील.

औरंगाबाद: विश्वासनगर, लेबर कॉलनीतील साडेतेरा एकरहून अधिक जागेत असलेल्या सदनिका रमजान ईदनंतर ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू होईल. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत सदनिका नागरिकांनी शांततेने रिक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

ती जागा ताब्यात घेतल्यानंतर तेथे प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे. तेथे जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रिमंडळ बैठकीसाठी सभागृह, प्रदर्शन हॉल बांधण्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर असून इमारतीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शहरात ४० हून अधिक शासकीय कार्यालये भाडेकरारावर आहेत. ती सर्व कार्यालये प्रशासकीय संकुलात हलविण्यात येतील. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यालयांसाठी देण्यात येणारे सव्वादोन कोटी रुपये वाचतील. महापालिका, सा. बां. विभाग आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करणार आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, बां. वि.चे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदींची उपस्थिती होती.

८ नोव्हेंबरपासून तारीख पे तारीख

८ नोव्हेंबर २०२१ पासून लेबर कॉलनीसाठी ‘तारीख पे तारीख’ची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालय, सर्वेाच्च न्यायालयापर्यंत लेबर कॉलनीतील सदनिकाधारकांनी लढा दिला आहे तसेच यामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आता ३० एप्रिलपूर्वी सदनिकाधारकांनी स्वत:हून प्रशासनाकडे ताबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले असले तरी ईदनंतर खरेच पाडापाडी होणार की नाही, याबाबत प्रशासनाने काहीही स्पष्टीकरण दिले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद