शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आता शेवटची तारीख! ईदनंतर लेबर कॉलनीचा ताबा घेणार; नागरिकांना घरे सोडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 19:59 IST

सर्व कार्यालये प्रशासकीय संकुलात हलविण्यात येतील. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यालयांसाठी देण्यात येणारे सव्वादोन कोटी रुपये वाचतील.

औरंगाबाद: विश्वासनगर, लेबर कॉलनीतील साडेतेरा एकरहून अधिक जागेत असलेल्या सदनिका रमजान ईदनंतर ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू होईल. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत सदनिका नागरिकांनी शांततेने रिक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

ती जागा ताब्यात घेतल्यानंतर तेथे प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे. तेथे जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रिमंडळ बैठकीसाठी सभागृह, प्रदर्शन हॉल बांधण्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर असून इमारतीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शहरात ४० हून अधिक शासकीय कार्यालये भाडेकरारावर आहेत. ती सर्व कार्यालये प्रशासकीय संकुलात हलविण्यात येतील. त्यामुळे दरवर्षी त्या कार्यालयांसाठी देण्यात येणारे सव्वादोन कोटी रुपये वाचतील. महापालिका, सा. बां. विभाग आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे ही कारवाई करणार आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, बां. वि.चे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदींची उपस्थिती होती.

८ नोव्हेंबरपासून तारीख पे तारीख

८ नोव्हेंबर २०२१ पासून लेबर कॉलनीसाठी ‘तारीख पे तारीख’ची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालय, सर्वेाच्च न्यायालयापर्यंत लेबर कॉलनीतील सदनिकाधारकांनी लढा दिला आहे तसेच यामध्ये लोकप्रतिनिधींनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आता ३० एप्रिलपूर्वी सदनिकाधारकांनी स्वत:हून प्रशासनाकडे ताबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले असले तरी ईदनंतर खरेच पाडापाडी होणार की नाही, याबाबत प्रशासनाने काहीही स्पष्टीकरण दिले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद