शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदी लागणार विद्यमान आमदारांची वर्णी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 16:02 IST

दोन्ही पदांवर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे.

ठळक मुद्दे३० डिसेंबर रोजी निवड होण्याची शक्यतापदाधिकाऱ्यांत प्रचंड अस्वस्थता

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी स्थानिक आणि प्रदेश पातळीवर खल करण्यात येत आहे. या दोन्ही पदांवर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांची वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघटनात्मक फेरबदलासाठी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक डिसेंबरच्या सुरुवातीलाच घेतली होती. तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर रोजी झाली, तरीही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्यामुळेच नियुक्त्या रखडल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे अनेकांना शहराध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. यात विद्यमान अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह पूर्वचे आमदार अतुल सावे, राज्य प्रवक्ते शिरीष बोराळकर, संजय केणेकर यांची नावे चर्चेत आहेत.

येत्या वर्षात मराठवाडा पदवीधरची निवडणूक होणार असल्यामुळे त्याठिकाणी शिरीष बोराळकर हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे त्यांना शहराध्यक्ष या पदात न अडकवता मराठवाडाभर फिरण्यास वेळ देण्यात यावा, असाही युक्तिवाद केला जात आहे. तर आ. सावे यांचेही नाव चर्चेत आले आहे.  त्याच वेळी औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी वैजापूरचे दिनेश परदेशी, कन्नडचे संजय खंबायते आणि फुलंब्री मतदारसंघातील विजय औताडे यांच्या नावासह गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचे नाव पुढे आले आहे. या पदासाठी आ. बंबही इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीणच्या अध्यक्षपदी आमदारांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

संघटना बांधणीचे प्रयत्नभाजपमध्ये लोकप्रतिनिधींकडेच शहर आणि जिल्ह्यातील पक्षाची धुरा सोपविण्याचा विचार प्रदेशस्तरावर सुरू आहे. यातून पक्षाला सतत विविध उपक्रम देणे, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. सत्ता नसल्यामुळे हा विचार चर्चेतून समोर आला आहे. 

नियुक्त्या ३० डिसेंबरपर्यंत भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ३० डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा सुरू आहे. प्रदेश पातळीवरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. जो निर्णय होईल, तो सर्वांनाच मान्य असणार आहे.- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे