शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:28 IST

शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ठळक मुद्दे जीएसटीमधून १ लाख १५ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांना १६ हजार ९५ कोटी दिले

औरंगाबाद : राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. शेतकऱ्यांना १६ हजार ९५ कोटी रुपये दिले. शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्तालयात १५० वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी मराठवाडा विकास मंडळ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शासनाकडे विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, अशी टीका दोन दिवसांपूर्वीच्या भाषणात केली. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, त्यांनी अशी टीका करणे चुकीचे आहे.

राज्यात सिंचनासाठी १३ हजार कोटींचा निधी दिला आहे. शेतकऱ्यांना सरकारने सर्वाधिक मदत केली आहे. जीएसटीमधून १ लाख १५ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे यावेळी दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही. केंद्र शासनाकडे देखील आवश्यक निधीची मागणी केली जाणार आहे. राज्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचे संकट आले होते, त्यावेळी केंद्र सरकारकडे मदत मागितली. मात्र, निधी मिळाला नाही. शासनाने स्वत: ३ हजार कोटींची तरतूद केली. कर्जमाफीमुळे पुरेसा निधी नसल्याची टीका केली जात होती; परंतु विरोधक गैरसमज निर्माण करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. असे असतानाही लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना-भाजप युती होईल, असा दावा त्यांनी केला. 

मराठवाडा विकास मंडळाच्या कामावर ताशेरेमराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांसोबत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि त्यांना लागणारा निधी याबाबत आढावा घेतला. बैठकीत सगळी माहिती अर्धवट असल्याचे पाहून अर्थमंत्र्यांनी सदस्यांसह सर्व अधिकाऱ्यांची खरडपट्टी करीत ताशेरे ओढले. ४१ बैठका घेतल्याचे मंडळाचे सचिव डी.एम. मुगळीकर यांनी सांगताच, अर्थमंत्री म्हणाले, एवढ्या बैठका घेतल्या. मात्र, त्याचा फायदा काय झाला. योजनांसाठी संशोधन करा, त्या नीट आखून संबंधित विभागाकडून त्याचे प्रस्ताव पाठविल्यास निधीची तरतूद होते. नियमाने जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही, तोपर्यंत निधी देता येणार नाही, असेही अर्थमंत्र्यांनी अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यासह सर्व सदस्य, अधिकाऱ्यांना सुनावले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारdroughtदुष्काळfundsनिधी