शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:28 IST

शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ठळक मुद्दे जीएसटीमधून १ लाख १५ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांना १६ हजार ९५ कोटी दिले

औरंगाबाद : राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. शेतकऱ्यांना १६ हजार ९५ कोटी रुपये दिले. शेतकरी हा प्रमुख घटक असून, दुष्काळासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुनगंटीवार यांनी विभागीय आयुक्तालयात १५० वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी मराठवाडा विकास मंडळ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शासनाकडे विकासकामांसाठी पुरेसा निधी नाही, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही, अशी टीका दोन दिवसांपूर्वीच्या भाषणात केली. यावर अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, त्यांनी अशी टीका करणे चुकीचे आहे.

राज्यात सिंचनासाठी १३ हजार कोटींचा निधी दिला आहे. शेतकऱ्यांना सरकारने सर्वाधिक मदत केली आहे. जीएसटीमधून १ लाख १५ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे यावेळी दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही. केंद्र शासनाकडे देखील आवश्यक निधीची मागणी केली जाणार आहे. राज्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचे संकट आले होते, त्यावेळी केंद्र सरकारकडे मदत मागितली. मात्र, निधी मिळाला नाही. शासनाने स्वत: ३ हजार कोटींची तरतूद केली. कर्जमाफीमुळे पुरेसा निधी नसल्याची टीका केली जात होती; परंतु विरोधक गैरसमज निर्माण करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. असे असतानाही लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना-भाजप युती होईल, असा दावा त्यांनी केला. 

मराठवाडा विकास मंडळाच्या कामावर ताशेरेमराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांसोबत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि त्यांना लागणारा निधी याबाबत आढावा घेतला. बैठकीत सगळी माहिती अर्धवट असल्याचे पाहून अर्थमंत्र्यांनी सदस्यांसह सर्व अधिकाऱ्यांची खरडपट्टी करीत ताशेरे ओढले. ४१ बैठका घेतल्याचे मंडळाचे सचिव डी.एम. मुगळीकर यांनी सांगताच, अर्थमंत्री म्हणाले, एवढ्या बैठका घेतल्या. मात्र, त्याचा फायदा काय झाला. योजनांसाठी संशोधन करा, त्या नीट आखून संबंधित विभागाकडून त्याचे प्रस्ताव पाठविल्यास निधीची तरतूद होते. नियमाने जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही, तोपर्यंत निधी देता येणार नाही, असेही अर्थमंत्र्यांनी अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्यासह सर्व सदस्य, अधिकाऱ्यांना सुनावले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारdroughtदुष्काळfundsनिधी