शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही - अर्थमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 05:13 IST

मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही. मागील तीन वर्षांत विभागाला सर्वाधिक न्याय दिल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही. मागील तीन वर्षांत विभागाला सर्वाधिक न्याय दिल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यापुढे मराठवाडा विकास मंडळातील तज्ज्ञ सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबतही त्यांनी सूतोवाच केले.सोमवारी मराठवाड्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. लोकमतने मराठवाड्यातील सिंचन तरतुदीबाबत अन्याय होत असल्याचे वृत्त ५ फेबु्रवारीच्या अंकात प्रकाशित केले होते. अर्थमंत्री म्हणाले, सिंचनाच्या बाबतीत राज्यपालांच्या अनुशेष सूत्रावर निधी दिला जातो, ते अधिकार मुख्यमंत्र्यांनादेखील नाहीत, त्यामुळे सिंचनात मराठवाड्यात अन्याय झाला हा शब्दच लागू होत नाही. जो निधी यापूर्वी पाच वर्षांत सिंचन विभागाला जात नव्हता, तो पूर्ण देण्यात येत आहे. सिंचन क्षेत्राला एकेका वर्षात ९ हजार कोटी उपलब्ध होत आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत या तीन वर्षांत मराठवाड्यात जास्तीचा निधी आला आहे. मागच्या सरकारच्या तुलनेत जास्त निधी दिला आहे. जलयुक्त शिवार, सिंचन योजनेत निधी दिला आहे. तीन वर्षांत सिंचन वाढले आहे. नाबार्डच्या कर्ज उभारणीत मराठवाडा, विदर्भासाठी काय तरतूद केली, त्याची माझ्याकडे माहिती नाही. मराठवाड्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत आहे. अविकसित भागाकडे सरकार लक्ष देत आहे, असे त्यांनी सांगितले.डीपीसीची ३० टक्के कपात मागेडीपीसीसाठी १४६९ कोटींचा निधी मराठवाड्याला दिला आहे. कर्जमुक्तीच्या निर्णयानंतर शासनाने ३० टक्के कपात केली होती. हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. यापुढे १०० टक्के निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.>प्रशासनाची गती म्हणजे मुंगीचाही अपमान -बागडेमुंगीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बागडे यांच्यासह आ. अतुल सावे यांनीदेखील महापालिकेला डीपीसीतून निधी मिळत नसल्यामुळे अर्थमंत्र्यांसोबत शाब्दिक वाद घातला. बागडे म्हणाले, शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलांचे काम, या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्याची मानसिकता यंत्रणेने जोपासली पाहिजे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून कामे होत नाहीत.>विकास मंडळाच्या बैठकीला अर्थमंत्र्यांनी दाखवला ठेंगा!मराठवाड्याच्या अनुशेषबाबत तयार केलेल्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठेंगा सोमवारी दाखविला. त्यामुळे निराश सदस्यांनी नाराजी व्यक्त करत घर गाठले.मराठवाड्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अर्धा डझन मंत्री सोमवारी औरंगाबादेत होते. त्यात मुनगंटीवारही होते. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याअनुषंगाने मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांनी अनुशेषाचा सर्वंकष मसुदा तयार केला होता. या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या समवेत सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.याबाबत सदस्य नागरे म्हणाले, बैठक होणार असल्यामुळे पूर्ण आढावा घेऊन प्रस्ताव तयार केला होता. सर्व सदस्य बैठकीसाठी आले होते; परंतु ऐनवेळी बैठक रद्द झाल्याचा निरोप आला. त्यामुळे तयार केलेली सर्व माहिती कर्मचाºयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सोपवली. मराठवाड्याच्या अनुशेषाबाबत सरकार किती उदासीन आहे, हेच यातून दिसून येते, अशी प्रतिक्रिया एका सदस्याने व्यक्त केली. तर याबाबत मुनगंटीवार म्हणाले, मंडळाच्या सदस्यांसोबत बैठक होती, याची मला काहीही माहिती नव्हती.