शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेरपर्यंत निधी खर्च होणार का?; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:24 IST

जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांच्या योजना ठप्प आहेत. जिल्हा नियोजन समिती तसेच शासनाकडून प्राप्त झालेला निधीचे नियोजन नाही. अशा परिस्थितीत मार्चअखेरपर्यंत निधी खर्च होणार आहे का, असा सवाल आज गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांच्या योजना ठप्प आहेत. जिल्हा नियोजन समिती तसेच शासनाकडून प्राप्त झालेला निधीचे नियोजन नाही. अशा परिस्थितीत मार्चअखेरपर्यंत निधी खर्च होणार आहे का, असा सवाल आज गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला. तेव्हा प्राप्त निधी खर्च करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, सर्व अधिकारी कामाला लागले आहेत. बांधकाम विभागाचा निधी वेळेच्या आत खर्च होण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाने सभागृहात दिली. 

यावेळी अविनाश गलांडे म्हणाले की, आता महिनाभराचाच कालावधी राहिलेला असून, मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित आहे. प्राप्त झालेला निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मुख्यलेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी खर्चाचे नियोजन झालेले असून, जि.प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी विभागप्रमुखांच्या मॅरेथॉन बैठका घेऊन चालू आर्थिक वर्षामध्येच खर्चाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे, असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीकडून मागील आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधींपैकी २८ कोटी रुपये अद्यापही खर्च झालेले नाहीत. 

कित्येक कर्मचारी एकाच विभागात आणि एकाच टेबलावर अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची मक्तेदारी झाली असून ते कोणालाही जुमानत नाहीत. विहित कालावधी पूर्ण करणाºया अशा कर्मचाºयांचे विभाग तसेच टेबल का बदलले जात नाहीत. याकडे उपाध्यक्ष केशव तायडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. कोणत्याही कामाची फाईल असो ती निकाली काढण्यासाठी सदस्यांचा पाठपुरावा करावा लागतो, अशी खंत अविनाश गलांडे, किशोर बलांडे या सदस्यांनी व्यक्त केली, तर कंत्राटदार भेटल्याशिवाय फायली निकाली निघत नसल्याचा आरोप तायडे यांनी केला.

अंगणवाड्यांचा आहार जनावरांनाग्रामीण भागातील अंगणवाड्यांना पुरविण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असून, तो पुरवठादाराला कमी पैशात परत विकला जात असल्याचा आरोप जि.प.चे उपाध्यक्ष केशव तायडे यांनी केला. यावरून सभागृहात गोंधळ उडाला. सभापती कुसुम लोहकरे यांनी मुद्दा उपस्थित केला की, धुळ्याच्या कंत्राटदाराला पोषण आहाराचे कंत्राट कशासाठी देता? निकृष्ट आहाराबाबतच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीमार्फत तपासण्या झाल्याच नाहीत. दरम्यान, निकृष्ट आहाराबाबत आणि विक्रीबाबत प्राप्त तक्रारीवरून चौकशी केली जाईल व दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालकल्याण अधिकारी संजय कदम यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :MONEYपैसाzpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद