शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? विज्ञान-धर्माची सांगड घालणाऱ्यांना कन्हैयाकुमारचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 7:04 PM

सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे.

औरंगाबाद : सत्याचा गळा घोटू देऊ नका, सदैव सत्याच्याच बाजूने उभे रहा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी बुधवारी येथे केले. ते निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया’ या पुस्तकाचे तापडिया नाट्यगृहात प्रकाशन करताना बोलत होते. खा. कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते.

कन्हैयाकुमार म्हणाले, आज सत्य सांगण्यासाठी डिस्क्लेमर द्यावे लागत आहे. देशभक्त होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे. लोकशाही व संविधान गृहीत धरले जात आहे. देशासमोरचे ज्वलंत प्रश्न वेगळेच आहेत. ४७ कोटी लोकांनी रोजगार मिळत नाही म्हणून रोजगार शोधणेच बंद करून टाकले आहे. आज प्रतीकांचा वापर करून समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे. विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जात आहे. पण फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुमार केतकर म्हणाले, कुठलाही पुरावा नसताना भारतात ३२ लाख लोक जेलमध्ये सडताहेत, याची कधी चर्चा होत नाही. याचा अर्थ आपल्याला सत्याची जाण नाही. आपण किती बेपर्वा आहोत, आपल्यातच किती मश्गूल आहोत, हे यातून दिसतंय. काय झालं नाही ना, हे पुरेसं अशी मनोवृत्ती बळावत चालली आहे. या देशात ५५ कोटी मध्यमवर्ग आहे. त्यांचे पगार चालू आहेत. त्यांचे बोनस चालू आहेत. त्यामुळे त्यांना महागाईबद्दल काही वाटत नाही. भारतात हिंदुत्वाच्या गुढ्या उभारण्यासाठी विदेशातील हिंदूंचा पैसा येतो, असा आरोपही त्यांनी केला. प्रा. जयदेव डोळे यांचेही यावेळी भाषण झाले. नील नागवेकर, कृष्णा साळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लेखक निरंजन टकले यांनी प्रास्ताविक केले. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांनी आभार मानले.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारAurangabadऔरंगाबादFacebookफेसबुकscienceविज्ञान