शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? विज्ञान-धर्माची सांगड घालणाऱ्यांना कन्हैयाकुमारचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:05 IST

सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे.

औरंगाबाद : सत्याचा गळा घोटू देऊ नका, सदैव सत्याच्याच बाजूने उभे रहा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी बुधवारी येथे केले. ते निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया’ या पुस्तकाचे तापडिया नाट्यगृहात प्रकाशन करताना बोलत होते. खा. कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते.

कन्हैयाकुमार म्हणाले, आज सत्य सांगण्यासाठी डिस्क्लेमर द्यावे लागत आहे. देशभक्त होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे. लोकशाही व संविधान गृहीत धरले जात आहे. देशासमोरचे ज्वलंत प्रश्न वेगळेच आहेत. ४७ कोटी लोकांनी रोजगार मिळत नाही म्हणून रोजगार शोधणेच बंद करून टाकले आहे. आज प्रतीकांचा वापर करून समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे. विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जात आहे. पण फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुमार केतकर म्हणाले, कुठलाही पुरावा नसताना भारतात ३२ लाख लोक जेलमध्ये सडताहेत, याची कधी चर्चा होत नाही. याचा अर्थ आपल्याला सत्याची जाण नाही. आपण किती बेपर्वा आहोत, आपल्यातच किती मश्गूल आहोत, हे यातून दिसतंय. काय झालं नाही ना, हे पुरेसं अशी मनोवृत्ती बळावत चालली आहे. या देशात ५५ कोटी मध्यमवर्ग आहे. त्यांचे पगार चालू आहेत. त्यांचे बोनस चालू आहेत. त्यामुळे त्यांना महागाईबद्दल काही वाटत नाही. भारतात हिंदुत्वाच्या गुढ्या उभारण्यासाठी विदेशातील हिंदूंचा पैसा येतो, असा आरोपही त्यांनी केला. प्रा. जयदेव डोळे यांचेही यावेळी भाषण झाले. नील नागवेकर, कृष्णा साळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लेखक निरंजन टकले यांनी प्रास्ताविक केले. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांनी आभार मानले.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारAurangabadऔरंगाबादFacebookफेसबुकscienceविज्ञान