शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? विज्ञान-धर्माची सांगड घालणाऱ्यांना कन्हैयाकुमारचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:05 IST

सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे.

औरंगाबाद : सत्याचा गळा घोटू देऊ नका, सदैव सत्याच्याच बाजूने उभे रहा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी बुधवारी येथे केले. ते निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया’ या पुस्तकाचे तापडिया नाट्यगृहात प्रकाशन करताना बोलत होते. खा. कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते.

कन्हैयाकुमार म्हणाले, आज सत्य सांगण्यासाठी डिस्क्लेमर द्यावे लागत आहे. देशभक्त होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे. लोकशाही व संविधान गृहीत धरले जात आहे. देशासमोरचे ज्वलंत प्रश्न वेगळेच आहेत. ४७ कोटी लोकांनी रोजगार मिळत नाही म्हणून रोजगार शोधणेच बंद करून टाकले आहे. आज प्रतीकांचा वापर करून समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे. विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जात आहे. पण फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुमार केतकर म्हणाले, कुठलाही पुरावा नसताना भारतात ३२ लाख लोक जेलमध्ये सडताहेत, याची कधी चर्चा होत नाही. याचा अर्थ आपल्याला सत्याची जाण नाही. आपण किती बेपर्वा आहोत, आपल्यातच किती मश्गूल आहोत, हे यातून दिसतंय. काय झालं नाही ना, हे पुरेसं अशी मनोवृत्ती बळावत चालली आहे. या देशात ५५ कोटी मध्यमवर्ग आहे. त्यांचे पगार चालू आहेत. त्यांचे बोनस चालू आहेत. त्यामुळे त्यांना महागाईबद्दल काही वाटत नाही. भारतात हिंदुत्वाच्या गुढ्या उभारण्यासाठी विदेशातील हिंदूंचा पैसा येतो, असा आरोपही त्यांनी केला. प्रा. जयदेव डोळे यांचेही यावेळी भाषण झाले. नील नागवेकर, कृष्णा साळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लेखक निरंजन टकले यांनी प्रास्ताविक केले. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांनी आभार मानले.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारAurangabadऔरंगाबादFacebookफेसबुकscienceविज्ञान