शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? विज्ञान-धर्माची सांगड घालणाऱ्यांना कन्हैयाकुमारचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:05 IST

सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे.

औरंगाबाद : सत्याचा गळा घोटू देऊ नका, सदैव सत्याच्याच बाजूने उभे रहा, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी बुधवारी येथे केले. ते निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया’ या पुस्तकाचे तापडिया नाट्यगृहात प्रकाशन करताना बोलत होते. खा. कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते.

कन्हैयाकुमार म्हणाले, आज सत्य सांगण्यासाठी डिस्क्लेमर द्यावे लागत आहे. देशभक्त होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे. लोकशाही व संविधान गृहीत धरले जात आहे. देशासमोरचे ज्वलंत प्रश्न वेगळेच आहेत. ४७ कोटी लोकांनी रोजगार मिळत नाही म्हणून रोजगार शोधणेच बंद करून टाकले आहे. आज प्रतीकांचा वापर करून समाजाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य बोलणारे लोक जन्म घेतच असतात. पण सत्यासाठी आपण कधी उभे राहणार हा माझ्या चिंतेचा विषय आहे. विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जात आहे. पण फेसबुक कधी मंत्राने सुरू होईल काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुमार केतकर म्हणाले, कुठलाही पुरावा नसताना भारतात ३२ लाख लोक जेलमध्ये सडताहेत, याची कधी चर्चा होत नाही. याचा अर्थ आपल्याला सत्याची जाण नाही. आपण किती बेपर्वा आहोत, आपल्यातच किती मश्गूल आहोत, हे यातून दिसतंय. काय झालं नाही ना, हे पुरेसं अशी मनोवृत्ती बळावत चालली आहे. या देशात ५५ कोटी मध्यमवर्ग आहे. त्यांचे पगार चालू आहेत. त्यांचे बोनस चालू आहेत. त्यामुळे त्यांना महागाईबद्दल काही वाटत नाही. भारतात हिंदुत्वाच्या गुढ्या उभारण्यासाठी विदेशातील हिंदूंचा पैसा येतो, असा आरोपही त्यांनी केला. प्रा. जयदेव डोळे यांचेही यावेळी भाषण झाले. नील नागवेकर, कृष्णा साळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लेखक निरंजन टकले यांनी प्रास्ताविक केले. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांनी आभार मानले.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारAurangabadऔरंगाबादFacebookफेसबुकscienceविज्ञान