शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

नूतन वर्षात शहराच्या टॉप टेन गरजा पूर्ण होतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 20:28 IST

शहराच्या गरजा खूप आहेत. २०१८ मध्ये तरी त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. २०१९ मध्ये तरी शहराच्या किमान गरजा पूर्ण होतील का...?

ठळक मुद्देस्मार्ट शहरासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

औरंगाबाद : देशातील, महाराष्ट्रातील मोठमोठी शहरे झपाट्याने विकास करीत आहेत. स्मार्ट शहरांच्या यादीत औरंगाबादचेही नाव आहे. शहर कधी स्मार्ट होईल, असे प्रत्येक नागरिकाला मनापासून वाटते. शहर ‘लोकल टू ग्लोबल’ होण्यात मागे पडत चालले आहे. विकासाच्या या मंदावलेल्या गतीला ‘मेट्रो’सारखा वेग देण्याची गरज आहे. स्थानिक उद्योजकांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर शहराचे नाव जागतिक पातळीवर नेले. या नावाजलेल्या शहराला खरोखरच स्मार्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. शहराच्या गरजा खूप आहेत. २०१८ मध्ये तरी त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. २०१९ मध्ये तरी शहराच्या किमान गरजा पूर्ण होतील का...?

१. २४ तास ७ दिवस पाणी हवेशहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शहराच्या आसपास नवीन वसाहती मोठ्या संख्येने तयार होत आहेत. या वसाहतींना दोन दशकांपासून मनपा पाणीही देऊ शकत नाही. शहरातही तीन दिवसाआडच्या नावावर कुठे चार दिवस तर कुठे पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. शहराच्या विकासात पाणी हा केंद्रबिंदू असून, २४ तास ७ दिवस पाणी देण्याची संकल्पना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. नवीन वर्षात तरी शहराची शंभर टक्के तहान भागेल का?

२. अतिक्रमणाचे शहरशहरातील असंख्य रस्ते ३० वर्षांपूर्वी जसे होते तसे आजही त्याच अवस्थेत आहेत.फुटपाथ मोकळे करून देणे, रस्ते रुंद करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी वाहतूक पोलीस आणि मनपाची आहे. नवीन वर्षात तरी शहर अतिक्रमण मुक्तहोईल का?

३. ‘आत्मा’म्हणजे विकास आराखडाशहराच्या आसपास असलेल्या १८ खेड्यांचा विकास आराखडा मागील साडेतीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ठेवण्यात आला आहे. २००२ मध्ये मंजूर केलेला जुन्या शहराच्या विकास आराखड्याची २५ टक्केही अंमलबजावणी झालेली नाही. आरक्षित जागा, रस्ते, पार्किंग आदींचाही महापालिकेने विकास केल्यास शहराचे मोठे कल्याण होईल. नवीन वर्षात तरी ही सर्व कामे करण्याची सद्बुद्धी शहराचे आराध्यदैवत संस्थान गणपती महापालिकेला देईल का?

४. खड्ड्यांचे नव्हे गुळगुळीत रस्त्यांचे शहरशहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. रस्त्यांची अवस्था पाहून पर्यटक नाव ठेवतात. आता शासन निधीतून मनपा ३० रस्ते गुळगुळीत करणार आहे. नगरसेवक गल्लीबोळात सिमेंट रस्ते करीत आहेत. प्रमुख रस्त्यांचे काय? नवीन वर्षात सर्वच रस्ते गुळगुळीत होतील का?

५. वाहतुकीला अजिबात शिस्त नाहीशहरातील एकाही रस्त्यावर नो एंट्रीचा बोर्ड नाही. शहर छोटे असताना तरी अनेक रस्ते वन वे होते. बाजारपेठेत पी-१, पी-२ पद्धतीने पार्किंगला शिस्त होती. वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी अभ्यास करून शहराच्या वाहतुकीला कुठेतरी शिस्त आणायला हवी. शहागंज चमन भागात तर दुचाकीही सहजपणे ये-जा करू शकत नाही. नवीन वर्षात तरी हे चित्र बदलेल का?

६. शहर सुरक्षित वाटायला हवे..मागील काही वर्षांमध्ये शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. त्यांना शहर सुरक्षित वाटायला हवे. पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असायला हवा. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या सर्वसामान्यांना आरोपीसारखी वागणूक मिळायला नको. येणाऱ्या वर्षात तरी हे चित्र बदलेल का?

७. पार्किंगसाठी जागा मिळतील का?खंडपीठाने अलीकडेच मनपाला पार्किंगचे धोरण निश्चित करा, असे ठणकावले आहे. यासाठी मनपाने समिती गठीत केली आहे. मात्र, समितीचे कामकाज कासवगतीने सुरू आहे. येणाऱ्या वर्षात तरी शहराला ४० ते ५० ठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध होईल का?

८. शौचालयांचा अभावशहरात मनपाने दहासुद्धा शौचालये उभारले नाहीत. त्यामुळे दरवर्षी मनपाला कमी गुण मिळत आहेत. शहरातील १५ लाख नागरिकांनी किमान १०० शौचालये तरी येणाऱ्या वर्षात महापालिका उभारील का?

९. वाहतूकनगरचा प्रश्न गंभीर नवीन मोंढा भागात महापालिकेने १० एकर जागा ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित केली आहे. मागील दहा वर्षांत मनपाने कोणतेच काम केलेले नाही. नवीन वर्षात तरी औरंगाबादकरांना ट्रक टर्मिनल मिळेल का?

१०. आरोग्य सुविधा हवी‘घाटी’वर दिवसेंदिवस रुग्णांचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी शहरात मनपाचेही रुग्णालय पाहिजे. मनपा ३० वर्षांपासून नागरिकांना फक्त बाह्यरुग्ण सेवा देत आहे. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNew Yearनववर्ष