शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

नूतन वर्षात शहराच्या टॉप टेन गरजा पूर्ण होतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 20:28 IST

शहराच्या गरजा खूप आहेत. २०१८ मध्ये तरी त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. २०१९ मध्ये तरी शहराच्या किमान गरजा पूर्ण होतील का...?

ठळक मुद्देस्मार्ट शहरासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

औरंगाबाद : देशातील, महाराष्ट्रातील मोठमोठी शहरे झपाट्याने विकास करीत आहेत. स्मार्ट शहरांच्या यादीत औरंगाबादचेही नाव आहे. शहर कधी स्मार्ट होईल, असे प्रत्येक नागरिकाला मनापासून वाटते. शहर ‘लोकल टू ग्लोबल’ होण्यात मागे पडत चालले आहे. विकासाच्या या मंदावलेल्या गतीला ‘मेट्रो’सारखा वेग देण्याची गरज आहे. स्थानिक उद्योजकांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर शहराचे नाव जागतिक पातळीवर नेले. या नावाजलेल्या शहराला खरोखरच स्मार्ट करण्याची नितांत आवश्यकता आहे. शहराच्या गरजा खूप आहेत. २०१८ मध्ये तरी त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. २०१९ मध्ये तरी शहराच्या किमान गरजा पूर्ण होतील का...?

१. २४ तास ७ दिवस पाणी हवेशहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शहराच्या आसपास नवीन वसाहती मोठ्या संख्येने तयार होत आहेत. या वसाहतींना दोन दशकांपासून मनपा पाणीही देऊ शकत नाही. शहरातही तीन दिवसाआडच्या नावावर कुठे चार दिवस तर कुठे पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. शहराच्या विकासात पाणी हा केंद्रबिंदू असून, २४ तास ७ दिवस पाणी देण्याची संकल्पना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. नवीन वर्षात तरी शहराची शंभर टक्के तहान भागेल का?

२. अतिक्रमणाचे शहरशहरातील असंख्य रस्ते ३० वर्षांपूर्वी जसे होते तसे आजही त्याच अवस्थेत आहेत.फुटपाथ मोकळे करून देणे, रस्ते रुंद करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी वाहतूक पोलीस आणि मनपाची आहे. नवीन वर्षात तरी शहर अतिक्रमण मुक्तहोईल का?

३. ‘आत्मा’म्हणजे विकास आराखडाशहराच्या आसपास असलेल्या १८ खेड्यांचा विकास आराखडा मागील साडेतीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ठेवण्यात आला आहे. २००२ मध्ये मंजूर केलेला जुन्या शहराच्या विकास आराखड्याची २५ टक्केही अंमलबजावणी झालेली नाही. आरक्षित जागा, रस्ते, पार्किंग आदींचाही महापालिकेने विकास केल्यास शहराचे मोठे कल्याण होईल. नवीन वर्षात तरी ही सर्व कामे करण्याची सद्बुद्धी शहराचे आराध्यदैवत संस्थान गणपती महापालिकेला देईल का?

४. खड्ड्यांचे नव्हे गुळगुळीत रस्त्यांचे शहरशहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. रस्त्यांची अवस्था पाहून पर्यटक नाव ठेवतात. आता शासन निधीतून मनपा ३० रस्ते गुळगुळीत करणार आहे. नगरसेवक गल्लीबोळात सिमेंट रस्ते करीत आहेत. प्रमुख रस्त्यांचे काय? नवीन वर्षात सर्वच रस्ते गुळगुळीत होतील का?

५. वाहतुकीला अजिबात शिस्त नाहीशहरातील एकाही रस्त्यावर नो एंट्रीचा बोर्ड नाही. शहर छोटे असताना तरी अनेक रस्ते वन वे होते. बाजारपेठेत पी-१, पी-२ पद्धतीने पार्किंगला शिस्त होती. वाहतूक पोलीस आणि महापालिका यांनी अभ्यास करून शहराच्या वाहतुकीला कुठेतरी शिस्त आणायला हवी. शहागंज चमन भागात तर दुचाकीही सहजपणे ये-जा करू शकत नाही. नवीन वर्षात तरी हे चित्र बदलेल का?

६. शहर सुरक्षित वाटायला हवे..मागील काही वर्षांमध्ये शहरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. त्यांना शहर सुरक्षित वाटायला हवे. पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक असायला हवा. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या सर्वसामान्यांना आरोपीसारखी वागणूक मिळायला नको. येणाऱ्या वर्षात तरी हे चित्र बदलेल का?

७. पार्किंगसाठी जागा मिळतील का?खंडपीठाने अलीकडेच मनपाला पार्किंगचे धोरण निश्चित करा, असे ठणकावले आहे. यासाठी मनपाने समिती गठीत केली आहे. मात्र, समितीचे कामकाज कासवगतीने सुरू आहे. येणाऱ्या वर्षात तरी शहराला ४० ते ५० ठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध होईल का?

८. शौचालयांचा अभावशहरात मनपाने दहासुद्धा शौचालये उभारले नाहीत. त्यामुळे दरवर्षी मनपाला कमी गुण मिळत आहेत. शहरातील १५ लाख नागरिकांनी किमान १०० शौचालये तरी येणाऱ्या वर्षात महापालिका उभारील का?

९. वाहतूकनगरचा प्रश्न गंभीर नवीन मोंढा भागात महापालिकेने १० एकर जागा ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित केली आहे. मागील दहा वर्षांत मनपाने कोणतेच काम केलेले नाही. नवीन वर्षात तरी औरंगाबादकरांना ट्रक टर्मिनल मिळेल का?

१०. आरोग्य सुविधा हवी‘घाटी’वर दिवसेंदिवस रुग्णांचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी शहरात मनपाचेही रुग्णालय पाहिजे. मनपा ३० वर्षांपासून नागरिकांना फक्त बाह्यरुग्ण सेवा देत आहे. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाNew Yearनववर्ष