शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या कचराकोंडीवर मुख्यमंत्री बोलणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:20 IST

नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना मुख्यमंत्री या मुद्यावर बोलणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे२० हजार टन कचरा पडून : अनेक समित्या कुचकामी; साडेचार महिन्यांनंतरही ठोस उपाययोजना नाही; दुर्गंधीने लाखो नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीने शहरातील १५ लाख नागरिक त्रस्त आहेत. महाभयंकर कचराकोंडीनंतर नगरविकास विभाग स्वत:कडे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पहिल्यांदाच शहरात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना मुख्यमंत्री या मुद्यावर बोलणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेत महापौरपद आणि सभापतीपद शिवसेनेकडे असल्याने मुख्यमंत्री दुर्लक्ष तर करणार नाहीत ना, अशी शंकाही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.१६ फेब्रुवारीपासून औरंगाबादेत कचराकोंडी झाली आहे. साडेचार महिने उलटले तरी यात कोणताच तोडगा निघालेला नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकाचौकात तब्बल २० हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. दररोज होणाºया पावसामुळे कचरा सडत चालला असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. काही भागात तर कचºयात मोठ्या प्रमाणात अळ्या जन्माला आल्या आहेत. जिथे कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, त्या भागातील नागरिक जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत. कचºयाच्या गंभीर प्रश्नात महापालिका दररोज राजकीय घोषणा करण्यात मग्न आहे. ठोस अंमलबजावणी होत नाही. कचराकोंडी सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री पहिल्यांदाच शहरात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दाखल होत आहेत. शहराच्या मध्यभागी असलेले कचºयाचे डोंगर मुख्यमंत्र्यांना पाहता येणार नाहीत. शहराबाहेरील बायपास रस्त्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील आणि जातील. कचरा प्रश्नाला ते हात लावणार का, याकडे औैरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे.विधानसभेतही गाजला प्रश्न४औैरंगाबाद शहरातील कचराकोंडीचा मुद्दा विधानसभेतही गाजला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना त्वरित औैरंगाबाद शहरात पाठविले. त्यांनी महापालिकेला युद्धपातळीवर दहा कोटींची आर्थिक मदत दिली.४त्याचप्रमाणे कचरा प्रश्न कसा मार्गी लावावा, यांची पंचसूत्रीही ठरवून दिली. कचरा प्रश्नात लक्ष घालण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती शासनाकडून नेमण्यात आली. मात्र, कचराकोंडी फोडताना या समितीलाही धाप लागली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस