शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

युवासैनिकांत का झाला वाद? वरुण सरदेसाई जाताच जुने आणि नवे पदाधिकारी आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:23 IST

एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता.

औरंगाबाद : युवासेनेच्या निश्चय मेळाव्याच्या समारोपानंतर सचिव वरुण सरदेसाई जळगावकडे जाण्यास निघाल्यानंतर, दोन गटांमध्ये मंगळवारी सायंकाळी जबरदस्त राडा झाला. बजाजनगरमधील नियुक्तीवरून नाराज असलेले जुने युवासैनिक नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना पाहताच आमने-सामने आले. दोन गटांमध्ये वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्याला गटबाजीचे गालबोट लागल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

दोन्ही गटांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे रंगमंदिराच्या आवारात अर्ध्या तासाहून अधिक वेळ तणावाचे वातावरण होते. एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता. किरण तुपे, मिथुन व्यास, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ यांनी मध्यस्थी करून राडा मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु नियुक्त्यांवरून संतप्त झालेले कार्यकर्ते कुणाचेही ऐकत नव्हते. या सगळ्या वादामागे ग्रामीण भागात शहरी पदाधिकारी नियुक्त केल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. पदाधिकारी नियुक्त केले कुणी, त्यांना नियुक्तीचा अधिकार आहे की नाही, यावरून दोन गटांमध्ये वेगवेगळ्या चर्चा कानावर येत होत्या. पश्चिम मतदारसंघात नवीन पदे देऊन परस्पर नियुक्त्या दिल्या जात आहेत. ज्यांचे पद काढून दिले ते आणि ज्यांना पद मिळाले ते; असे दोन गट समोरासमोर आल्याने हाणामारीपर्यंत प्रकरण गेले.

नाराज व संतप्त युवासैनिकांनी राडा केलायुवासेनेत ग्रामीण विरुद्ध असा वाद असल्याची चर्चा आहे. बजाजनगर, तिसगाव या परिसरात नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी ते शहरातील आहेत, असा काही पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून हा सगळा खटाटोप करण्यात आल्यामुळे जुने युवासैनिक संतापले होते. शहरातील एकावर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामागे पश्चिम मतदारसंघाचे आमदार यांनीदेखील हातभार लावल्याची चर्चा आहे. तिकडील जिल्हा युवाधिकाऱ्यांवरही युवासैनिक नाराज असल्यामुळे निश्चय मेळाव्यात जाब विचारण्याच्या हेतूने काही पदाधिकारी तिथे आलेले होते. यातच ज्यांना डावलून नियुक्ती करण्यात आली, तर नियुक्त्या करताना एका उपसचिवाची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे नाराज व संतप्त युवासैनिकांनी मंगळवारी राडा केला.

नेमका काय प्रकार आहे, ते जाणून घेऊयुवासेनेचे विस्तारक निखिल वाळेकर यांनी सांगितले, नेमका प्रकार काय घडला आहे, याची माहिती घेईल. शहरातील पदाधिकाऱ्यांचा त्या घटनेशी काही संबंध नसल्याचे दिसते आहे. ग्रामीण नियुक्त्यांवरून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

...तर सभागृहात झाला असता वादनिश्चय मेळावा सुरू झाल्यानंतर घोषणायुद्ध सभागृहात सुरूच होते. त्यातच बाल्कनीमध्ये बसलेल्या अनेकांना समजाविण्याचा प्रयत्न काही पदाधिकारी करीत होते. तेथे काही ‘वर-खाली’ प्रकार झाला असता, तर मेळाव्यातच वादाची ठिणगी पडली असती, अशी चर्चा युवा सैनिकांमध्ये ऐकण्यास मिळाली.

आधी वाटले ऋषी विरुद्ध जंजाळऋषिकेश जैस्वाल विरुद्ध राजेंद्र जंजाळ या गटांमध्ये राडा झाला की काय, अशी चर्चा आधी होती, परंतु जंजाळ यांनीच स्पष्टीकरण देत, किरकोळ वाद असल्याचे स्पष्ट केले, तसेच मारहाण करणारे पदाधिकारी युवासेनेचे आहेत की नाहीत, याची माहिती घ्यावी लागेल. अंतर्गत वाद वगैरे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जैस्वाल म्हणाले, आम्ही प्रकरण मिटविण्यासाठी पुढे होतो. त्यामुळे आम्ही वाद केला असे कसे म्हणता येईल?

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादVarun Sardesaiवरुण सरदेसाई