शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

युवासैनिकांत का झाला वाद? वरुण सरदेसाई जाताच जुने आणि नवे पदाधिकारी आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:23 IST

एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता.

औरंगाबाद : युवासेनेच्या निश्चय मेळाव्याच्या समारोपानंतर सचिव वरुण सरदेसाई जळगावकडे जाण्यास निघाल्यानंतर, दोन गटांमध्ये मंगळवारी सायंकाळी जबरदस्त राडा झाला. बजाजनगरमधील नियुक्तीवरून नाराज असलेले जुने युवासैनिक नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांना पाहताच आमने-सामने आले. दोन गटांमध्ये वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या निश्चय मेळाव्याला गटबाजीचे गालबोट लागल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

दोन्ही गटांना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, परंतु कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे रंगमंदिराच्या आवारात अर्ध्या तासाहून अधिक वेळ तणावाचे वातावरण होते. एका पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली. हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर नेमके काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नव्हता. किरण तुपे, मिथुन व्यास, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ यांनी मध्यस्थी करून राडा मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु नियुक्त्यांवरून संतप्त झालेले कार्यकर्ते कुणाचेही ऐकत नव्हते. या सगळ्या वादामागे ग्रामीण भागात शहरी पदाधिकारी नियुक्त केल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. पदाधिकारी नियुक्त केले कुणी, त्यांना नियुक्तीचा अधिकार आहे की नाही, यावरून दोन गटांमध्ये वेगवेगळ्या चर्चा कानावर येत होत्या. पश्चिम मतदारसंघात नवीन पदे देऊन परस्पर नियुक्त्या दिल्या जात आहेत. ज्यांचे पद काढून दिले ते आणि ज्यांना पद मिळाले ते; असे दोन गट समोरासमोर आल्याने हाणामारीपर्यंत प्रकरण गेले.

नाराज व संतप्त युवासैनिकांनी राडा केलायुवासेनेत ग्रामीण विरुद्ध असा वाद असल्याची चर्चा आहे. बजाजनगर, तिसगाव या परिसरात नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी ते शहरातील आहेत, असा काही पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून हा सगळा खटाटोप करण्यात आल्यामुळे जुने युवासैनिक संतापले होते. शहरातील एकावर समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामागे पश्चिम मतदारसंघाचे आमदार यांनीदेखील हातभार लावल्याची चर्चा आहे. तिकडील जिल्हा युवाधिकाऱ्यांवरही युवासैनिक नाराज असल्यामुळे निश्चय मेळाव्यात जाब विचारण्याच्या हेतूने काही पदाधिकारी तिथे आलेले होते. यातच ज्यांना डावलून नियुक्ती करण्यात आली, तर नियुक्त्या करताना एका उपसचिवाची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे नाराज व संतप्त युवासैनिकांनी मंगळवारी राडा केला.

नेमका काय प्रकार आहे, ते जाणून घेऊयुवासेनेचे विस्तारक निखिल वाळेकर यांनी सांगितले, नेमका प्रकार काय घडला आहे, याची माहिती घेईल. शहरातील पदाधिकाऱ्यांचा त्या घटनेशी काही संबंध नसल्याचे दिसते आहे. ग्रामीण नियुक्त्यांवरून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

...तर सभागृहात झाला असता वादनिश्चय मेळावा सुरू झाल्यानंतर घोषणायुद्ध सभागृहात सुरूच होते. त्यातच बाल्कनीमध्ये बसलेल्या अनेकांना समजाविण्याचा प्रयत्न काही पदाधिकारी करीत होते. तेथे काही ‘वर-खाली’ प्रकार झाला असता, तर मेळाव्यातच वादाची ठिणगी पडली असती, अशी चर्चा युवा सैनिकांमध्ये ऐकण्यास मिळाली.

आधी वाटले ऋषी विरुद्ध जंजाळऋषिकेश जैस्वाल विरुद्ध राजेंद्र जंजाळ या गटांमध्ये राडा झाला की काय, अशी चर्चा आधी होती, परंतु जंजाळ यांनीच स्पष्टीकरण देत, किरकोळ वाद असल्याचे स्पष्ट केले, तसेच मारहाण करणारे पदाधिकारी युवासेनेचे आहेत की नाहीत, याची माहिती घ्यावी लागेल. अंतर्गत वाद वगैरे काही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जैस्वाल म्हणाले, आम्ही प्रकरण मिटविण्यासाठी पुढे होतो. त्यामुळे आम्ही वाद केला असे कसे म्हणता येईल?

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादVarun Sardesaiवरुण सरदेसाई