शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'फुले-शाहू-आंबेडकर' आदर्श का ? प्रबोधनकार ठाकरे वाचा, असे प्रश्न पडणार नाहीत: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 18:09 IST

या देशात अनेकांची राज्य झाले, पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य नव्हते ते रयतेचं राज्य होत.

औरंगाबाद: शरद पवार हे फुले शाहू आंबेडकर याचंच नाव का घेतात असं विचारतात. महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या, प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनावरील विचार जर वाचले तर असा प्रश्न कोणी विचारणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला. ते मुप्टा संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, ते फक्त फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतात असे वक्तव्य केले होते. याचा समाचार आज पवार यांनी घेतला. फुले-शाहू -आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान नमूद करताना पवार यांनी अनेक महत्वपूर्ण दाखले दिली. तसेच शिवाजी महाराजांना रयतेचे राजे का म्हणत यावर ते म्हणाले, ज्यावेळी संपूर्ण समाज अस्वस्थ होता त्यावेळी या समाजाचे सत्व जागं करण्याचं काम करून शिवाजी महाराजांनी राज्य उभं केलं. या देशात अनेकांची राज्य झाले, पण शिवाजी महाराजांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्याचं राज्य नव्हते ते रयतेचं राज्य होत. समाजातील उपेक्षित घटकांचे राज्य होते, असे गौरवद्गार शरद पवार यांनी काढले. पुढे महात्मा फुले यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, इंग्लडचा राजा भारतात आला तेंव्हा महात्मा फुले शेतकऱ्यांचा वेशात भेटायला गेले, त्यावेळी राज्यात दुष्काळ होता आणि त्यांनी पाझर तलाव निर्माण करण्याची मागणी केली, शेतीला जोडधंदा हवा, यासाठी गाई समृद्ध झाल्या पाहिजे त्यासाठी गाईंची नवीन जात आणा अशी मागणी केली. तज्ज्ञांच्या मदतीने शेतीचं उत्पादन वाढवा यासाठी संकरित वाण आणावं अशी मागणी केली म्हणून फुल्यांचं नाव घेतो. फुल्यांनी आणि सावित्रीबाई यांनी सर्वसंन्याना शिकवलं आज फुले असतील नसतील पण त्याचं योगदान संपणार नाही.

यासोबतच राजर्षी शाहू महाराजांवर बोलताना पवार म्हणाले, शाहू महाराज शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवण करायचे त्यांच्या समस्या ऐकायचे. शाहू महाराजांना खोटं बोललेलं आवडायचं नाही, त्यांचा कष्टावर विश्वास अधिक होता यावर  काही सरदार शाहूंना भेटले आणि कर्नाटकातून ज्योतिष येणार आहे, तेंव्हा शाहू म्हणाले माझा कष्टावर विश्वास आहे, यांच्यावर विश्वास नाही, भेटणार नाही, पण आग्रहावरून शाहू भेटले, त्यावेळी ज्योतिष रडायला लागले, म्हणाला तुमच्या पोलिसांनी मला पकडलं मारलं दोन दिवस जेवायला दिलं नाही त्यावर शाहू महाराज म्हणाले तू ज्योतिष आहेस मग तुला हे चार दिवस आधी कळलं नाही का.?

तिसरे नाव घेतो ते बाबासाहेब आंबेडकर यांचे, त्यांना मानायचे कारण, सध्या आपल्या आसपास आणि इतरत्र अनेक देश अस्वस्थ आहेत. तिथली कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे. पण आपल्या देशात अनेक आंदोलन झाले पण आपला देश आजही अबाधित आहे. याचे कारण संविधान आहे. हे बाबासाहेबांचे योगदान आहे. बाबासाहेबांचे देशासाठी भरीव योगदान आहे. स्वतंत्र मिळायच्या पूर्वी एक सरकार बनले यात बाबासाहेब यांच्यासह अनेक नेते होते. त्यावेळी बाबासाहेब यांच्याकडून जलसंधारण, कामगार, वीज हे खातं त्यांच्याकडे होतं. स्वातंत्र्याधी धरणं बांधण्याचं निर्णय बाबासाहेबानी घेतला. देशातील सर्वात मोठे धरण भाकरा नांगल प्रकल्प उभारण्याचा निर्णय बाबासाहेब यांनी घेतला. त्यामुळे त्या भागात आज 90 टक्के सिंचन आहे. दामोदर व्हॅली हा प्रकल्प बाबासाहेब यांनी मंजूर केला. आज वीज संकट आहे, बाबासाहेब यांनी निर्णय घेतला एखाद्या राज्यात जास्त वीज आणि एखादा राज्यात कमी वीज असेल तर ती वीज या राज्यातून त्या राज्यात नेण्यासाठी पॉवरग्रीड योजना ही बाबासाहेब यांनी आणली. ही व्यवस्था बाबासाहेबांनी केलेली आहे. असे दृष्टे नेते फुले-शाहू-आंबेडकर होते. त्यामुळे मी फुले शाहू आंबेडकर यांना आदर्श मानतो, असेही बाबासाहेबांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर