शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Aurangabad Violence : अवैैध नळ तोडण्यासाठी मोतीकारंजाच का निवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:11 IST

महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद : शहरात दंगल उसळण्यामागे महापालिकाच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. मोतीकारंजा भागात अवैध नळ कनेक्शन कापण्याच्या कारणावरून दोन गटांत भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान दंगलीत झाल्याचा अंदाज आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना खुलासा करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

शहरात सव्वालाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन तोडावेत, असे आदेश सर्वसाधारण सभेत महापौरांनीच दिले होते. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवीत मनपा अधिका-यांनी प्रारंभी कंटाळा केला. नंतर पोलीस बंदोबस्त मिळवून गुरुवारी मोतीकारंजा भागातील मुख्य जलवाहिनीवरील ४० पेक्षा अधिक नळ कापण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी परत दहापेक्षा अधिक नळ कापले. एका विशिष्ट समाजाचेच नळ कापले; दुस-या समाजाचे नळ का कापण्यात आले नाही, म्हणून वादाला सुरुवात झाली. दोन गटांत भांडण झाले. वादही काही वेळेत मिटला. या घटनेच्या दोन तासांनंतर शहागंज भागात समाजकंटकांनी दंगल घडवून आणली.

शनिवार आणि रविवारी महापालिकेला सुटी असल्याने सोमवारी सकाळीच महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोतीकारंजा का निवडण्यात आला, असा प्रश्न करण्यात आला. चहेल यांनी उत्तर दिले की, या भागातील काही नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. लोकशाही दिनातही तक्रारी होत्या, म्हणून या भागात कारवाई केली. हे उत्तर समाधानकारक नसल्याने लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार