शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Aurangabad Violence : अवैैध नळ तोडण्यासाठी मोतीकारंजाच का निवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:11 IST

महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद : शहरात दंगल उसळण्यामागे महापालिकाच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. मोतीकारंजा भागात अवैध नळ कनेक्शन कापण्याच्या कारणावरून दोन गटांत भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान दंगलीत झाल्याचा अंदाज आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना खुलासा करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

शहरात सव्वालाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन तोडावेत, असे आदेश सर्वसाधारण सभेत महापौरांनीच दिले होते. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवीत मनपा अधिका-यांनी प्रारंभी कंटाळा केला. नंतर पोलीस बंदोबस्त मिळवून गुरुवारी मोतीकारंजा भागातील मुख्य जलवाहिनीवरील ४० पेक्षा अधिक नळ कापण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी परत दहापेक्षा अधिक नळ कापले. एका विशिष्ट समाजाचेच नळ कापले; दुस-या समाजाचे नळ का कापण्यात आले नाही, म्हणून वादाला सुरुवात झाली. दोन गटांत भांडण झाले. वादही काही वेळेत मिटला. या घटनेच्या दोन तासांनंतर शहागंज भागात समाजकंटकांनी दंगल घडवून आणली.

शनिवार आणि रविवारी महापालिकेला सुटी असल्याने सोमवारी सकाळीच महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोतीकारंजा का निवडण्यात आला, असा प्रश्न करण्यात आला. चहेल यांनी उत्तर दिले की, या भागातील काही नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. लोकशाही दिनातही तक्रारी होत्या, म्हणून या भागात कारवाई केली. हे उत्तर समाधानकारक नसल्याने लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार