शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Aurangabad Violence : अवैैध नळ तोडण्यासाठी मोतीकारंजाच का निवडला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:11 IST

महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला.

औरंगाबाद : शहरात दंगल उसळण्यामागे महापालिकाच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. मोतीकारंजा भागात अवैध नळ कनेक्शन कापण्याच्या कारणावरून दोन गटांत भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान दंगलीत झाल्याचा अंदाज आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना खुलासा करण्याचा आदेशही त्यांनी दिला.

शहरात सव्वालाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन तोडावेत, असे आदेश सर्वसाधारण सभेत महापौरांनीच दिले होते. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवीत मनपा अधिका-यांनी प्रारंभी कंटाळा केला. नंतर पोलीस बंदोबस्त मिळवून गुरुवारी मोतीकारंजा भागातील मुख्य जलवाहिनीवरील ४० पेक्षा अधिक नळ कापण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी परत दहापेक्षा अधिक नळ कापले. एका विशिष्ट समाजाचेच नळ कापले; दुस-या समाजाचे नळ का कापण्यात आले नाही, म्हणून वादाला सुरुवात झाली. दोन गटांत भांडण झाले. वादही काही वेळेत मिटला. या घटनेच्या दोन तासांनंतर शहागंज भागात समाजकंटकांनी दंगल घडवून आणली.

शनिवार आणि रविवारी महापालिकेला सुटी असल्याने सोमवारी सकाळीच महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोतीकारंजा का निवडण्यात आला, असा प्रश्न करण्यात आला. चहेल यांनी उत्तर दिले की, या भागातील काही नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. लोकशाही दिनातही तक्रारी होत्या, म्हणून या भागात कारवाई केली. हे उत्तर समाधानकारक नसल्याने लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार