शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

इथेनॉलला एक अन् कांद्याला दुसरा न्याय का? निर्यातबंदी हटविण्याची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:14 IST

पहिल्यांदा निर्यात कर लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यांनतर आता थेट निर्यातबंदी जाहीर केल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत.

- जयेश निरपळगंगापूर : केंद्र सरकारने साखरेपासूनच्या इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांसह साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. त्याप्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. इथेनॉलला एक अन् कांद्याला दुसरा न्याय का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

गंगापूर तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यावर तालुक्यातील जिरायत व बागायतदार शेतकऱ्यांचे प्रपंच आणि बाजारपेठेतील उलाढाल अवलंबून असते; मात्र पहिल्यांदा निर्यात कर लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यात आले. त्यांनतर आता थेट निर्यातबंदी जाहीर केल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत. सध्याही दराची घसरण सुरूच असून, कांद्याच्या बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. चार हजार रुपये दराने विकले जाणारे कांदे आता दीड हजाराने विकले जात असल्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. दूषित हवामानामुळे कांदा उत्पादनावरील खर्च वाढत चालला आहे. खर्चाच्या प्रमाणात उत्पादन निघत नाही. त्यामुळे कांद्याची शेती नेहमी तोट्यात असते. तेजी-मंदीत दर तीन-चार वर्षांनी कांद्याला चांगले वर्ष येते. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. यंदा कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच निर्यातबंदी झाली असून, साखर कारखानदारांची मर्जी सांभाळण्यासाठी इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवली गेली; मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू कोण मांडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘शुगर लॉबी’ ठरली वरचढयंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साखरेचे उत्पादन कमी होऊन साखरेच्या दरात वाढ होईल, या भीतीने केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मितीवर बंदी घातली होती; मात्र राजकारणात हेवी वेट असणाऱ्या शुगर लॉबीने इथेनॉलनिर्मितीवरिल बंदी हटविण्यास शासनाला भाग पाडले आणि १५ दिवसांच्या आत केंद्र शासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला. अशात कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही वसूल होणे मुश्कील झाले असून सरकारने इथेनॉलप्रमाणे कांद्यावरील निर्यातबंदीही उठवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.

निर्यात बंदी उठवणे आवश्यकउसाइतकेच कांदा पीक महत्त्वाचे आहे. तालुक्यात २० हजारांवर शेतकरी कांदा पिकवितात. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत सापडले असून, याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागेल. निर्यात बंदी उठवणे आवश्यक असून, याविरोधात आवाज उठवणार आहे.- डॉ. ज्ञानेश्वर नीळ, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट)

शेतकऱ्यांवर आर्थिक घावमध्यंतरी झालेल्या अवकाळीने कांद्याचे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक असताना निर्यातबंदी घालून एकप्रकारे शेतकऱ्यांवर आर्थिक घाव घालण्याचे काम सरकारने केले आहे.- राहुल ढोले, शेतकरी, टेंभापुरी

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र