शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दंगेखोरांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाही; औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अधिकार्‍यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:40 IST

विशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्‍यांना विचारला.

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्‍यांना विचारला.१२ जानेवारीपर्यंत रजा मंजूर असताना शहरात दंगल पेटल्याचे कळताच पोलीस आयुक्त ४ जानेवारी रोजी सिंगापूर येथून औरंगाबादेत परतले

औरंगाबाद : विशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्‍यांना विचारला. १२ जानेवारीपर्यंत रजा मंजूर असताना शहरात दंगल पेटल्याचे कळताच पोलीस आयुक्त ४ जानेवारी रोजी सिंगापूर येथून औरंगाबादेत परतले आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. 

बुधवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त यादव म्हणाले की, पोलिसांना देण्यात आलेल्या प्लास्टिक गोळ्या (बुलेट) दंगलखोरांच्या कमरेखाली लागाव्यात असा मारा करण्याच्या सूचना असतात. प्लास्टिक गोळ्या  लागल्यामुळे कोणीही मृत्युमुखी पडत नाही, मात्र तीन ते चार दिवस त्यांना त्याचा त्रास होतो आणि कोणीही दंगा करण्याचे धाडस करीत नाही. १ जानेवारी रोजी रात्री आपण औरंगाबादेतून रजेवर गेलो तेव्हा शहरात एक जमाव जमला होता आणि पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले होते. दुसर्‍या दिवशी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि ठिकठिकाणी दगडफेक आणि वाहने जाळण्याचे प्रकार होण्यास सुरुवात झाली. तीन दिवस शहरात ही दंगल सुरू होती. याविषयी माहिती मिळताच आपण रजा अर्धवट सोडून औरंगाबादेत परतलो; मात्र तीन दिवसांत शहरात शांतता प्रस्थापित करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले होते. 

दोन दिवसांपासून शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दंगलीच्या काळात पोलिसांवर दगडफेक करणार्‍यांविरोधात लाठीहल्ला, अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यासोबतच पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांच्या हवेत ५३ फैरी झाडल्या. हवेत गोळीबार केल्याने त्याचा परिणाम दंगलखोरांवर होत नाही. उलट दंगलखोरांच्या कमरेखाली प्लास्टिक गोळ्या झाडल्यास त्यांना दुखापत होते; मात्र मृत्यू होत नाही आणि मात्र कायमचा त्यांना जरब बसतो.

दंगाकाबू नियंत्रण पथकाची स्थापनादरम्यान, शहरात उद्भवणार्‍या अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी दंगा नियंत्रण पोलीस पथक (आर.सी.पी.) स्थापन करण्यात आले. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे या पथकाच्या प्रमुख आहेत. या पथकात ४० जवान असतील. दंगेखोरांना कमरेखाली प्लास्टिक गोळ्या कशा माराव्यात, याबाबतचे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद