शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कचरा प्रश्नी प्रधान सचिव शहरात येऊन पाहणी का करत नाहीत ?; खंडपीठाचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:35 IST

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहराचे वातावरण अधिकाधिक दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव औरंगाबाद शहराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी का करीत नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. 

औरंगाबाद : कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहराचे वातावरण अधिकाधिक दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव औरंगाबाद शहराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी का करीत नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने मंगळवारी (दि.१७ एप्रिल) उपस्थित केला. 

मूळ याचिकेसह अवमान याचिका आणि महापालिका बरखास्तीबाबतच्या याचिकांवर २० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेने मंगळवारी पुन्हा नवीन शपथपत्र सादर करून घनकचरा व्यवस्थापनाकरिता सात जागा निश्चित केल्या असून, संनियंत्रण समितीने त्या जागांना मान्यता दिल्याची माहिती सादर केली. त्यापैकी मिटमिट्याची जागा सफारीपार्क आणि वनक्षेत्र आहे. शासनाच्या परवानगीशिवाय तेथे कचरा टाकता येणार नाही, असे अ‍ॅड. विजयकुमार सपकाळ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

या जागा तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरणार याबाबत सुस्पष्ट शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या सात जागांमध्ये नारेगावच्या जागेचाही उल्लेख आहे. औरंगाबाद खंडपीठाने नारेगावला कचरा टाकण्यास कायम मनाई केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याचे सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर नारेगावच्या जागेचा समावेश करणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचेही मत खंडपीठाने व्यक्त केले. 

मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांनी मंगळवारी अवमान याचिका दाखल केली. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी १ मार्च २०१८ रोजी शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत कालबद्ध कार्यक्रम सादर केला. त्यावरून खंडपीठाने अंतरिम आदेशही दिला. यासाठी शासनाने आर्थिक मदतही केली. असे असताना मागील दोन महिन्यांपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन विस्कळीत झाले असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरातील वातावरण दूषित आणि रोगट झाले आहे. मात्र, कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेने अद्याप जागा निश्चित केली नाही. यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याने सर्व प्रतिवादींवर ‘अवमानविषयक’ कारवाई करावी, अशी विनंती अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने केली. अशोक गंगावणे यांनी दिवाणी अर्ज सादर करून  नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यास महापालिका अपयशी ठरली आहे. ‘बीओटी’ व ‘पीपीपी’ तत्त्वावरील अनेक योजना अपयशी ठरल्यामुळे  महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची विनंती त्यांनी केली. 

न्यायमूर्तींनीही केली कचऱ्याची पाहणीशहरातील प्रत्येक नागरिक ‘कचऱ्याच्या’ समस्येने चिंतित आहे. न्यायमूर्तींनीसुद्धा शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केल्याचा उल्लेख केला. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठGarbage Disposal Issueकचरा प्रश्न