शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रश्नी प्रधान सचिव शहरात येऊन पाहणी का करत नाहीत ?; खंडपीठाचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:35 IST

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहराचे वातावरण अधिकाधिक दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव औरंगाबाद शहराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी का करीत नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. 

औरंगाबाद : कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहराचे वातावरण अधिकाधिक दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव औरंगाबाद शहराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी का करीत नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने मंगळवारी (दि.१७ एप्रिल) उपस्थित केला. 

मूळ याचिकेसह अवमान याचिका आणि महापालिका बरखास्तीबाबतच्या याचिकांवर २० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेने मंगळवारी पुन्हा नवीन शपथपत्र सादर करून घनकचरा व्यवस्थापनाकरिता सात जागा निश्चित केल्या असून, संनियंत्रण समितीने त्या जागांना मान्यता दिल्याची माहिती सादर केली. त्यापैकी मिटमिट्याची जागा सफारीपार्क आणि वनक्षेत्र आहे. शासनाच्या परवानगीशिवाय तेथे कचरा टाकता येणार नाही, असे अ‍ॅड. विजयकुमार सपकाळ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

या जागा तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरणार याबाबत सुस्पष्ट शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या सात जागांमध्ये नारेगावच्या जागेचाही उल्लेख आहे. औरंगाबाद खंडपीठाने नारेगावला कचरा टाकण्यास कायम मनाई केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याचे सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर नारेगावच्या जागेचा समावेश करणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचेही मत खंडपीठाने व्यक्त केले. 

मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांनी मंगळवारी अवमान याचिका दाखल केली. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी १ मार्च २०१८ रोजी शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत कालबद्ध कार्यक्रम सादर केला. त्यावरून खंडपीठाने अंतरिम आदेशही दिला. यासाठी शासनाने आर्थिक मदतही केली. असे असताना मागील दोन महिन्यांपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन विस्कळीत झाले असून, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरातील वातावरण दूषित आणि रोगट झाले आहे. मात्र, कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेने अद्याप जागा निश्चित केली नाही. यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याने सर्व प्रतिवादींवर ‘अवमानविषयक’ कारवाई करावी, अशी विनंती अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने केली. अशोक गंगावणे यांनी दिवाणी अर्ज सादर करून  नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यास महापालिका अपयशी ठरली आहे. ‘बीओटी’ व ‘पीपीपी’ तत्त्वावरील अनेक योजना अपयशी ठरल्यामुळे  महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची विनंती त्यांनी केली. 

न्यायमूर्तींनीही केली कचऱ्याची पाहणीशहरातील प्रत्येक नागरिक ‘कचऱ्याच्या’ समस्येने चिंतित आहे. न्यायमूर्तींनीसुद्धा शहरातील अनेक ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केल्याचा उल्लेख केला. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठGarbage Disposal Issueकचरा प्रश्न