शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 17:35 IST

नावांची शोधाशोध सुरू असून दिग्गजांच्या नकारांमुळे मराठवाड्याची संधी हुकणार

- राम शिनगारे

औरंगाबाद : वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवट वादानेच नाशिक येथे झाला. याच संमेलनात ९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. त्यानंतर मराठवाड्याच्या साहित्य वर्तुळात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्यातील लेखकाला मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात दिग्गज लेखकांच्या नकारामुळे मराठवाड्याची संधी हुकणार असल्याची शक्यता महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मराठवाडा साहित्य परिषदेकडे आहे. हा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न आहे. त्याची तयारी ९४वे साहित्य संमेलन होण्यापूर्वीच सुरू झालेली आहे. महामंडळाच्या स्थळ निवड समितीने उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाची पाहणी करून त्याचा अहवाल नाशिक येथे महामंडळाच्या बैठकीत सादर केला. ९५वे साहित्य संमेलन घेण्यासाठी केवळ उदगीर येथूनच निमंत्रण मिळाले होते. शेवटच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील एका संस्थेनेही संमेलन घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. मात्र, त्यापूर्वीच उदगीरच्या नावाची घोषणा झाल्यामुळे ते नाव मागे पडले. 

उदगीर येथील मराठवाडा साहित्य परिषदेची स्थानिक शाखा आणि उदयगिरी महाविद्यालयाने संयुक्तपणे संमेलनाचा प्रस्ताव दिलेला आहे. या दोन्ही संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्या एका पक्षाला संमेलन दिले हा आरोप होऊ नये, याची काळजीही महामंडळाने घेतली. आता महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नावांचा शोध सुरू केला आहे. 

आगामी आठ दिवसात त्यावर बैठक होणार आहे. मराठवाड्यातील लेखकांमध्ये प्रामुख्याने रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, सुधीर रसाळ, नरेंद्र चपळगावकर, दत्ता भगत आदींच्या नावाचा समावेश होतो. यातील चार जणांनी अध्यक्ष होण्यास नकार दिलेला आहे. तसेच, मागील वेळी चर्चेतील भारत सासणे यांचे नाव आता मागे पडले आहे. त्याशिवाय इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, दासू वैद्य, पी. विठ्ठल आदी दुसऱ्या फळीतील साहित्यिक मराठवाड्यात आहेत. मात्र, त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ साहित्यिक उर्वरित महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील लेखकांचे नाव पुढे करण्याचा धोका महामंडळ पत्करणार नाही, असे एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आधी मराठवाडा, नंतर अखिल भारतीयची संधीउदगीर येथील मसाप शाखेने ४०वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यांच्या आयोजनावर ठाले पाटील समाधानी असल्यामुळेच त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाल्याची चर्चा आहे. त्यानुसार ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची संधी औरंगाबाद येथील लोकसंवाद फाउंडेशन संस्थेला दिली होती. आता त्या संस्थेलाही आगामी काळात ठाले पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी देतील, अशीही चर्चा करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळmarathiमराठी