शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

लोकसभा मतदारसंघ कोणाकडे? छ. संभाजीनगर भाजपमध्ये चलबिचल; ८ वेळा मुंबई, दिल्ली वाऱ्या 

By विकास राऊत | Updated: March 19, 2024 12:54 IST

शांततेत दडलंय काय, जागेच्या वाटाघाटीत काय होणार यावर कुणीच काही बोलेना

छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि शिवसेना शिंदे गटात औरंगाबादलोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही जागा महायुतीच्या वाटाघाटीत भाजपलाच सुटावी, यासाठी भाजप पदाधिकारी, नेत्यांनी ६ मार्चपासून आजवर आठवेळा मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या केल्या. उमेदवारीचे चित्र अजूनही अस्पष्टच असल्यामुळे इच्छुकांसह पक्षाचे नेते, पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनंतर भाजप ही जागा पहिल्यांदाच लढणार असे चित्र स्पष्ट झालेले असताना शिवसेना शिंदे गटाने दहा दिवसांपासून ही जागा शिंदे गट लढणार असा दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपतील इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. जागेच्या वाटाघाटीत काय होणार यावर पक्षातील पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत, तर शिंदे गटाकडून रोज जागा आमचीच असा दावा करण्यात येत आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या भेटी घेऊन पक्षाने मागील वर्षभरापासून केलेले काम, सामाजिक समीकरणासह इतर बाजू मांडल्या आहेत. शिंदे गटाला जागा सुटल्यास भाजपच्या संघटन बांधणीवर मोठा परिणाम होईल. शिंदे गटाने मतदारसंघ बांधणीसाठी प्रयत्न केलेले नाहीत. भाजपच्या नेटवर्कवरच त्यांची भिस्त आहे, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. जागा न सुटल्यास नाराज झालेली भाजपची फळी शिंदे गटाचे किती ताकदीने काम करील याबाबत पदाधिकारी खासगीत बोलताना शंका व्यक्त करीत आहेत. औरंगाबादलोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. भाजपचे दोन आमदार आहेत. शिंदे गटाचा एकही मंत्री मतदारसंघात नाही, तर भाजपकडे एक केंद्रीय राज्यमंत्री आणि एक राज्यात असे दोन मंत्री आहेत. भाजप किमान वर्षभरापासून मतदारसंघात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे, तर शिंदे गटाकडूनही असाच दावा करण्यात येत आहे.

भाजपकडून प्रतिक्रिया नाहीजागा मागणीवरून शिंदे गटाच्या आक्रमकतेपुढे भाजपकडून कुणीही प्रतिक्रिया देत नाही. भाजप एवढी शांत का आहे, त्यांच्या शांततेत नेमके काय दडले आहे, हे कळण्यास मार्ग नाही. एकतर जागा सुटणार असा त्याचा अर्थ आहे किंवा जागा शिंदे गटाला जाणार असा दुसरा अर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चर्चेचे गुऱ्हाळ लांबणारलोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी अधिसूचना गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी निघणार आहे. आजपासून एक महिन्याने अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबतो की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या आठवड्यात तिढा सुटला तर सुटेल, वाटाघाटीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ एप्रिल उजाडेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा