शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

गुलमंडीवर सत्ता कुणाची? शिवसेनेची की भाजपची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:42 IST

१९८८ पासून २०१० पर्यंत गुलमंडी वॉर्डावर शिवसेनेने एकहाती अधिराज्य गाजविले.

ठळक मुद्देसध्या वॉर्ड भाजप समर्थकांकडे सेना बालेकिल्ला परत मिळविणार?

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडी वॉर्डावर अधिराज्य कोण गाजवणार? असा प्रश्न आतापासूनच उपस्थित होत आहे. सध्या वॉर्ड भाजप समर्थक तथा अपक्ष नगरसेवक राजू तनवाणी यांच्या ताब्यात आहे. शिवसेना आपला गड भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. वॉर्ड यंदा ओबीसी किंवा ओबीसी महिला तसेच अनुसूचित जातीसाठी राखीव होईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येतो. आरक्षणाचे समीकरण निश्चित झाल्यावर सेना-भाजप नेते आपले राजकीय पत्ते ओपन करणार आहेत.

१९८८ पासून २०१० पर्यंत गुलमंडी वॉर्डावर शिवसेनेने एकहाती अधिराज्य गाजविले. २०१५ पूर्वी भाजपमध्ये गेलेले माजी आ. किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी या वॉर्डातून अपक्ष निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली. पक्ष कोणताही असला तरी गुलमंडी आमचीच असा संदेश तनवाणी कुटुंबियांनी दिला होता. राजू तनवाणी यांना २१५६ तर अपक्ष उमेदवार पप्पू व्यास यांना १९९८ मते पडली होती. अवघ्या १५८ मतांनी तनवाणी विजयी झाले होते.  शिवसेना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली. माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी आपला पुतण्या सचिन खैरे यांना उमेदवारी दिली होती. सचिन यांना १४७७ मते मिळाली होती. बेगमपुरा वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत खैरे यांनी पुतण्या सचिन यांचे पुनर्वसन केले होते.

एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होईल यावर पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहे. तनवाणी कुटुंबातून कोणीही निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत सध्या नाही. भाजप येथून प्रबळ दावेदार देणार हेसुद्धा तितकेच खरे आहे. मागील निवडणुकीत अवघ्या १५८ मतांनी पराभूत झालेल्या पप्पू व्यास यांच्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. गुलमंडी वॉर्डात अधिकृत कमळ कसा फुलेल यादृष्टीने भाजप मैदानात उतरणार आहे. 

शिवसेना आपला गड मिळविण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरणार आहे. चंद्रकांत खैरे यांच्या कुटुंबातून ऋषी खैरे यांना ज्योतीनगर वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यास तेथून निवडणूक लढविण्याचा एक विचार सुरू आहे. आ. प्रदीप जैस्वाल आपले चिरंजीव ऋषी जैस्वाल यांना मनपा निवडणूक रिंगणात उतरविणार हे निश्चित आहे. ऋषी जैस्वाल गुलमंडी वॉर्ड ओबीसीसाठी राखीव झाल्यास तेथून सेनेचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. समर्थनगर वॉर्ड ओबीसी झाल्यास ऋषी तेथून निवडणूक लढवतील. गुलमंडी वॉर्डातून मिथुन व्यास यांच्यावरही डाव खेळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते. व्यास कुटुंबियांमधील कलहाचा फायदा सेना घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

गुलमंडीवरील आजपर्यंतचे नगरसेवक१९८८ - चंद्रकांत खैरे (शिवसेना)१९९५ - प्रदीप जैस्वाल (शिवसेना)२००० - किशनचंद तनवाणी (शिवसेना)२००५ - किशनचंद तनवाणी (शिवसेना)२०१० - प्रीती तोतला (शिवसेना)२०१५ - राजू तनवाणी (अपक्ष-भाजप समर्थन)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाGulmandiगुलमंडीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका