शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जेवण बनवताना कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली? फायदा, तोटा समजून घ्या

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 24, 2022 12:41 IST

काळजी घ्या नाही तर सामोरे जावे लागेल आजारांना

औरंगाबाद : स्वयंपाकघरात तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यात स्वयंपाक करीत आहात, त्यांचा काय फायदा, काय तोटा यांचाही विचार केला पाहिजे. कारण त्याचा आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. अशी अनेक धातू आहेत ज्यात स्वयंपाक केल्याने अन्नपदार्थांचे पोषक घटकच नष्ट होत नाहीत, तर ते शरीरासाठी विषारीदेखील बनतात. त्यामुळे अशी भांडी न वापरलेली बरी, असे तज्ज्ञांनी सांगितले.

चांगल्या आरोग्याचा महामार्ग स्वयंपाकघरातून म्हणजे आहारातून जात असतो. दिवसभराचा कामाचा धावपळ आणि त्यातून असणारी आव्हाने या संपूर्ण परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी चांगला आहार तितकाच फायद्याचा पर्याय ठरतो. प्रत्येक जण आपापल्यापरीने शक्य असेल त्या सोयी-सुविधांनी अन्नपदार्थ तयार करतात. यासाठी भांडी कोणती वापरली जातात, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. बऱ्याच भांड्यांमध्ये असणारे घटक पदार्थांची चव वाढविण्यासोबच त्यांच्यातील पोषक तत्त्वांमध्येही भर टाकत असतात. काही भांडी शरीराला अपायकारक ठरण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

स्टील : स्वयंपाकासाठी सर्वांत सहज उपलब्ध आणि उत्तम भांडी म्हणजे स्टेनलेस स्टीलची. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि चमकदार आहे, ज्यामुळे ते अधिक चांगले मानले जाते. स्टेनलेस स्टील कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, परंतु या धातूचा चांगलेपणा त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. बनावट स्टेनलेस स्टीलची भांडी आरोग्यासाठी हानीकारक असू शकतात.

ॲल्युमिनिअम : जुनी, पारंपरिक म्हणून वापरलेली ॲल्युमिनिअमची भांडी आता मागे पडू लागली आहेत. ॲल्युमिनिअमची भांडी क्वचितप्रसंगी आणि थोड्या वेळासाठी वापरले, तर त्याचे लगेच दुष्परिणाम होत नाहीत, परंतु कायमच या भांड्यांमध्ये अन्न शिजवून दीर्घकाळ सेवन होत असेल, तर ते मेंदूसाठी अहितकर आहे. विसराळूपणा, मेंदूची नेहमीची काम करण्याची क्षमता कमी होणे, अल्झायमर हा आजार या धातूच्या अतिवापराचा दुष्परिणाम ठरू शकतो.

तांबे : तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे सुरक्षित मानले जाते. या धातूला उच्च तापमानात गरम करणे टाळावे लागते. कारण ते अग्नीवर वेगाने प्रतिक्रिया देते. उच्च उष्णतेवर तांब्याच्या भांड्यात मीठ आणि आम्ल मिसळल्यामुळे अनेक प्रकारची रसायने तयार होऊ लागतात. त्यामुळे अन्नपदार्थ या भांड्यात करू नये, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लोखंड : चांगल्या दर्जाची लोखंडी भांडे वापरणे फायदेशीर ठरू शकते. लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना अशा भांड्यातील अन्नपदार्थ फायदेशीर ठरू शकतात, मात्र ही भांडी गंज लागलेली नसावी. त्यादृष्टीने लक्ष दिले पाहिजे.

मातीची भांडी : मातीची भांडी स्वयंपाकासाठी सर्वांत सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे. मातीची भांडी त्यांच्या खास शैलीमुळे खूप लोकप्रिय होत आहेत, मात्र स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो आणि ती सांभाळणेही कठीण असते. म्हणूनच अनेकांना मातीच्या भांड्यात अन्न शिजविणे अवघड जाते.

भांडी महत्त्वपूर्णॲल्युमिनिअमची भांडे वापरता कामा नये. या भांड्यात तयार केलेले अन्नपदार्थ सतत सेवन केल्यास काही आजारांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांगल्या प्रतीच्या लोखंडी भांड्यात अन्नपदार्थ तयार करणे हे लोहाची कमतरता भरू काढण्यासाठी फायदेशीर ठरते.- मंजू मंठाळकर, आहारतज्ज्ञ

नैसर्गिक आहार उत्तमनैसर्गिक आहार केव्हाही चांगला आहे. कारण साखर, मीठ यांचा वापर आला की आजार आला, अशी परिस्थिती आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा आरोग्यावर काही ना काही परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक आहार अधिक फायदेशीर ठरतो.- डाॅ. प्रवीण सूयवंशी, उपाधिष्ठाता, एमजीएम हाॅस्पिटल

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.