शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

निधी लाटणाऱ्यांवर गुन्हे का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:24 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला.

ठळक मुद्देजि.प. सर्वसाधारण सभेत सवाल : जिल्हा आरोग्य अधिकाºयांवर भडीमार

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी अपहार प्रकरणावरून सर्वसाधारण सभेत सोमवारी जोरदार खडाजंगी झाली. निधी लाटण्याचे प्रकार आरोग्य विभागात सातत्याने होत आहेत. तरीही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात तक्रार का केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित करून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला. दरम्यान, आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून यासंदर्भात मार्गदर्शन प्राप्त होताच येत्या आठ दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.जि. प. सदस्य किशोर पवार, उपाध्यक्ष केशव तायडे पाटील, सुरेश सोनवणे, विजय चव्हाण, मधुकर वालतुरे, एल. जी. गायकवाड, रमेश पवार, अविनाश गलांडे, रमेश गायकवाड या सदस्यांनी आरोग्य विभागात पुरवठादारास ९ लाखांचे ९० लाख देण्यात आले. अलीकडे २ लाख ३० हजार रुपयांचे देणे असताना २३ लाख रुपये हडप केले. या प्रकाराने आणखी किती लाखांचा अपहार आरोग्य विभागाला अपेक्षित आहे. यासंदर्भात मुंबई येथील आरोग्य विभागाच्या पथकाने सविस्तर चौकशी केल्यानंतरही दोषी अधिकारी- कर्मचाºयांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल का केला नाही. आरोग्य विभाग निधी लाटणाºया कर्मचाºयांना पाठीशी घालत असल्याचा या सदस्यांनी आरोप केला.सदस्यांच्या आरोपाचे खंडण करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सभागृहासमोर स्पष्टीकरण दिले की, ज्या कर्मचाºयांनी ही चूक केली होती, त्या कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ‘एनएचएम’ मध्ये कंत्राटी अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्याचे अधिकार आरोग्य आयुक्तांना आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आल्याशिवाय पोलिसात गुन्हे दाखल करता येणार नाहीत. तेव्हा उपाध्यक्ष केशव तायडे व किशोर पवार म्हणाले की, जि. प. मध्ये अन्य विभागातील कर्मचाºयांकडून एखादी चूक झाली, तर लगेच त्याविरुद्ध कठोर पावले उचलली जातात, मग आरोग्य विभागात लाखो रुपयांचा घोटाळा केल्यानंतरही त्या कर्मचाºयास केवळ सेवेतून बडतर्फ केले जाते. मग, अपहार केलेल्या रकमेची भरपाई कोण देणार. तेव्हा डॉ. गिते म्हणाले की, ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात आली आहे. यावरही सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी दोन दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली.चौकट .....आठ दिवसांत केली जाईल दोषींविरुद्ध पोलीस कारवाईमुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सभागृहाला सांगितले की, डॉ. गिते यांनी जिल्हा आरोग्य अधिकारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना या घटनेविषयी मुंबईला पाठविण्यात आले. तेथे आरोग्य विभागाच्या आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर चौकशी पथक जिल्हा परिषदेत पाठविले. अधिकाºयांच्या चौकशी पथकाने आरोग्य विभागात तब्बल १५ ते २० दिवस तळ ठोकून ‘एनएचएम’च्या प्राप्त सर्व निधीची पडताळणी करून ते पथक मुंबईला रवाना झाले. आरोग्य आयुक्तांसोबत चर्चा करून येत्या आठ दिवसांत दोषी कर्मचाºयांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील.------------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा