शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

गावोगाव फिरणारे नेते गेले कुठे ?

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.

जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.जालना तालुक्यातील वखारी या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांबरोबर मंगळवारी हितगुज करतेवेळी ते बोलत होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, प्रवक्त्या आ. निलम गोऱ्हे, उपनेते खा. चंद्रकांत खैरे, उपनेते रविंद्र मिर्लेकर, माजी मंत्री तथा आ.अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. शिवाजीराव चोथे, डॉ.हिकमतराव उढाण, माजी आ. संतोष सांबरे, जि.प.चे उपाध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठाकरे यांनी आपण दुष्काळाचे राजकारण करण्याचा करंटेपणा करणार नाही, असे नमूद करीत विरोधकांवर बोचरी टीका केली. दीड-दोन महिन्यांपूर्वीच्या निवडणुकांमधून गावोगाव देशातले मोठ-मोठे नेते फिरत होते. तोंड फाटेपर्यंत आश्वासनांसह भुलथापा मारत होते. परंतु संकट कोसळले तेव्हा हे मोठ-मोठे नेते फोटोपर्यंत मर्यादीत राहिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यातील काहींना मराठवाड्यातील दुष्काळही माहित नसेल, असे ते म्हणाले.गेल्या निवडणुकीत लाट होती. असेलही. पण ती लाट गेली. आता राहिला कोरडेठाकपणा. कोरडेठाकपणा... या लाटेचे पाणी कुठे गेले ? असा सवालही ठाकरे यांनी केला. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. आपणही मुंबईतून स्थितीचा आढावा घेवू शकलो असतो. मात्र तसे न करता प्रत्यक्ष दौरा करण्याचा, सर्वसामान्यांच्या दु:खात सहभागासह सांत्वनाचा, मदतीचा निश्चय केला. परंतु ज्यांना शेतीतले कळते, ते अद्यापपर्यंत आले का? असा सवालही ठाकरे यांनी केला. शेतकरी जगतोय का मरतोय, हे पाहण्याचे भानसुध्दा काहींना राहिले नसल्याची जोरदार टीका केली. शिवसेना आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असा विश्वास दिला. यावेळी आ. निलम गोऱ्हे, आ. संदीपान भुमरे, आ. संजय सिरसाट, आ. हर्षवर्धन जाधव, आ. दिपक केसरकर, आ. हेमंत पाटील, उपनेते लक्ष्मण वडले, उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, तालुका प्रमुख संतोष मोहिते, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, अंकुश पाचफुले, जि.प. सदस्या सरला वाढेकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)४येत्या हिवाळी अधिवेशनातून दुष्काळी स्थितीचा सरकारला हेरुन जाब विचारला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडले जाईल, असे नमूद करीत ठाकरे यांनी दुष्काळ तर जाहीर होईलच; पीक कर्ज, वीज बील माफी, शैक्षणिक शुल्क माफीसह प्रति हेक्टरी अनुदान वगैरे धोरणात्मक निर्णय सुध्दा होतीलच, असा विश्वासही व्यक्त केला. आपण या दौऱ्यानंतर राज्यपालांची भेट घेणार असून सरकारला स्पष्ट निर्देश द्यावेत, राज्यपालांनीही दुष्काळी परिस्थतीची पाहणी करावी. मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.गेल्या तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळ अनुभवतो आहे. यावर्षीही स्थिती गंभीर आहे.शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. खचला आहे. परंतू संकटकाळात खचून न जाता, न रडता. याही संकटाचा सामना करतांना त्यावर मात करण्याचा संकल्प सोडला पाहिजे, आत्महत्येचा मार्ग न स्विकारता, मुलाबाळांसह कुटुंबियांचा संसार उद्ध्वस्त न करता, शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सदा-सर्वदा वाईट दिवस नसतात. एखादा दिवस निश्चितच चांगला येईल. तो आनंदाचाच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.रखडलेले प्रकल्प मार्गी लावादुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करतेवेळी केवळ प्रथमोपचार न करता सरकारने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अर्धवट अवस्थेत रखडलेले प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. तरच दुष्काळाची तीव्रता कमी होईल, असे मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. वर्षानुवर्षांपासून रखडलेले प्रश्न दुष्काळास कारणीभूत ठरताहेत, असे ते म्हणाले. सरकारने या रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी दिला पाहिजे. मराठवाड्यात अनेक प्रकल्पांचे काम होणे अद्याप बाकी आहे. आपण केलेल्या या दौऱ्यात सर्व ठिकाणी प्रामुख्याने या बाबी दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.