शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कुठे जोरदार तर कुठे रिमझिम; मराठवाड्यातील सहा मंडळे दमदार पावसाने चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:50 IST

विभागात ढगाळ वातावरण कायम 

औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना आणि नांदेड, लातूर जिल्ह्यांतील एकूण सहा मंडळे दमदार पावसाने चिंब झाली. बुधवारी सकाळपर्यंत विभागात ११.४५ मि. मी. पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील पाच, नांदेड व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विभागात कुठे दमदार तर कुठे रिमझिम असा पाऊस सध्या सुरू असून, ढगाळ वातावरण दोन दिवसांपासून कायम आहे. 

जालना  शहर ८६ मि. मी., भोकरदन ७८ मि.मी., राजूर ८० मि.मी., अन्वा ७० मि.मी., जाफ्राबाद ८५ मि.मी. या महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील एकेका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औरंगाबादसह विभागात कमी-अधिक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना गती दिली आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत विभागात पावसाची मोठी कमतरता आहे. सर्व विभागात दमदार पावसाची हजेरी झाल्याची नोंद न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजून कायम आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ११.९४ मि.मी., जालना २२.५६ मि.मी., परभणी १२.०५ मि.मी., हिंगोली १७.०६ मि.मी., नांदेड  १४.५७ मि.मी., बीड ३.४४ मि.मी., लातूर ९.०४ मि.मी., तर उस्मानाबाद जिल्ह्यात ०.९५ मि.मी. पाऊस झाला. विभागात आजवर अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५५.८ टक्के  तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त ११.८ टक्के  पाऊस झाला आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मराठवाड्यातील बहुतांश मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यांतील काही मंडळात चांगला पाऊस झाला आहे. मात्र जलप्रकल्पांत अजून नोंद घेण्याइतके पाणी आलेले नाही.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती