शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वाळूजला एमआयडीसीचे पाणी कधी मिळणार?; निविदा मंजुरीलाच लागले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:21 PM

वाळूजला एमआयडीसीतर्फे वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी मंजूर झालेला आहे; मात्र निविदा मंजूर व्हायलाच एक वर्ष लागल्याने या उन्हाळ्यात तरी जनतेला एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.  

ठळक मुद्देवाळूजला एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे वर्षभरापासून हा प्रस्ताव अडगळीत पडला होता.

औरंगाबाद : वाळूजला एमआयडीसीतर्फे वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी मंजूर झालेला आहे; मात्र निविदा मंजूर व्हायलाच एक वर्ष लागल्याने या उन्हाळ्यात तरी जनतेला एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.  

वाळूजला एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे वर्षभरापासून हा प्रस्ताव अडगळीत पडला होता. ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेने वाढीव पाणीपुरवठा प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा मंजूर होण्याची प्रतीक्षा ग्रामपंचायतीला करावी लागली. नवीन जलवाहिनी व जलकुंभ उभारण्यासाठी सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यापूर्वीची पाच कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना कुचकामी ठरल्यानंतर ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीकडून वाळूजला दररोज १४ लक्ष घनमीटर पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे; मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता गावात प्रत्यक्षात शुद्ध पाणीपुरवठा केव्हा होणार, असा सवाल उपस्थित होतो. 

महिनाभरात पाणीपुरवठ्याचा ग्रामपंचायतीचा दावा

सरपंच सुभाष तुपे व ग्रामविकास अधिकारी एस.सी. लव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक अडचणी व निविदा प्रकियेमुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा झाला नसल्याची कबुली दिली. आता प्रशासकीय मंजुरी व निविदाही मंजूर झाल्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम तात्काळ सुरू करून महिनाभरात एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. वाळूजला यापूर्वीच पाच कोटींची राष्ट्रीय  पेयजल योजना मिळाली होती.

पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता व खाबुगिरीने योजना वांझोटी ठरली व  गावाला आज भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या गावात सार्वजनिक विहिरी, एमआयडीसी व बोअरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.  लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत असल्यामुळे ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वी वाढीव पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव सादर केला होता.  एमआयडीसीकडून दररोज १४ लक्ष घनमीटर पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली होती. 

वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने गतवर्षी जुलै महिन्यात २ लाख रुपये अनामत रक्कम एमआयडीसीकडे जमा केली होती. अनामत रक्कम भरल्यानंतर या कामासाठी नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ उभारण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दर्शवून जि.प. प्रशासनाने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला बजावले होते. 

गावातील गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गावात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, अनेकजण पदरमोड करून जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवीत आहेत. गत तीन दशकांपासून  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गाजत असून, याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातWaluj MIDCवाळूज एमआयडीसीgovernment schemeसरकारी योजना