शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या बांधापर्यंत कधी जाईल कार; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ पाणंद रस्ते पूर्ण

By विजय सरवदे | Updated: July 24, 2024 20:09 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत

छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या बांधापर्यंत वाहन घेऊन जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा शेतमालाची वाहतूक तसेच शेती कसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री घेऊन जाणेही शक्य होत नाही. अलीकडे शासनाने गावागावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ अंमलात आणली. परंतु, या रस्त्याच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ एवढेच पाणंद रस्ते पूर्ण होऊ शकले.

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली आहेत. तरीदेखील आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढत शेतावर जावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्यासाठी शासनाने रस्त्यासाठी भरपूर निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, मनरेगा अंतर्गत रस्ते कामांऐवजी मजुरांचा कल हा गुरांचे गोठे, घरकुले, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी, अशा वैयक्तिक स्वरूपाच्या कामांकडेच जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्त्याच्या योजनेला फारसी गती मिळत नसल्याचे चित्र आहे.

काय आहे पाणंद रस्ते योजनायांत्रिकीकरणामुळे शेतीत पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत होतात. अशा यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यातही पाणंद रस्ते चांगले असणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पाणंद रस्ते योजना अंमलात आणली.

जिल्ह्यात ३४९ रस्ते पूर्ण; १४३८ कामे प्रगतिपथावरजिल्ह्यात ८७० ग्रामपंचायतींच्या हद्दीत २४५७ पाणंद रस्त्यांची कामे मंजूर आहेत. यापैकी १७८० कामे ग्रामपंचायती, तर तहसील कार्यालयामार्फत ७६९ कामे केली जात आहेत. यापैकी जिल्हा परिषदेने १६१३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून, आतापर्यंत ३४९ रस्ते पूर्ण झाले, तर १४३८ कामे प्रगतिपथावर आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी काय सांगतेतालुका- पाणंद रस्ते पूर्ण- प्रगतिपथावरछत्रपती संभाजीनगर- २९- १५५फुलंब्री- ०८- १०५सिल्लोड- २५- ११०सोयगाव- ०९- १३कन्नड- ५०-२६४खुलताबाद- ०५- १९गंगापूर- ३८- १५३वैजापूर- ४२- १९७पैठण- १४३- ४२२

अडीच हजार शेतरस्त्यांचे भाग्य उजळणारशेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर आहेत. ग्रामपंचायत आणि तहसील या दोन यंत्रणांनी मनावर घेतले तर पावसाळ्यानंतर पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. दरम्यान, या मंजूर रस्त्यांचे भाग्य कधी उजळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद