शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

शेतीच्या बांधापर्यंत कधी जाईल कार; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ पाणंद रस्ते पूर्ण

By विजय सरवदे | Updated: July 24, 2024 20:09 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत

छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या बांधापर्यंत वाहन घेऊन जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अनेकदा शेतमालाची वाहतूक तसेच शेती कसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री घेऊन जाणेही शक्य होत नाही. अलीकडे शासनाने गावागावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ अंमलात आणली. परंतु, या रस्त्याच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३४९ एवढेच पाणंद रस्ते पूर्ण होऊ शकले.

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे उलटली आहेत. तरीदेखील आजही शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढत शेतावर जावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचण सोडविण्यासाठी शासनाने रस्त्यासाठी भरपूर निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र, मनरेगा अंतर्गत रस्ते कामांऐवजी मजुरांचा कल हा गुरांचे गोठे, घरकुले, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी, अशा वैयक्तिक स्वरूपाच्या कामांकडेच जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्त्याच्या योजनेला फारसी गती मिळत नसल्याचे चित्र आहे.

काय आहे पाणंद रस्ते योजनायांत्रिकीकरणामुळे शेतीत पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत होतात. अशा यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पावसाळ्यातही पाणंद रस्ते चांगले असणे काळाची गरज आहे. या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पाणंद रस्ते योजना अंमलात आणली.

जिल्ह्यात ३४९ रस्ते पूर्ण; १४३८ कामे प्रगतिपथावरजिल्ह्यात ८७० ग्रामपंचायतींच्या हद्दीत २४५७ पाणंद रस्त्यांची कामे मंजूर आहेत. यापैकी १७८० कामे ग्रामपंचायती, तर तहसील कार्यालयामार्फत ७६९ कामे केली जात आहेत. यापैकी जिल्हा परिषदेने १६१३ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून, आतापर्यंत ३४९ रस्ते पूर्ण झाले, तर १४३८ कामे प्रगतिपथावर आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी काय सांगतेतालुका- पाणंद रस्ते पूर्ण- प्रगतिपथावरछत्रपती संभाजीनगर- २९- १५५फुलंब्री- ०८- १०५सिल्लोड- २५- ११०सोयगाव- ०९- १३कन्नड- ५०-२६४खुलताबाद- ०५- १९गंगापूर- ३८- १५३वैजापूर- ४२- १९७पैठण- १४३- ४२२

अडीच हजार शेतरस्त्यांचे भाग्य उजळणारशेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात २४५७ पाणंद रस्त्याची कामे मंजूर आहेत. ग्रामपंचायत आणि तहसील या दोन यंत्रणांनी मनावर घेतले तर पावसाळ्यानंतर पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. दरम्यान, या मंजूर रस्त्यांचे भाग्य कधी उजळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद