शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना

By मुजीब देवणीकर | Updated: March 14, 2024 15:31 IST

२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. दीड महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनीवर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. ७५ एमएलडी वाढीव पाणी देण्याचा दावा करण्यात आला. नंतर २५ एमएलडी पाणी येईल, असे जाहीर केले. शहर पाण्यासाठी संकटात असतानाही ही जलवाहिनी सुरू झालेली नाही, हे विशेष.

२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. तेव्हापर्यंत शहराला दिलासा मिळावा म्हणून २०० कोटी रुपयांची ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. २० फेब्रुवारी रोजी ७५ एमएलडी पाणी येईल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली होती. मागील महिन्यात जलवाहिनीची चाचणी घेण्यासाठी मनपाच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन घेतले. हा प्रयोग पूर्णपणे फसला. जलवाहिनी सुरू करण्यासाठी ४ हजार अश्वशक्तीचा पंप लागतो. हा पंप येण्यास उशीर होऊ लागल्याने ४०० अश्वशक्तीचे तीन पंप बसवून चाचणी केली. जायकवाडी ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रयोग यशस्वी झाला. त्यातून २५ एमएलडी पाणी येईल, असे सांगण्यात आले. आठ दिवसांपासून जलवाहिनीतून अत्यंत गढूळ पाणी येत आहे. हे पाणीही घेणे थांबविण्यात आले. जलवाहिनी स्वच्छ करून पाणी सोडा, असे मनपातर्फे सांगण्यात आले. आठ दिवसांपूर्वी ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप आले. हे पंप बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.

शहर संकटात; तरी जलवाहिनी बंद९०० मिमी व्यासाची जलवाहिनी १ मार्चला सुरू झाली असती तर शहराला एवढी भीषण पाणीटंचाई भासली नसती. या जलवाहिनीतून किमान ७५ एमएलडी आणि जुन्या ७०० मिमीच्या जलवाहिनीद्वारे ३० एमएलडी, हर्सूल तलावातून ५ एमएलडी असे मिळून ११० एमएलडी पाण्यावर शहराची कशीबशी तहान भागली असती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी