शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना

By मुजीब देवणीकर | Updated: March 14, 2024 15:31 IST

२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. दीड महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनीवर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. ७५ एमएलडी वाढीव पाणी देण्याचा दावा करण्यात आला. नंतर २५ एमएलडी पाणी येईल, असे जाहीर केले. शहर पाण्यासाठी संकटात असतानाही ही जलवाहिनी सुरू झालेली नाही, हे विशेष.

२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. तेव्हापर्यंत शहराला दिलासा मिळावा म्हणून २०० कोटी रुपयांची ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. २० फेब्रुवारी रोजी ७५ एमएलडी पाणी येईल, अशी घोषणा मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली होती. मागील महिन्यात जलवाहिनीची चाचणी घेण्यासाठी मनपाच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन घेतले. हा प्रयोग पूर्णपणे फसला. जलवाहिनी सुरू करण्यासाठी ४ हजार अश्वशक्तीचा पंप लागतो. हा पंप येण्यास उशीर होऊ लागल्याने ४०० अश्वशक्तीचे तीन पंप बसवून चाचणी केली. जायकवाडी ते फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रयोग यशस्वी झाला. त्यातून २५ एमएलडी पाणी येईल, असे सांगण्यात आले. आठ दिवसांपासून जलवाहिनीतून अत्यंत गढूळ पाणी येत आहे. हे पाणीही घेणे थांबविण्यात आले. जलवाहिनी स्वच्छ करून पाणी सोडा, असे मनपातर्फे सांगण्यात आले. आठ दिवसांपूर्वी ४ हजार अश्वशक्तीचे दोन पंप आले. हे पंप बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.

शहर संकटात; तरी जलवाहिनी बंद९०० मिमी व्यासाची जलवाहिनी १ मार्चला सुरू झाली असती तर शहराला एवढी भीषण पाणीटंचाई भासली नसती. या जलवाहिनीतून किमान ७५ एमएलडी आणि जुन्या ७०० मिमीच्या जलवाहिनीद्वारे ३० एमएलडी, हर्सूल तलावातून ५ एमएलडी असे मिळून ११० एमएलडी पाण्यावर शहराची कशीबशी तहान भागली असती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी