शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पुंडलिकनगरमधील गुंडगिरी, नशेखोरीला आळा कधी घालणार ? रहिवाशांचा संताप अनावर

By सुमित डोळे | Updated: November 13, 2023 16:50 IST

पोलिस आयुक्तालयावर संतप्त शेकडो रहिवाशांचा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : शेजाऱ्यांमधील वादात मद्यस्थीसाठी गेलेल्या गणेश मारुती राऊत (२८, रा. साईनगर, गारखेडा) या तरुणाची ७ नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्येला पुंडलिकनगरमधील वाढलेली गुंडगिरी, नशेखोरीची किनार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पुंडलिकनगरच्या शेकडो रहिवाशांनी शनिवारी दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढत गुंडगिरीवर आळा कधी घालणार, असा संतप्त प्रश्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रहिवासी परतले.

६ नोव्हेंबर रोजी गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रस्त्यावरील वाइन शॉपसमोर तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ७ नोव्हेंबर रोजी गुरूदत्तनगरात गणेशची सागर विक्रम केसभट व शुभम मदन राठोड यांनी हत्या केली. या घटनेनंतर पुंडलिकनगर परिसर पुन्हा दहशतीखाली गेला. हत्येनंतर अटक केलेल्या सागरच्या खिशात नशेच्या गोळ्या आढळल्या. दोन गंभीर गुन्हे दाखल असलेला सागर अनेक वर्षांपासून पुंडलिकनगरमधील गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या संपर्कात असल्याचेही निष्पन्न झाले.

शहरात याच परिसरात गेली ५ वर्षांमध्ये खून, खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांनी उच्चांक गाठला. शहरातील १७ पोलिस ठाण्यांमध्ये पुंडलिकनगरमध्ये गंभीर गुन्ह्यांचा आलेख सर्वाधिक राहिला. याला वाढती नशेखोरी, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांसोबत असलेले ''हितसंबंध'' व त्यामुळे गावगुंडांचा वाढलेला आत्मविश्वास कारणीभूत असल्याचे स्थानिक सांगतात. या गुन्हेगारांचे ठरावीक अड्डे आहेत. व्यावसायिकांनाही याचा मोठा त्रास होतो. मात्र, तक्रार केली की ठाण्यातीलच काही पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच संबंधित गुंडांना तक्रारदारांची नावे कळतात, असे स्थानिकांनी सांगितले. घटनेनंतर संपर्क साधल्यावरही स्थानिक पोलिस प्रतिसाद देत नाहीत, घटनास्थळी वेळेत येत नाहीत, असा गंभीर आरोप मोर्चातील स्थानिकांनी उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्यासमोर केला. यापुढे गावगुंडांवर आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू, पोलिसांना सूचना करू, असे आश्वासन त्यांना देण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी